Saturday, June 29, 2024

श्री

 श्री 


अनेक आकार, ज्या अनंत सूक्ष्म स्तरातून येतात आणि मनावर परिणाम करतात - हा दृश्याचा स्वभाव झाला. स्वभाव म्हणलं तर हे सगळं होणार, त्या शक्तीच्या कार्यातून जे जीवाच्या जाणीवेच्या पलीकडे असते किंव्हा जी जीवाची जाणिव तैय्यार करायला कारणीभूत ठरते. म्हणून आपण कोण, कुठून आलो, कुठे जाणार आहोत वगैरे - हे पूर्णपणे भगवंताच्या शक्तीवर गोष्टी सोडणे. बुद्धी दृश्याच गुणधर्म उचलते, म्हणून चक्रात वावरते. त्यातून प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळत नाही जर विचारांचा गुणधर्म बघितला तर. पर्यायाने _समाधान_ स्थिती विचारांच्या चौकटीत नसते...ती वेगळी मनाची स्थिती आहे, ज्यात विचार स्थिरावतात. 

स्थिरावणे - हे संस्कार देणे आहेत मनाला. ते कुठल्याही माध्यमातून होऊ शकतात कारण कुठलीही वृत्ती शेवटी शांत होऊ शकते. म्हणजे सत्याची जर भाषा सांगितली तर एका शांतीतून अनेक प्रकारच्या वृत्ती, स्थिती, बुद्धी, भावना होत राहतात. म्हणून स्वतःचा मार्ग ओळखणे. त्यात दुसरा कुणी काही करू शकत नाही. 

दृश्य किंव्हा आकार, हे वृत्तीतून आणि अनेक क्रियेतून निर्माण होत राहत. बुद्धीचा स्वभाव असा की एका दोरी सारखं घटकांचं संबंध जोडत राहते. तसे संबंध असतात असे नाही. _किंव्हा बुद्धी सत्य कडे जशी बघेल तसे *संबंधांचे* स्वरूप दिसून येत!_ म्हणून एका स्थितीमुळे दुसरी होते त्यासाठी कार्य करणे हे तत्व पूर्णपणे लागू होऊ शकत नाही. किंव्हा अस्तित्वाला "विषय" समजणे किंव्हा logic ने त्याकडे बघणे हे तात्पुरत्या गोष्टी समजाव्यात. त्यात मनस्ताप निघून नाही जात! म्हणजेच की "logic" ही एका प्रकारची मर्यादित विचार करण्याची पद्धत आहे. त्याच्या आणखीन पलीकडे सूक्ष्म पद्धती आहेत विचार करण्याचे किंव्हा जाणीव घडवण्याचे. सध्या आपण विचार "कोड सोडवणे" ह्या पद्धतीने त्याकडे बघतो. जर अस्तीत्व कोड नसेल तर?!!...

म्हणून सूक्ष्म होणे म्हणजे संबंधांचे स्वरूप किंव्हा नाती बदलणे - खूप क्रिया अनुभवणे...खऱ्या अर्थाने तसे केले, तर त्याला विवेक बुद्धी म्हणतात. _असार टाकून सार ग्रहण करणे..._ 

हरि ओम.

Friday, June 28, 2024

श्री

श्री 

बहिर्मुख वृत्ती ठेवणे म्हणजे कृती करण्याचा अट्टाहास धरणे, सिद्ध करणे, उतावळे होणे, प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास असणे, मत मांडणे, सैय्यम न राखणे, बदलांची भीती वाटणे, गुंतागुंतीचा त्रास होणे वगैरे. हे जाणिवेच एक रूप आहे. जी वस्तू दिसते आणि अनुभव निर्माण करते, त्या अर्थाचं मूळ स्वतःच्या मनात असतं. ज्या प्रकारे वृत्ती निर्माण होते, तसा अर्थ किंव्हा दृश्याशी संबंध येतो. थोडक्यात सर्व निर्मितीचा खेळ आहे. 

गोष्टी असणार आहेत, त्या बदलणार आहेत आणि त्या येणार आहेत, त्या जाणार आहेत. हा प्रवाह कायम आहे. आपल्या वाचून काही जग थांबत नाही किंव्हा घडतं नाही. जे इतरांच आहे, तसं आपलही आहे. आपण येणार, बदलणार आणि जाणार कुठल्यातरी स्थितीत किंव्हा स्तरात. अर्थात अश्या प्रकारे विवेक विचार निर्माण होणे हे देखील भगवंताची इच्छा - की मानव जीवाला ही गोष्ट जाणवू शकते. म्हणून प्रयत्नांच महत्व इथे येतं. 

प्रयत्न करत असताना दुसऱ्यांना त्याची कल्पना द्यावी हे मुद्दाम करण्याची गोष्ट नसावी. दुसऱ्यांना वृत्तीतून येणाऱ्या प्रश्नाची व्यथा सांगता येऊ शकते का, हा मला पडलेला प्रश्न आहे, जो स्वतः मध्ये सोडवायचा आहे. माझ्या मते, वृत्तीच्या हालचाली आणि परिणाम, ह्या गोष्टी चर्चे मध्ये समाधान पूर्वक आणण्यात अडचणी असू शकतात. 

म्हणून अंतर्मुख होण्याचा प्रवास सांगता येत नाही आणि तोच त्या प्रवासाचा गुणधर्म असावा. ह्या वरून कळेल की विचारांची एक मर्यादा आहे, जिच्यात आपण गुंतलो तर बहिर्मुख गोष्टींची चर्चा होते, पण त्या पलीकडे (सूक्ष्म प्रकृतीच्या गोष्टी) विचार पोहोचू शकतं नसावेत. 

त्रास किंव्हा दुःख कुठून येतो, हा अंतर्मुख होण्याचा प्रवास आहे. त्यात आपण बऱ्याच वेळेला परिस्थिती किंव्हा दुसऱ्यांना दोष देत राहतो. त्याने काही हाती लागत नाही. कारण त्रासच मूळ कुठेतरी आत आहे, जे जर ते अनुभवलं, तर आपण शांत होऊ. 

हरि ओम.

Sunday, June 23, 2024

Shree

Shree

Existence is sacred. Everything around us and including us and our being in the world is sacred. 

Existence and it's behaviour is not man made or as a phenomenon is "beyond" man. This is obvious, but the scientific determination doesn't accept this so easily. 

Since it comes from Beyond or is made by Beyond, there exists full capacity of human imagination to create any experience to relate to the phenomenon of place. Existence puts human form and environment simultaneously at the same level of creation. Hence the perception of either is more than causal or interdependent and it is upto either as to what to make of this relationship. 

Louis Kahn, at times, spoke of this spatial relationship perhaps from this reference. That, spatial relationship "becomes" or "happens" hinting at a very deep, existential role in its creation....suggesting that space also comes from Existence, so has a transcendental quality. 

There are pre modern cultural ideas (example being of Pueblo near Mexico) that suggest this character of Being through their environments. 

All this goes on to say that science is also not absolute - it has its own character and it also establishes our sense of Being in a 'different' way. 

Seen from this attitude, no knowledge process is superior to anything else. And then we may be able to accommodate all worldviews that exist contemporary in this phenomenal world.

Hari Om.

श्री

श्री,

शांत होणे ही प्रक्रिया श्रद्धेच्या मार्गाने चालायला लागते. म्हणजे बुद्धीची शक्ती  आणि भावनांची शक्ती ह्या पलीकडील परिवर्तन शक्तीवर किंव्हा भगवंताच्या शक्तीवर अस्तीत्वपणा द्यायला लागतो. The force of Existence is present everywhere. It needs to be trusted.

ही जाणीव सर्वांगाने मिळते - म्हणजे बुद्धी किंव्हा भावना किंव्हा आकार ह्या मार्गातून प्रामुख्याने सुरू करून, ती सर्वांगीण करायला लागते. मनाचे सर्व अंग त्या जाणीवेने व्यापले हवे, आणि त्याच बरोबर अस्तित्वाचे सर्व स्तर किंव्हा स्थिती, ज्याला आपण "दृश्य" समजतो. 

श्री ज्ञानदेव संतांनी विश्वाची व्याख्या अद्वैत आणि द्वैत ह्या स्थितीन केली आहे. द्वैत ह्या स्थिती मध्ये ७ लोक, ५ सूक्ष्म रूप पंचमहाभूतांचे आणि ३ गुण अश्या संबंधातून "अनेक" विश्व पाहिली (in scientific terms - simultaneously existing multiverses)!...

ह्याचाच अर्थ असा की सर्वांगीण चिंतनाने, त्यांना मनाच्या खोलात शिरून सर्व प्रकारच्या आतील मनाच्या शक्ती  अनुभवता आल्या, ज्यावरून अद्वैत आणि द्वैताची रचना त्यांना जाणवली. 

आपण सतत "हे केलं की ते होईल किंव्हा हे केलं की असं व्हायला हवे किंव्हा हे करणे भाग आहे"...ह्या चक्रात असतो. जाणिवेची स्थिती अशी पाहिजे की सर्व भगवंताची शक्ति करते, त्यातून जीवाची शक्ती निर्माण होते आणि आपण प्रपंच ठरवतो! 

दररोजच्या अनुभवेत म्हणून भीती आणि शांती हे दोन्ही भावना राहतात. त्यात शांती वाढवण्याची शक्यता श्रद्धेने होते. 

पुढचा श्वास जर भगवंताची शक्ती ठरवणार असेल, तर आपण कुठले काल्पनिक मनोरे रचायचे?!!...so much of an effect our imagination has on us...which actually originates from a Presence...

हरि ओम.

श्री

श्री

वस्तू हवी असे वाटणे म्हणजे स्वतःच्या जाणीवेमध्ये वृत्तीची सरमिसळ झाली आहे, असे समजून घेणे. जे बघतो, विचार करतो, मनन करतो, निर्माण करतो, आकार अनुभवतो, हे सर्व जाणीवेच्या शक्तीतुन होत असतं. ती शक्ती, आपल्यासाठी सध्या वृत्तीचा स्वभाव धारण करून आली आहे, जीच्यातुन आपला (किंव्हा एखादा जीवाचा) जन्म होतो, दृश्यात किंव्हा प्रपंचात गुंतून राहतो आणि शेवटी मावळतो. ह्या होण्यात आणि अनुभवण्यास बऱ्याच क्रिया घडतं राहतात, ज्यांचा ठाम पत्ता लागणे जीवाला अवघड आहे, कारण सर्व दैवी स्वरूपातील क्रिया निर्माण होत असतात. म्हणून जे दिसतं, ते निर्माण क्रियेतून आलेलं असतं, त्याचा एक स्वभाव असतो, त्याचा एक परिणाम असतो, त्याच्यात गुंतून राहतो जीव. काय केलं की ह्यातून बाहेर पडता येईल, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा हे समजून घेणे की प्रश्न मनाच्या स्वभावातून आलेला आहे, तर ते उत्तर कसे शोधू शकेल?!!...

शांत होणे ही क्रिया अपेक्षित आहे. आपलं अस्तित्व कष्यावरही, कुठल्याही विषयावर, परिस्थितीवर, गोष्टीवर, व्यक्तीवर, आकारावर निर्भर "नसलेलं हवे". म्हणजेच की अस्तीत्व जाणीव हा पलीकडील भाव आहे. 

घाई करून, आटापिटा करून, रागावून, साठवून, डाफरून, दुर्लक्षित करून काहीही होत नसतं. काळजी किंव्हा चिंतेचा _अस्तीत्व_ हा विषय मुळीच नाही. मुळात अस्तीत्व हा _विषय_ असू शकत नाही! आपण त्याला विषयाच्या चौकटीत आणतो, म्हणून त्याला प्रपंचाच स्वरूप देतो! वेडेपणा नाही का हा?! 

प्रपंचाला विषय समजू नका. वृत्ती ही विषयाधिन होता कामा नये, तरच भगवत भाव प्रकट होईल.

हरि ओम.

Wednesday, June 19, 2024

श्री

 श्री,


आपण पूर्ण आहोत. अपुरे वाटणे किंव्हा न्युंन वाटणे ही भावना निर्माण केली आहे, त्याला खत पाणी (खरी मानणे) देणे काही गरजेचं नाही. सगळं भगवंतहून आलेलं आहे, आपल्या वृत्ती आणि अनुभव देखील....म्हणून *मुळात* आपण पूर्ण आहोत आणि जीव ही स्थिती आहे, जिच्यात बदल हे राहणार आणि असंख्य गोष्टी दिसत राहतील आणि मनाला इकडे तिकडे ओढत राहतील. हा मनाचा स्वभाव आहे, जो आपल्याला स्थिर करायचा आहे, म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवायचे आहे...

दुसरी गोष्ट अशी, की दृश्य जगाचे अनुभव किंव्हा कुठलीही निर्माण झालेली (किंव्हा आपल्या समोर आलेली) "गोष्ट" नाहीशी करता येऊ शकतं नाही. ती आली, की त्या बरोबर तिचे सारे संबंध, बदल, भोग ती मनात उत्पन्न करते. तिला "परत गुप्त करणे किंव्हा नाहीशी करणे मनातून" असे समजणे अशक्य आहे, असे मला वाटते.

पर्यायाने त्या गोष्टीला "निर्विश" करायला हवे. गोष्ट किंव्हा दृश्याचा पसारा राहणार, फक्त त्याकडे आपण सूक्ष्म पद्धतीने बघण्याची सवय करत आहोत, वृत्ती सूक्ष्म करत आहोत, भगवताच अस्तीत्व जाणवत आहोत, जाणीवा वाढवत आहोत. 

म्हणून भगवंता कडील प्रवास जाणीव वाढवण्याचा आहे आणि पर्यायाने सगळ्या गोष्टींचा परिणाम न होऊ देणे असा आहे. दुसऱ्या शब्दात मांडायच झालं तर सर्वांचं मूळ, जो भगवंत भाव आहे, ते प्रत्यक्ष अनुभवणे. 

दर रोजच्या पद्धतीतून सांगायचं झालं तर बदल किंव्हा वेगळ्या गोष्टीतून शांत होत राहणे हे आहे. गोष्टी बदलत राहायला किंव्हा आपल्या वाट्याला आल्या तर त्यातून "मी" ठरतं नाही, अपेक्षा असण्याची गरज नाही, साठवण्याची नाही, काल आणि उद्याच्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही, चिंता नाही, त्रास नाही. कशाचीही गरज नाही. 

आपण कसेही असो, कुठलाही गुण असो, कुठलीही परिस्थिती असो, त्यातून अपुरेपणा किंव्हा न्युंपणा ठरतं नाही. आपण तरीही शांती अनुभवू शकतो.

हरि ओम.

Monday, June 17, 2024

श्री

श्री,

मला काय वाटतं त्यात काही विशेष नाही - ते सत्य नाही, किंव्हा काळ्या दगडा वरची पांढरी रेग नाही, की वाटलं ते कायम असायला हवे!

दुसऱ्यांना सांगायलाच पाहिजे, आपले विचार मांडायला पाहिजे, आवाज उठवायलाच पाहिजे, विचारांचं निचरा करायलाच पाहिजे - ह्या सर्व वृत्ती शांत करायला हव्या. 

ते होत राहतील...स्वतःच्या मनोरचने प्रमाणे अनुभव येतील/ होतील, अर्थ दिला जाईल, तो बदलेल, इतर सूक्ष्म गोष्टी नंतर कळून येतील, प्रवास घडतं जाईल...ह्या सर्व गोष्टी होतील. 

आपल्या निर्मितीचा प्रवास असंख्य काऱ्यकारणसंबंध ह्या धाग्याला धरून होतो....त्याच विघटन केलं तर सगळे कारण त्याच क्रमाने कळतीलच असे नाही. विघटनचा प्रवास वेगळा असतो/ असू शकतो. 

म्हणून आत्मकेंद्रित होतांना जाणीव वाढवणे एवढच आहे - सगळे कारण निर्मितीचे त्याच क्रमाने कळणे हे नाही!! कारण प्रकरण गुंता गुंतीच आहे आणि बदलणारं असल्यामुळे निर्मितीचा कुठल्याही स्तरातला क्षण आणि विघटनचा क्षण हे निश्चित वेगळेच राहतील, so the process of introversion is NOT the reverse of general extroverted tendency of the mind. They follow different paths. This, therefore means, one arrives at the Origin from a different position or a path which is different from the path of creation starting from the Origin. Therefore there is no need to find exact points of creation process since they won't be found at all. 

In other words, our tendency or inheritance or past lives are not necessary to be considered for defining an awakening journey. The tendency can be considered only to know the course the path would take and accept the outcome whatever is in store on that path. It is always a forward movement that takes one to the final destination and not a reverse. Path keeps changing and by the grace of God and trust in Him, it leads to His home. For this, any method suited to each one is certainly acceptable.

म्हणून,

१. कुठलीही परिस्थिती ही सुरुवात समजू शकतो आपण ह्या प्रवासासाठी
२. मागे काय झालं ती पूर्णपणे भगवंताला देऊन टाकण्यात स्वारस आहे. त्याला न चिकटण. तसे पाहिले तर हा नियम "कुठल्याही पूर्वी घडून गेलेल्या" गोष्टीला आहे.
३. सूक्ष्म होणे म्हणजे उलट फिरणे होत नाही. सूक्ष्म होणे म्हणजे जाणीव विशाल होणे. वृत्ती आपोआप बदलणे. 
४. नामस्मरणाचा परिणाम मागे आणि पुढे ह्यावर अवलंबून नाही. तो आत्तावर आहे. म्हणजे त्याचा परिणाम स्वतःला शांत करेल, जो अनुभव "आत्ता" सामावलेला असतो/ किंव्हा "आत्ताच" स्वरूप घेऊन येतो. 
५. म्हणून श्रद्धा ठेवणे म्हणजे चंचल न होणे. इकडे तिकडे बुद्धी फिरण्याची गरज नाही आणि मागचा किंव्हा पुढचा विचार करण्याचीही नाही!
६. बुद्धीची पद्धत सोडायला लागते. हे केलं की ते होईल, अशी समज बाजूला ठेवायला लागते.


हरि ओम.

श्री

 श्री,


दृष्यापणा अनुभवणे ह्याचा अर्थ की भगवंताचे अस्तीत्व आहे. दृश्य हा बाहेरील शक्तीच परिवर्तन पावलेल स्वरूप आहे, ज्याचा परिणाम असतो आणि अनुभव येत राहतो आणि गती, गुण, बदल, आकार, शक्ती, वृत्ती असे घटक "असतात". विश्व भाव. आणि म्हणून जीव, बुद्धी, भावना, त्यातील अहं वृत्ती, विस्मरण, मग हेतू, प्रश्न आणि कार्य. 

भगवंत म्हणजे अस्तीत्व म्हणलं तर अनेक स्तरात आणि रुपात तो प्रकट पावतो - त्यात निर्माण काहीही होऊ शकत आणि निर्माण होणे म्हणजे एकमेकांचे संबंध, गुंतणे आणि वेगळेपणा - हे सर्व आले. 

Then Existence also appears as space and time. In other words, space and time means a form of Existence and hence they will behave in some _form_ of connections , change, dependence, interactions, characters, Principles and so on with 'other' forms of Existence (such as us). The property of Existence, referred as vibrations, appears in billion ways to create billion forms and hence there is scope for understanding connections, relations and Oneness. 

Separation or difference is another side of the same coin of Oneness and can be regarded as a gateway to bliss. Existence can take _any_ form, subjected to space and time, and keep changing and vibrating, thereby creating billion other simultaneous forms. This is "imagination", the output of which, is our mind or awareness. In this, the character of Existence is transformed or "locked" onto a limited cycle of perception and hence we only "see" forms. This is default or integral nature of Existence and _hence_ to feel Oneness, the mind can "start proceeding" at any moment without any conditions of phenomenon or past or present or future. 

हरि ओम.

Saturday, June 15, 2024

श्री

 श्री,


आपण एका शक्तीच रूप झालेलो आहोत. त्याला "भाव" असं म्हणतात. तो भाव अस्तित्वाने निर्माण होतो, म्हणून त्या क्रियेमुळे शक्तीच विशेष रूप तैय्यार होऊन त्याचा परिणाम होत राहतो. 

जीव, हा आहे परिणाम. जीव, ही क्रिया वृत्ती, मन आणि शरीर अशी होत राहते. म्हणजे परिणाम दृश्य दाखवते. दृश्य दाखवणे, म्हणजे अर्थही निर्माण करणे आणि त्यात गुंतून ठेवणे - हा झाला एकंदरीत ह्या साऱ्या शक्तींचा परिणाम. 

प्रत्येक गुण, जे भगवंता कडून जीवाला बनवलेलं गेलं आहे, त्याचा परिणाम त्याला कार्य करायला लावतो आणि त्यातून भोग अनुभवायला लावतो. 

म्हणून जाणीवेची रचना स्वीकारायला लागते आणि आपल्या आयुष्यात जे होत, त्यात दोष न बघणे अशी वृत्ती बनवायला लागते. 

वृत्तीचा परिणाम खूप सूक्ष्म स्तरातून येत असावा, म्हणून वृत्ती उपटून नाही टाकता येत. ती शांत होई पर्यंत जे भोग येतील, ते स्वीकारायला लागतात. निर्मितीच कार्य आणि अनेकपणं दाखवणे आणि त्याचा परिणाम भोगायला लावणे, हे भगवंताच नियोजन आहे. त्याची कृपा झाल्यावर आपण शांत होऊ. तो पर्यंत, कार्य करणे.

हरि ओम. 

आणि ती आपली खरी ओळख आहे. आपण तेच आहोत. शांत. तिथे होणार आहोत आपण. म्हणून सैय्यम ठेवत कार्य करत रहा. भगवंतासाठी.

हरि ओम.

श्री

 श्री,


शांत म्हणजे ज्या वृत्ती उमटत आहेत, त्याला प्रतिक्रिया न देणे, त्यात न गुंतणे. वृत्तीत जर "गुंतणे" ही क्रिया झाली, तर त्यातून अनेक *शक्ती चक्रांचे* स्तर निर्माण होतात, ज्याला बुद्धी, भावना, शरीराचे इंद्रिये, दृश्य, संबंध, बदल ह्या गोष्टी कार्यात येतात. त्रस्त जर झालो, तर वरील क्रिया कळून येतील, नाही तर सर्वांना "मी" अशी वृत्ती येते/ होते. क्रियांचा परिणाम म्हणजे "मी" भासणे, म्हणून त्यात आपण (आनेकपणा) मध्ये गुंतत राहतो वगैरे. 

थोडक्यात वरील क्रियांच विस्मरण होणे आणि त्याचा परिणाम भोगत राहणे. आपण इथे का आलेलो आहोत, हे विसरणे. आपण काय आहोत, कसे आलेलो आहोत, कुठून आलेलो आहोत, कसला प्रवास आहे हा, हे सर्व विसरणे. 

हे ध्यानात जर घेऊ शकलो, तर विस्मरण दूर करण्याची क्रिया सुरू होते. म्हणजे जाणीव जीवापासून (की मी सर्वस्व आहे) ते तटस्टपणे क्रिया ओळखणे (कार्य भगवंताच असतं) हे समजणे. 

आपण जेव्हा भगवंत हा शब्द संबोधित करतो, त्यात अस्तीत्व, शक्तींच कार्य, क्रिया, स्तर, विश्व भाव हे साऱ्या गोष्टी आल्या. हेच त्याचं कार्य. हे ओळखणे. झोपेतून उठणे.

हरि ओम.

श्री

 श्री,


स्वतःची वृत्ती काय क्रिया करत राहते इतर वृत्तींवर आणि काय आकार निर्माण करते, घेऊन आणते, अनुभव देते हे दिसत तसं सरळ बौद्धिक प्रकरण नाही. 

वृत्ती बुद्धी पेक्षा सूक्ष्म असल्यामुळे, तिची शक्ती आणि परिणाम बुद्धीच्या पलीकडे राहतो आणि वृत्ती ही शक्ती खूप साऱ्या गोष्टीच्या मुळाशी असते. 

वृत्ती सूक्ष्म आणि विशाल रुपाची असते, म्हणून ती अनेकात राहते किंव्हा तिच्यातून अनंत गोष्टी निर्माण होतात. म्हणजेच की एकच वृत्ती घेऊन, ती वेग वेगळ्या बुद्धिंची शक्ती आणि वेग वेगळ्या भावनांची शक्ती तैय्यार करू शकते. म्हणून गोष्टींना बुद्धी भेद वापरून फारस हातात काही मुळात नाही, कारण ज्या प्रमाणे _बुद्धी गोष्टींचं विघटन करते, त्या प्रमाणे तिची निर्मिती झाली नसेलही!!_ 

ह्यातून हे दिसत की एकाच गोष्टीकडे खूप पद्धतीने आपण बघू शकतो - तिचा _निर्मितीचा प्रवास_ सांगू शकतो. मग त्यावरून आपण असं म्हणू की गोष्टी काय कायम किंव्हा सत्य नसते, ती अनंत कारणांमुळे, वृत्तीमुळे आणि संबंधातून निर्माण झाली असते आणि वृत्तीचं बीज घेऊन बदलत राहते. 

वरील क्रिया खूप साऱ्या गोष्टी नोंदवतात. एक म्हणजे माझ्या पोटात वृत्तीचं बीज आहे, जी एक दृष्टी निर्माण करत राहते आणि इतर गोष्टी तिच्याकडे ओढून घेते. वृत्तीमुळे स्वतःची बुद्धी आणि भावना निर्माण होतात. वृत्ती जेवढी संकुचित किंव्हा स्वार्थी, तितक्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होतो, बदलांचा त्रास होतो, आपण अट्टाहास धरतो, राग येतो वगैरे. वृत्ती जेवढी विशाल आणि सामावलेली करू, तितका दृश्याचा परिणाम स्वतःवर होत नाही, आपण स्वतः सूक्ष्म झालेलो असतो. 

म्हणून वृत्ती शांत होऊ देणे, विशाल होणे हे आपलं ध्येय आहे किंव्हा गरज आहे. 

हरि ओम.



श्री,

वृत्ती या विषयाचे दोन गोष्टी जाणवले:

१. वास्तुशास्त्र या विषयात Pattern Language संकल्पना आहे. की मानवी स्वभाव जर archetype किंव्हा patterns, या स्वरूपात ओळखता आला (जो असतोच) तर कलाकृती अधिक मनाच्या जवळ आणि सत्य होऊ शकते. हा अभ्यास संस्कृती, समाज, विविधता या संकल्पनेच्या पलीकडे जातो आणि सर्व मानवांना एकत्रित बघतो. मग त्यात इतिहासापासून ते भविष्य हे देखील एकत्र येतात, कारण मुळातल वृत्तीचं बीज तेच असतं!
2. वृत्ती कुठून येते मग? तर भगवंताचे अस्तीत्व ह्या मध्ये अनंत वृत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यातून अनंत बुद्धी, अनंत भावना आणि अनंत आकार. जर अनेक आकारात एक वृत्ती दिसते, तर अनेक वृत्तीच्या पाठीमागे निश्चित कोण दिसेल?!!...

हरि ओम.

श्री

 श्री,


कितीही केलं प्रपंच्यासाठी ते अपुर असणार आहे. दुसऱ्यासाठी किंव्हा परिस्थितीसाठी काहीतरी करत राहणे, ही वृत्ती स्वतःला शांत होऊ देत नाही. दृश्य प्रकरण सतत बदलणार प्रकरण असल्यामुळे (अनेक शक्तीतून घडलेलं), आपणही त्या बदलणाऱ्या शक्तीचा एक भाग आहोत, म्हणून वृत्ती चंचल राहते आणि स्वतःला असमाधानी ठेवते आणि स्वार्थी करते. 

मग कितीही वृत्तीसाठी (वासनेसाठी) केलं किंव्हा देहासाठी किंव्हा वस्तुंसाठी, शांतता मिळत नाही. तरीही हा प्रश्न बौद्धिक पद्धतीने मांडता आला तरी तो अपुरा असतो आणि तो फक्त बौद्धिक पद्धतीने सोडवू शकत नाही. म्हणजेच की बुद्धीच्या व्यतिरिक्त क्रिया कुठल्या असतात, त्या किती स्तरावर असतात, त्यांचा संबंध काय असतो, हे जाणीवेच्या वाढत्या शक्तीने कळून येतं. 

आता प्रश्न परत इथे येतो की जाणीवा मग कश्या प्रबळ कराव्यात? बौद्धिक, भावनिक, शारीरिक इंद्रियांची कसरत आहे. मुख्यतः श्रद्धा वाढवण्याची. 

दुसऱ्या वृत्ती, परिस्थिती, व्यक्ती, शक्ती शांत होऊ शकत नाही आपल्या स्वतंत्र प्रयत्नाने. उलट त्यात गुंतून आपल्याला वैतागायला होत की वेळ फुकट गेला आणि होणारा त्रास तो औरचं! बरं गुंतायच नाही असं जरी ठरवलं, तरीही मोठ्या निग्रहाने कुणालाही न दुखावता आणि खंत न बाळगता तो हेतू पार करायला लागतो. 

मुळात आपण perfect राहण्याची व्याख्या निरखून पाहायला हवी. Perfect असणे किंव्हा होणे म्हणजे नेमक काय? इतरांच्या मर्जीने वागणे, हो - हो करणे, आश्वासन देणे, ताबडतोप कार्यवाही करणे, धावपळ करणे, वाईटपणा अडवणे, खूप साऱ्या गोष्टी मिळवणे किंव्हा करणे, चुका दाखवणे असा होत नाही. जगाला आग लागल्या सारखं सतत वर्तन करणे, ह्याने आपण perfect होत नाही. जग आहे तसे राहू देणे आणि आपण शांत होणे हे गरजेचं आहे. मी काही मिळवल, ही समज घालून टाकणं आणि सर्व गोष्टी भगवंताच्या इच्छने होतात अशी श्रद्धा वाढवणे म्हणजे शांत होणे.

नामस्मरण पहिली सुरुवात आहे आणि शेवटही, असे संतांचे वचन आहे.

हरि ओम.

Thursday, June 13, 2024

श्री

श्री,

आपल्या हातून भगवंत कार्य करतो. आपल्याला बनवणे, आपल्या वृत्ती, विचार, भावना, नाती, गती, परिणाम, संबंध, आकार, येणे, जाणे, अनुभवणे, जाणीवा...सर्वांच्या पाठीमागे तो आहे - म्हणजे त्याच अस्तीत्व आहे. अस्तित्व हा भाव आहे, वेगळी वस्तू नाही की ज्या बद्दल मी बघीन, विचार करीन, हाताळून बघीन, प्रबोधन करीन,  प्रतिक्रिया देईन वगैरे!...त्या भावातून वृत्ती आणि दृश्य अश्या साऱ्य संकल्पना "निर्माण होत राहतात". त्यातून "मी" (हा भाव) घडतो आणि क्रिया करतो त्या भावातून. म्हणजे क्रिया कशी घडते, तर त्याच उत्तर "भाव" आहे, मी नाही! म्हणजे "मी" खूप साऱ्या स्तरातून झालो आहे आणि त्याच्या परिणामामुळे प्रतिक्रिया देत राहतो!...मला (म्हणजे त्या भावाला) वेगळेपणा जाणवतो, म्हणून त्या प्रमाणे प्रतिक्रिया देण्याची गरज भासत राहते. म्हणजे थोडक्यात कार्य भाव करत आहे, त्याचा परिणाम आहे, ज्याला "मी" स्वतः समजतो आणि धरून राहतो. ही गोष्ट तरीही उमगायला किंव्हा जाणिवेत यायला खूप काळ घालवायला लागतो. ती भगवंताची इच्छा मानुयात.

अनुभव येऊ द्यावेत. त्याच्या पाठीमागचा प्रयोजन नाही कळणार आपल्याला, पण त्या कारणासाठी आपल्या पदरी पाठवले गेले आहेत. त्यातूनच प्रवास घडतं जाणार आहे. आणि त्यातूनच अनुभावतेच स्वरूप मोठ्ठ होत राहणार आहे. ते कसं, ते भगवंतावर सोडणे. सध्या त्याच कार्य आहे, जी जाणीव वाढवत राहणे.

हरि ओम.

श्री

 श्री,


गोष्टींचं उद्भवणे हे जीवाच्या पलीकडील रहस्य आहे. "उद्भवणें" हे कार्य आहे, शांत हेतू मधून साकार झालेलं आहे. काय उद्भवते? शक्तीची क्रिया - वृत्ती, प्राण, आकार आणि ते होतांना अनेक स्तर, संबंध, जाणीवा, अनुभव, बदल. 

भगवंताचा पूर्ण स्वभाव पहिला तर अदृश्य आणि दृश्य हे दोन्ही त्यात सामावलेले घटक आहे. दृश्य वेगळं, आणि अदृश्य वेगळं, हे समजून घेण्यासाठी ठीक आहे, पण सत्य एकच आहे आणि हा सर्व खेळ (किंव्हा क्रिया) त्याचा विलास आहे. तो आहे, म्हणून दृश्य जगाची निर्मिती आहे, किंबहुना त्याच्या शिवाय दृश्य जगाला अस्तीत्व नाही. 

सूर्य म्हणलं तर सावली आली, तसेच भगवंत म्हणलं तर दृश्य आलच. आणि जशी सावली वरून सूर्याचं अस्तीत्व आपण पारखु शकतो, तसेच दृश्याचा क्रियेवरून भगवंताच्या अस्तित्वाला जाणून घेऊ शकतो. 

प्रश्न बोचणारे असतात. भगवंत जाणून घेण्याची ती किम्मत असावी. सर्व गोष्टी सोडण्याची तैय्यारी हवी, ती दाखवावी, म्हणजे भगवंत प्रकट होतो. आपण दृश्य जग सोडत नाही, कारण त्याचा आधार आहे, अशी समजूत झाली आहे. हे सांगणे सोप्पे आहे, पण प्रकरण वस्तुतः खूप गूढ आणि गुंतागुंतीच आहे. कितीही स्पष्टीकरण देता येऊ शकलं, तरीही आपण दृश्य स्वभाव सोडू की नाही हे श्रद्धेने शक्य होऊ शकेल. 

हरि ओम.

Tuesday, June 11, 2024

Shree

 Shree,


Thoughts _come_ from a complex phenomenon of _becoming_.  In this phenomenon, 'i' am created (this engagement of memory of separation and connection and imagination) and i therefore imagine fear as well as transcendence. 

Fear is imagination and it keeps thoughts in a loop. Of course thoughts have degrees of immersions from obviously logical to laterally subtle and intangible and somewhere in between irrationally fearful. All these _get created in us_ (and _through_ us) and also make us.

This is important to realise because the problem or the effect of human imagination _is not unique_ to me and what sort of life I inherit. The problem can make billion different forms of life (called the individual "i"), but essentially the nature of problem is universal. And this understanding leads to empathy. 

Anger etc is not specific, it is a universal result of the problem human beings face. Human behaviour is not specific to a situation, it is universal form of being a human. What is present and what informs one's imagination _also informs_ mine. In that sense, no one is different - all is one mass of energy/ existence doing work or action . 

Yet this empathy needs to be felt...that one can still remain calm despite the forces that cause differences to be perceived. I need not highlight differences...the universal truth behind them is what I should know and become.

Hari Om.

श्री

श्री,

काटा ने काटा काढावा आणि शेवटी स्वतः पकडलेला काटा देखील टाकून द्यावा. मोकळं व्हावं.

आपली सुरुवात बाहेरून असते. दृश्य, जग, आकार, बदल, बुद्धी, भावना, परिस्थिती, वस्तू या सर्व गोष्टी आपल्याला बहिर्मुख करतात - तशी मनाची धारणा असते. जिथं पर्यंत "मी" ही संकल्पना जागी आहे किंव्हा भाव आहे, तिथं पर्यंत आपण बहिर्मुख आहोत. म्हणजे परावलंबी आणि दुसऱ्यांचे दोष पाहण्यात स्वारस्य बाळगतो. 

तीच बहिर्मुख वासना "आत" वळवायची असते - म्हणजे स्वतःतील दोष समजून घेणे, सूक्ष्म होणे, श्रद्धा वाढवणे, मदत करणे, चिंता किंव्हा त्रास किंव्हा राग न उमटणे. म्हणजे कुणावर किंव्हा कुठल्या परिस्थितीवर स्वतःच अस्तीत्व न परावलंबी करणे, स्थिर होत राहणे, शांत होणे, प्रेम करणे, हेतू मर्यादित न राहणे, सर्व एकच आहे हे ओळखणे, वेगळेपणा सरणे.

शेवटी पूर्णपणे आतली उगम पावलेली सूक्ष्म वासना शांत करणे - म्हणजे भगवंत प्रकट करणे आणि त्याच स्थितीत कायम राहणे. सर्व कार्य तोच करतो अशी जाणीव होणे. शुध्द अस्तीत्व होणे. पलीकडे राहणे. 

ह्याला म्हणतात काटा ने काटा काढावे आणि शेवटी आतला काटा ही नाहीसा करणे.....थोडक्यात काटा निर्माण झाला आहे दिव्य कार्यातून. त्याला "सोडणे".

हरि ओम.




श्री,

विचारांनी त्रासून जाण्याची गरज नाही. तसा त्रास आपण निर्माण करतो कारण तशी मनाची धारणा झाली आहे. 

विचार *शक्तीच* स्वरूप आहे - त्याच अस्तीत्व "मी" च्या अगोदर पासून आहे. क्रिया असणे, कार्य होणे, स्तर असणे ह्या गोष्टी अगोदर आहेत, अनंत काळा पासून आहेत. आणि त्यात "मी" सतत येतो आणि जातो. एखादी गोष्ट सतत घडली की ती "कायम" असल्याचा "भास" होतो, किंव्हा तसा अनुभव निर्माण होतो. 

खरं पाहिलं तर कायम काय आहे? तिचा अर्थ आपल्याला कळलेलं नाही म्हणून बदलांना कायम मानतो किंव्हा धरून ठेवतो. विचारांची निर्मिती देखील इतक्या सूक्ष्म स्थितीतून होत राहते, की त्याचा ही ठाम पत्ता लागणे अवघड जातं म्हणून विचारांना आपण कायम आहे, असे मानतो आणि विचारांच्या पलीकडे स्थिती आहे, अशी कल्पनाही येत नाही, अनुभवही नाही!! म्हणून घाबरायला होत, कारण _विचार_ हे निर्मितीतून आलेलं आहे, म्हणून तोच स्वभाव घेऊन आलेलं आहे. 

सत्य होणे किंव्हा कळणे हा विचारांचा स्वभाव "नाही". म्हणून सत्य कळण्यासाठी एक विशेष प्रक्रिया लागते. आपल्यासाठी ती प्रक्रिया विचारांनी धारण करायला लागते आणि विचार सूक्ष्म करत शांती अनुभवायला लागते.

हा झाला प्रवास.

हरि ओम.

Sunday, June 09, 2024

Shree

 Shree


The origin of pain or irritation is not known, although pain is a profound emotion that suggests empathy or connection or relationships. Irritation is ego and the false illusion of control. Nothing is absolutely true and final in the phenomenal world. By this, it also means that there is no definite start or an end point to anything and nothing can be separately extracted. This can be frustrating for the intellect or it can be liberating if the thought is understood as 'what makes or creates an experience of being in the phenomenal world?'....

Phenomenal world is a state of existence and is created from consciousness. So there are states and subtle forces that are related or connected to create the self and the pattern of thoughts that get created therefore and the cycle of thoughts that create an experience. Everything is a 'force' that 'becomes' and creates 'awareness'. So _what_ lives? Does the body live or the mind or the force? 

Another word for force is 'vibration'. The property of consciousness is to 'vibrate'. And this means to become, create, to be a force, intermingle, cause a movement, appear, disappear, related, connect, split, combine, cause a mind, sense a body, sense awareness, create 'i' and so on. 

The effect of vibrations (or the simple fact that there is consciousness) raises the entire nature of the phenomenal world of forces and forms and imagination, which entirely *depend* on consciousness and create an *experience* (imagination) of duality and it's engagement.... 

So is the state of affairs!

Hari Om.

श्री

 

श्री,

 

विचार एका प्रकारे निर्माण झालेली गोष्ट आहे, कुठल्याही इतर वस्तू सारखी. निर्मिती म्हणजे ज्याचा उगम भगवंत ठरवतो, त्याच्या शक्तीच रूपांतर होत एखादा गुण घेऊन आणि इतर सर्व गुणान बरोबर त्याचा संबंध राहतो. म्हणजे एकाच वेळेला स्वतंत्रपणे अहं वृत्तीचा भाव असते आणि त्याच्या पलीकडची विशाल संबंधांची जाणीवही असते. या दोघा भावनेतून आकारास कुठलीही वस्तू येते. म्हणजे जिवामध्ये जो अनुभव निर्माण होत राहतो त्यात ह्या दोन प्रकारच्या भावना मिसळलेल्या असतात - स्वतः काहीतरी करणे आणि शांत होत राहणे. 

 आता हे कुणी ठरवलं? असं घडणे आणि निर्मितीला येणे आणि कार्य करणे आणि विश्वाचा भाव जाणवणे हे कुणी ठरवले? निर्मितीच्या वस्तूंना हे कोडं माहीत नाही त्यांचे गुण बघितल्यास, पण त्या गुणांच्या मार्गातून शांत होण्याची प्रक्रिया वस्तू किंव्हा जीव घेऊ शकते. त्यात "मोकळी जागा" अनुभवास येते आणि ती सर्व ठिकाणी पसरलेली आहे हे दिसून येत. आपण ज्याला अनुभव म्हणतो, तो सध्या निर्मिती मधून उदयास आलेला आहे. म्हणून तो कायम नाही, बदलणारा आहे आणि इतर सर्वात गुंतलेला आहे. हा अनुभवाचा किंव्हा विश्व भावनेचा गुण धर्म आहे. म्हणून त्या अनुभवाचे घटक - म्हणजे वृत्ती, विचार, भावना आणि शरीर उदयास येतं राहतात. शक्तीच रूपांतर होणे आहे आणि त्याचा परिणामही आहे ( किंव्हा त्याचच कार्य आहे असं म्हणायला हरकत नाही). 

 आता गफलत अशी होते आपल्या समजुतीत की ह्या साऱ्या प्रक्रियेला आपण "मी" समजतो. तसा भाव उत्तेजीत ठेवतो. म्हणून ती भगवंताची इच्छा न समजता, आपण स्वताच्या अस्तित्वाची काळजी करत राहतो आणि बदलांना घाबरतो. त्यातून अट्टाहास, ताबा, राग अश्या भावना निर्माण करतो! ते नाहीसे करण्यासाठी अजून गुंतून राहतो आणि प्रपंच काही संपत नाही. जनमो जन्मी तीच गत राहते आपल्या वृत्तीत! 

 म्हणून भगवंताची जाणिव वाढवण्यास सर्वात मोठा निर्णय आहे. त्या शक्तीच जागे होणे आहे स्वतःच्या जाणिवेतून. आणि त्यातून प्रवासाचा खऱ्या अर्थाने आरंभ आहे.

 अशी जागे होण्याची स्थिती कधीतरी येते. परिस्थिती महत्वाची नाही. जागे होणे आहे.  आणि मग अनुभव कसाही असो, आणि कुठल्याही आकारात साकार हो, तो भगवंताच्या इच्छेमुळे आला आहे आणि तो त्याच्याकडे नेणार आहे, अशी श्रद्धा वाढत राहते. पुढे, आता, मागे हे साऱ्या गोष्टी असणार, कारण त्यातून शांतीची वाट रचली आहे. 

 वास्तुशास्त्र मध्ये, transition and continuity, या संकल्पाना महत्व दिलं जातं. कुठलीही गोष्ट स्वतंत्र बघण्यापेक्षा एकातूनेक निर्माण झालेली आणि पुढे नेणारी जाणून घेणे. इथे मतितार्थ आहे व्यक्ती रेखाटनेचा, भवतालच्या साऱ्या वातावरणाचा, इतिहास ते संस्कृती ते भविष्याचा, मानवाचा, सर्व जीवांचा, निसर्गाचा वगैरे. हे घटक वेगळे किंव्हा स्वतंत्र नाही. एवढ जरी अत्मसाद केलं तरी कलाकृती करुणाने भरलेली दिसून येईल/ जाणवेल.

 

हरि ओम.

 

 

 

Wednesday, June 05, 2024

श्री

 श्री,


शक्ती म्हणजे निर्मिती आणि निर्मिती मध्ये जाणीवा, बुद्धी, भावना आणि आकार आले - त्यांचेही स्तर आले (सूक्ष्म ते स्थूल) आणि प्रत्येक स्तरात "मी" ची त्या प्रमाणे _भावना_ आली. 

म्हणजे "जीव" होण्याची क्रिया दर्शवणे हे शक्तीच कार्य आहे आणि भगवंताची जाणीव होत त्याच्या पर्यंत पोहोचणे हा झाला आपला प्रवास (शक्तीच परत शुध्द स्वरूप जागं करणे). 

ज्या गुणांना (किंव्हा त्यांच्यामुळे) "मी" होतो, त्यांना मी खरं मानतो म्हणून सत्याला त्या गुणानपासून निराळं बघू शकत नाही. म्हणजे माझ्यावर गुणांचा खोल परिणाम होत राहतो, त्या शक्ती चक्राचा परिणाम. त्याचा परिणाम म्हणजे द्वैत्मय जग, अनुभव, बदल, गती, सुख दुःख वगैरे. हे त्या शक्तीचा स्तरांमुळे होणारे "अनुभव चक्र" आहेत. अनुभवही एका स्तराची जाणिव आहे. सर्व ह्या अनुभवांना आपण _अहं_ म्हणतो - वागण्याची सवय किंव्हा पद्धत किंव्हा स्वभाव. 

आपल्याकडे पर्याय नाही, पण शुध्द होत राहणे हाच उपाय आहे. प्रत्येक अनुभव प्रवास मानला, तर त्याचा शेवट भगवंत आहे, हे जाणून घेणे. गोष्टी एकातएक घडतात (unfolding) आणि ते होणे कुठल्याही पद्धतीने आणि तसं होऊ देणे, कारण तिचं भगवंताची इच्छा आहे, असे समजणे.

अनुभव स्वतंत्र जरी वाटला जीवाला तर तसा तो नसतो. परिस्थिती, व्यक्ती, वस्तू ह्या संकल्पना विस्तारलेल्या आहेत - त्याच प्रमाणे अनुभव. तो स्वतंत्र नसतो म्हणून बऱ्याच गोष्टी तो दर्शवतो आणि तो विशाल होऊ शकतो, सूक्ष्म स्तर जाणून घेऊ शकतो, सर्व जीवांना एकत्रित बघू शकतो. म्हणजे अनुभव किती विशाल करायचा आहे, ते जीवावर आहे - प्रत्येक जीवात ती क्षमता आहे. त्या क्षमतेला जागं होण्याची गरज आहे.

Man (which means any experience) is a measure of things. The expanse of experience should keep increasing.

हरि ओम.

Sunday, June 02, 2024

श्री

श्री,

अभ्यासाचा हेतू ह्या प्रमाणे असावा:

जीव म्हणजे काय? त्यात होण्याची क्रिया आहे. स्वतःच अस्तीत्व जाणवणे म्हणजे एक निर्मितीची क्रिया दर्शवते आणि त्यातून " मी " होत राहतो. भगवंत अंतिम सत्य मानला तर आपल्या कारकिर्दीला कितपत महत्व द्यावे हे जीवाने स्वतःच्या अनुभवावरून ठरवावे. निर्मिती होणे म्हणजे अद्वैतातून द्वैताच्या अनेक स्थितीत वावरत राहणे. द्वैताच्या उलट (किंव्हा द्वारे) आद्वैतानुभव घेण्याची शक्यता असते. आणि हाच संबंध श्रद्धेने प्रज्वलित होतो. 

क्रिया होतांना, प्रत्येक स्तराचे त्याचे त्याचे परिणाम किंव्हा विचार चक्र निर्माण होत असतात आणि ते हेतू आणि कार्य घडवतात. प्रत्येक स्तर हे भगवंताच्या शुध्द शक्तीचे वेगळे रूप आहे (परिवर्तन आहे/ परावलंबी स्थिती आहे/ द्वैत आहे/ आकार आहे/ संबंध आहे/ बदल आहे).

सर्वात स्थूल किंव्हा दृश्यात येणारी शक्ती म्हणजे " जीव ". ह्याचा अर्थ असा की जीवाच वर्तन एका शक्ती चक्रातून होत राहत, ज्याला त्या अनुभवाला " मी " ग्राह्य धरतो. 

मग तसं पटल्यास, कुठल्याही प्रकारची वृत्ती असली ( शक्ती चक्र ), ती विचार शरणी, भावना आणि अर्थ  स्वतः भोवती केंद्रित करते आणि देत राहते. An *_exchange_* of energy fields or *_interactions_* of different vibrations happen.

ह्या प्रक्रियेला "अहं किंव्हा स्वार्थी असणे" असं म्हणतात. जो पर्यंत अस्तित्वाची क्रिया जाणवत नाही, तो पर्यंत ह्या शक्ती चक्राचा परिणाम आपल्या मनावर खूप खोल राहतो, आणि आपण सुख दुःख भोगतो. मन हे शक्तिरुप आहे, पण सध्या ते विशिष्ट पद्धतीने वावरत राहत, म्हणून तसे अनुभव आपल्या पदरी निर्माण होतात. 

वरील गोष्टींची जशी स्पष्टता येते, तशी आपल्याला भगवंताची ( शुध्द होण्याची ) गरज वाढत जाते आणि मग महत्वाचा प्रवास सुरू होतो. 

त्यावरून सैय्यम आणि श्रद्धेचे महत्व प्रज्वलित होत राहत.

हरि ओम.