Saturday, June 28, 2025

श्री

 श्री


भाव जाणवणे ह्यात क्रिया आली, साखळी आली, संबंध आले, परिणाम आले, घटक आले, सूक्ष्म ते स्थूल स्तर आले. हे कार्य अस्तित्व शक्तीचे असते आणि त्यातून सर्व वरील क्रिया होत राहतात. 

ह्याचा असा अर्थ होतो की कार्याचे उगम किंव्हा प्रतिक्रिया देण्याचे उगम सूक्ष्म स्थितीतून निर्माण होते, जी दृश्य भावाच्या पलीकडे असते. दृश्याला मर्यादा आहेत, पण अदृश्य माध्यमाला नाही. म्हणून पर्यायाने, सर्वात महत्त्वाचे कार्य आपल्यासाठी हे आहे की अदृश्य माध्यम व्हायचे, किंव्हा शांत व्हायचे. रूप जरी नसलं, तरी अदृश्य मध्यम असतंच. म्हणून _मी_ जरी नसलो, तरी सत्य असणारच. किंबहुना माझ्या नसण्याने सत्य भाव स्थिरावेल. ह्याचा अर्थ सत्य भाव माझ्या पेक्षा खरं, विशाल, सूक्ष्म, कायम, शाश्वत आहे. मग मी स्वतःला एवढा का चिकटून घेतो?!!...

शांती होण्याची क्रियेला काळ द्यायला लागतो, श्रद्धेतून आत्मसात करायला लागते आणि कृपेची प्रार्थना करायला लागते. 

इंद्रियांचे कार्य, दृश्याशी संबंध खूप खोलवर संस्कार करतात. त्यावरून आपण दृश्य जगात वावरत राहतो. म्हणून विचारांच्याही पलीकडे आणि सूक्ष्म कार्य वावरत असतात. त्यासाठी श्रद्धेच स्थान जीवनात आणायला लागते. 

हरि ओम.


श्री 

संकल्पना बहिर्मुख असते, म्हणजे ती संबंधित असते, बदलत राहते, साखळी दर्शवते, भावातून येते, द्वैतात वावरते, सिद्ध होऊ पाहण्याचे बघते. An idea has all these ingredients. 

प्रश्न असा आहे, की जर हेतूच्या पलीकडे जाणीव झाली तर, संकल्पनेला काही स्थान असते का?! अनुभव होणे हे हेतूवरून संकल्पित होऊ शकते किंव्हा निरहेतू च्या जाणिवेतून सुद्धा. म्हणजे अनुभव सिद्ध करायला त्याचा वापर केला जाऊ शकतो किंव्हा त्याच्या शिवाय ही, एक निमित्त सारखे. 

माझ्या मते, अनुभव निर्माण होतो, तो वावरत राहतो, तो बदलतो आणि तो निघून जातो. अनुभव म्हणजे अस्तित्व नाही. त्याला "मी" संबोधित करून आपण चूक करतो. ह्याचा अर्थ हा, की अनुभव _व्यक्तिक्त_ वाटू शकतात आणि त्याच्या मुळाशी गेलो, तर अस्तित्व भावात ते सर्व घटक विलीनही होऊ शकतात. म्हणून अनुभव व्ययक्तिक व्याख्याशी निगडित होत असतील, तर ती एकच मर्यादित अस्तित्वाची छटा आहे. 

हे आपण मान्य करत नाही, म्हणून खूप मतभेद होतात. बोलणे काय, मतभेद मांडणे काय, एका अर्थ वायफळ बडबड असते. शांत व्हावे आणि काहीही सांगण्याची गरज पडू नये.

हरि ओम.

Monday, June 23, 2025

श्री

 श्री 


नामाचा अर्थ खूप मोठ्ठा आहे...

नाम ही शक्ती आहे विश्व निर्माण करण्याची. शक्ती म्हणलं तर त्यात कार्य आले, क्रिया आले, संबंध आला, परिणाम आला, भाव आला, जाणीव आली, अनुभव आला, चक्र आलं.

नाम म्हणजे शक्तीचे अनेक स्तर. एखाद्या स्तरात आपण असतो आणि त्या प्रमाणे अस्तित्वाचे _स्मरण निर्माण_ होते. म्हणजे स्मरण स्तरावर ठरते. कुठल्याही स्तरावर अस्तित्व शक्ती असतेच कार्य करत, म्हणून नाम घेत असताना सूक्ष्म स्तरा पर्यंत आपलं परिवर्तन होत राहतं. 

नाम घेणे म्हणजे वासना क्षीण होणे आणि त्यातून होऊ पाहणाऱ्या कृती क्षीण होणे. थोडक्यात वासना विलीन झाली किंव्हा शांत झाली की जाणीव पूर्णपणे सूक्ष्म होऊन शुद्ध अस्तित्व शक्तीचे दर्शन होते. 

जगात वावरणे म्हणजे शक्तीच्या एका स्तराचे दर्शनच असते. दर्शन म्हणलं, तर त्यात " मी करता आहे " ह्या भावनेला स्थान असू नये. म्हणजे नामाने अहं वृत्ती क्षीण होत जाणे अभिप्रेत आहे. 

नाम घेणे म्हणजे मायेचा लोप होणे. माया देखील शक्तीचे एक दृश्य चिन्ह आहे, ज्यात मन, स्मरण अशा गोष्टी गुंतल्या असतात आणि वेगवेगळे वाटतात. नाम घेत गेल्यावर, अहं वृत्ती क्षीण झाल्यामुळे, त्याच बरोबर मायेचा परिणाम क्षीण होत जातो. शेवटी मायेचा पूर्ण अभाव होतो आणि समाधान भाव प्रकट होते. 

नाम हा प्रवास आहे, जो बिंदू पासून (चिकटण्या पासून) ते आकाश पर्यंत (मोकळे होण्या पर्यंत) घडवून आणतो. म्हणजे _गोष्ट_ निर्मिती असते, तिला प्रत्यक्ष तसं काही मुल्य नाही. किंव्हा गोष्टीचे उगम, वावर, संबंध, निघून जाणे - ही भगवंताची शक्ती ठरवते, आपण नाही. म्हणजे ती शक्ती कायम असतेच अस्तित्वात. 

नाम घेणे म्हणजे विघटन क्रिया विलीन होणे. विघटन विलीन होणे म्हणजे एकच गोष्ट किंव्हा सत्य सगळीकडे दिसणे, त्याचे दर्शन होणे. 

नाम घेणे म्हणजे संकल्पना वस्तूपासून ते शुद्ध आकाशा पर्यंत होणे. भगवंत सत्य भाव आहे, अद्वैत आहे, स्थिर आहे, शाश्वत आहे, कायम आहे....तो वस्तू नाही. 

नाम घेत गेल्यावर बुद्धिभेद मंदावते आणि ती मंदावत असताना श्रद्धा भाव प्रज्वलित होत जाते. म्हणजे आपण स्वतः शांत होतो. जगात सर्व चांगलच होत आणि ते योग्य होतं, ही श्रद्धा मनात उदयास येते. काही अपेक्षा राहत नाही, हेतू नाही, अट्टाहास नाही, चिंता नाही, त्रास नाही. म्हणजे सर्व घटकांच्या पलीकडे मन अस्तित्वात राहते, म्हणजे ते सूक्ष्म आणि शुद्ध होते.

हरि ओम.

श्री

श्री 

रूप, आकार, दृश्य, अनुभव, प्रवाह, हालचाली, भाव - _ह्यांच्याशी आणि ह्यांच्या द्वारे संबंध_ अनेक प्रकारचे असू शकतात. म्हणजे *संबंध* ह्या संकल्पनेला दोन अर्थ आहेत - स्वतः शक्तीशी संबंध आणि शक्तीतून होऊ पाहणारे संबंध! आपले संबंध शक्तीशी शुद्ध झाले (व्ययक्तिक घेतले गेले नाही), तर त्याच्या क्रियेतून इतर होऊ पाहणारे रूप आणि आकारांशी संबंध देखील शुद्ध होतील! म्हणजे इथे अंतर्मुखपणा किंव्हा आत डोकावून मन स्वच्छ करणे हे अभिप्रेत आहे. जर मन मोकळे झाले तर त्या क्रियेतून होणाऱ्या गोष्टींशी आपला मनाचा संबंध मोकळा बनेल. म्हणून जो अभ्यास आहे तो मनाचा आहे, ते काय प्रकट करते आणि कसे प्रकट करते, ह्यावर केंद्रित आहे. 

आतील भीती किंवा गोंधळ बोलून दाखवणे त्यासाठी महत्त्वाचं आहे - त्यातून मन मोकळं होतं. ते मोकळं झालं की सर्वांशी संबंध मोकळेपणाचे होतात. 

प्रत्येक व्यक्ती त्या शुद्धतेचा शोधात असतो. म्हणून आपण उघडे असावे, असे मला वाटते. लपवण्याची काहीही गरज नाही, की पळून जाण्याची की गप्प बसण्याची की धूळ फेक करण्याची की कसलाही आव आणण्याची. 

कुठलाही वास्तुकलेतील आकार, जो मोकळेपणा अनुभवात _प्रकट_ (it should be a present continuous tense) करेल, तो उत्तम आहे असे मला वाटते. म्हणजे मोकळेपणा सतत प्रकट करावा लागतो, ती काही वस्तू नाही किंव्हा आठवण नाही किंव्हा संकल्पना नाही. त्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचे ठरते. आधी होऊन गेलेल्या गोष्टी जरी थोर असल्या, तरी आत्ताच्या क्षणी आपल्याला परत मोकळेपणा निर्माण करायला लागतो. म्हणजे स्मरणाच्या पलीकडे जायला लागतं.

हरि ओम.

Saturday, June 21, 2025

श्री

श्री 

अनुभवात टप्पे जे असावेत त्यातील संबंध ह्या क्रमाने शुद्ध होत असावेत - नाविन्य, स्थैर्य, वैराग्य आणि विलीन होणे. आपण पारखावे की कुठल्या टप्प्यावर आपला अनुभव खुणावतो आहे आणि दृश्याशी संबंध जोडतो. हे सारे टप्पे ओलांडून भगवंताचे दर्शन होत असावे. 

वरील टप्प्यांना साखळी म्हणावी किंव्हा परिवर्तन क्रिया किंव्हा बहिर्मुख ते अंतर्मुख होण्याची दिशा, किंव्हा अस्थिर ते स्थिरताचा प्रवास किंव्हा शुद्ध होत जाण्याची प्रक्रिया, किंव्हा अहं वृत्ती मंदावणे किंव्हा इंद्रिय ते जाणीव ही वाटचाल किंव्हा हेतू ते निरहेतू होत जाणे किंव्हा बिंदू ते प्रवाह जाणून घेणे किंव्हा विचार ते श्रद्धेचा प्रवास वगैरे.

म्हणजे अनुभवात बदल होणे शक्य आहे आणि वरील टप्पे हे सुचवत असावे की बदल होण्याचा मार्ग तो कोणता आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


प्रत्येक व्यक्तीला पूर्णत्वचा शोध आहे. कदाचित तो उपजत भाग असावा जीवाच्या शक्तीचा. म्हणून आधार अनुभवण्याची गरज आणि कायम तळमळीची भावना ह्या दोन गोष्टी असाव्या अनुभवात. इथे नोंद घ्यायला हवी, परत, की _अनुभव_  ही अस्तित्वाने निर्माण केलेली क्रिया आहे, तसे ते कार्य करत राहणार. अस्तित्वाचा तो स्वाभाविक गुण असल्यामुळे, तो कार्य करत राहणार, म्हणून क्रिया करणार आणि त्याचं प्रतीक म्हणजे अनुभव निर्माण होत राहणार. 

निर्मिती प्रक्रियेला सुरुवात, मध्य आणि शेवट तसे नाही. ते चक्र असावं, म्हणून त्याच भाषेची संकल्पना म्हणजे _शांत_ होणे असे आहे. त्या चक्रातून किंव्हा त्या चक्रामुळे जे जे काही अनुभवात प्रकट होईल, ते विलीन करणे आहे. विलीन म्हणजे पूर्णत्वकडे वाटचाल. म्हणजे शुद्ध जाणीव. म्हणजे भगवंताचे दर्शन.  

अस्तित्व शक्तीला जीवासाठी चक्राच्या भाषेत समजून घ्यायला लागत असावं. नाम घेत गेल्याने चक्राची परिभाषा बदलते, ती अधिक सूक्ष्म होते, विशाल होते, परिवर्तन पावते आणि शेवटी स्थिरावते. परिवर्तन कसे ओळखावे? अनुभवाचे रूप बदलत गेल्यावर, नामाचा योग्य परिणाम होत आहे, असे ओळखावे. 

आपण ज्याला आयुष्य म्हणतो, ते शक्तीचे कार्य आहे, चक्र आहे. त्यात शांत होणे, म्हणजे सध्याच्या चक्रेच्या परिणामात परिवर्तन करणे, म्हणजे वृत्ती विलीन होणे. 

हरि ओम.


श्री 

अनुभवात नाविन्य, स्थैर्य, विलीनता, वैराग्य असे घटक प्रत्येकाच्या जीवनात येत असावे. त्याचे रूप, आकार, परिस्थिती अनेक, पण सर्व विविध परिस्थितीच्या पोटाशी काही सार्वजनिक महत्वाचे आणि अंगभूत भावनांचा परिणाम होत असावा. 

जी काही इंद्रियांच्या भाषेत विविधता दिसून येते, ती वरवरची असते. त्याच्या मुळाशी, जिथे जाणिवेची परिभाषा कळते, तिथे सर्व सामान्य, सामूहिक, भावना असाव्यात, जे दृश्यात हालचाली घडवतात. 

मग हालचालींवर लक्ष का देणे, हा प्रश्न स्वतःला विचारावा. ते इतके गौण आहे, की ते नसले तरीही काही बिघडत नाही. मनाच स्वास्थ्य बिघडण्याचं कारण हे, की ते उगाचच वरवरच्या हालचालींना जास्ती मुल्य देतं राहतं. तर तसं करू नये. त्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


भीती हा खूप गूढ प्रकार आहे. भीतीपोटी आपण इतके संबंध निर्माण करत राहतो, गुंतून राहतो, अपेक्षा ठेवतो, धावपळ करतो, रागावतो, त्याला काही अंत नाही. भीतीचे दुसरे नाव माया किंव्हा अहं वृत्ती. भीतीचे मूळ कुठून येते किंव्हा ते कसे निर्माण होते, हे शांतपणे बघावे.

दुसऱ्यांची भीती घालवणे महा कठीण, मग ती बायको असो किंव्हा आई वडील, किंव्हा कुठलेही दुसरे किंव्हा आपल्यापेक्षा वेगळे रूप किंव्हा कुठलीही स्थळ + काळाची परिस्थिती. ह्याचा अर्थ की "वेगळा" भाव धारण करणे, ह्यात खूप क्रिया होत राहतात आणि शेवटी जड + विविध आकार आणि परिस्थिती आपण अनुभवतो...तसा _संबंध_ आपण ठेवतो, गुंतून राहतो. परिस्थिती प्रवाह सारखी बदलत असलेली जरी वाटली तरीही आतील उदयास होणारा भाव तसाच आपण धरून ठेवतो. मग जग सुधारायला हवे, अशी अपेक्षा करणे किती पोकळ ठरेल?! 

जग दुसरे तिसरे नसून, ते आतील भावनेच किंवा वासनेचे प्रतीक आहे. त्यालाही आपण चक्र म्हणू. मुळातील प्रश्न स्वतःचे असतात, स्वतःसाठी असतात, स्वतः उत्तर कळण्यासाठी असतात - त्यात दुसऱ्यांना दोष देऊन उपयोगाचे ठरत नाही, कितीही जरी त्रास झाला तरीही. 

ही परिस्थिती समाधानी कशी वाटेल आपल्याला, हे बघावे. समाधान होणे म्हणजे काय, हे ओळखावे आणि तसा अभ्यास हाती घ्यावा. बघितलं तर आपण दृश्याच्या प्रभावाखाली हैराण झालेलो असतो, पण मान्य करायचं नसतं! कुणी सत्य सांगितलं तर ते ऐकवत नाही आणि त्यालाच दोषी ठरवायला निघतो! 

सत्य पचनी व्हायला भगवंताला विसरू नये. भगवंत स्मरणात ठेवणे म्हणजे ती काही वास्तू नाही, ती शुद्ध आणि स्थिर स्थिती होण्याचा प्रयत्न आहे. 

बाकी त्याचे आपल्याकडे लक्ष आहेच...

हरि ओम.

Friday, June 20, 2025

श्री

 श्री 


सगळी सुरुवात स्पंदनातून होते आणि ती वासना चक्र, प्राण चक्र आणि आकार चक्र निर्माण करते. चक्र हा शब्द महत्वाचा त्यासाठी आहे, की सगळ गुंतलेलं, बदलणारं, तात्पुरते आणि त्यामुळे मर्यादित भासत. ह्या स्मरणाला आपण भाव म्हणतो. आपला भाव अहं वृत्तीचा आहे. तो भाव जसा शुद्ध होईल,  तसा चक्राचा परिणाम बदलेल, स्मरण बदलेल, संकल्पना बदलेल, मन बदलेल आणि अनुभवाचे रूप बदलेल. 

सध्याच्या जीवनात _मी_ हा भाव आणि शुद्ध भाव ह्यात फरक आहे. मी काही खरा नाही, ती एक निर्मिती आहे, जी वावरेल, गुंतले जाईल, बदलेल आणि विलीन होईल एक दिवस. म्हणून आलेल्या अनुभवाचे स्वरूप, ज्यात मी गुंतून राहतो, हे तसेच असते म्हणून त्या हालचालींना मी खरे मानतो, त्याला प्रतिक्रिया देतो वगैरे. 

प्रश्न असा आहे की मग अनुभवाचे स्थान काय आणि अनुभव म्हणजे काय आणि त्याकडे कसे बघावे आणि कसे संबंध ठेवावे? 

हे जाणून घेण्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


प्रत्येकाची स्थळाची आणि काळाची व्याख्या वेगळी असते. म्हणजे कुठल्या संकल्पनेतून, विचारातून, वासनेतून, वृत्तीतून दृश्य निर्मिती होते आणि संबंध जाणिवेत प्रकट होतात, हे प्रत्येकासाठी वेगळे असते. म्हणजे ते अपुरे, बदलणारे, गुंतलेले, तात्पुरते असे ही असते. 

म्हणून व्यक्तीला समजून घेणे म्हणजे ती व्याख्या आपण धारण करणे असे होते. किंव्हा त्या व्यक्तीमध्ये जे गुण अथवा अवगुण असतील, ते आपण धारण करणे. म्हणून समजून घ्यायला मर्यादा असतात किंव्हा त्याने समाधान नाही मिळत किंवा आपण भीतीकडे वेगळ्या चष्म्याने बघतो! एखाद्या व्यक्तीची परिस्थिती पूर्णपणे समजुन घेण्यात, त्यातील सर्व घटक आपण समजून घेतो आणि ती परिस्थिती आपल्या जीवनात ओढून घेतो! असे आहे मनाचे स्वरूप! 

म्हणून संत सांगतात की "विषय" किंव्हा दृश्याच्या नादी लागू नये, कारण त्यातून समाधान नाही आणि तात्पुरतेपणा जसा आहे, तसाच राहणार आहे! काही जीवनातील कोडी कळत नाही, त्याने त्रासून जाऊ नये किंव्हा चिंता करू नये. ते त्या क्षणाला न कळणे आपल्या हिताचे होते आणि ते नंतर कुठल्यातरी रूपात कळेल ही खात्री बाळगावी. म्हणजे सर्व कळून येते कधी ना कधीतरी. त्यासाठी उतावळे होण्याची गरज नाही. 

कुठले रूप किंव्हा संबंध कसे सामोरे येतील ह्यावर श्रद्धा ठेवावी. स्थळ, काळ, पूर्वीच्या संकल्पना आणि उद्याच्या संकल्पना हे कसे उलगडतील ह्यावर श्रद्धा ठेवणे. आपण जसे शांत होतो, तसे हे सर्व संबंध समाधान देण्यासाठी उलगडतात. कशाचीही घाई करू नये. 

शक्ती, हे चक्र आहे. त्याची एक क्रिया आहे आणि त्यातून होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचा परिणाम आहे. म्हणून आपल्या अनुभवात गोष्टी येतात आणि निघून जातात. गोष्टींचे होणे, वावरणे आणि निघून जाणे, ही नैसर्गिक आणि दैवी क्रिया आहे, म्हणून त्याला स्वच्छ मनाने स्वीकारावे. त्यात कुठलाही स्वार्थी हेतू ठेवू नये. जे आले ते येणार होते आणि जे जाणार ते जाणारच होते. 

आपली वृत्ती स्थिर करावी - म्हणजे वरील हालचालींवर वृत्तीची भाषा अवलंबून करू नये. ह्याचा दुसरा अर्थ की श्रद्धा भाव प्रकट करावा, ज्यात वृत्ती शांत होतात आणि आपण निरहेतू पद्धतीने जीवनाकडे बघायला लागतो. 

वरील सर्व जाणिवांना संत "नाम" असे म्हणतात किंव्हा नामाची शक्ती कार्य करते किंवा भगवंताचे अस्तित्व जाणून घेणे, असे सांगतात. भगवंताचे कार्य आहे, ह्याचा अर्थ वृत्ती शांत होणे आणि निरहेतू होणे.

Let there be no need to react to anything.

हरि ओम.

Shree

 Shree 


Things don't exist for a justification to be given. That is, existence is beyond justification. Hence why things happen or get created in ways (as a process) is mysterious and seeks no answers. 

Why certain inquiries get created in my mind, for which, answers are revealed soon or later, is mysterious. Why is there a form of space and time and action and engagement is mysterious. Why is there an experience of this phenomenon, is mysterious. 

Why do we seek justification for an inherently mysterious process happening deep within, is mysterious. I don't have any answers of course. But neither should that bother me in any way in creating a lived experience. 

What goes inside, what connections it makes, what gets revealed, what gets realized, what gets created, what gets discontinued - would continue to happen to us. The entirety of the process results in _something_, for which, it wasn't ever personal. 

Incidental effects of above process is called a journey. This life is to experience the journey. Experience has no personal aim or a goal post or a mission. It only is. 

Hari Om.




Shree 

For a lot of time i would force upon myself the habit of relating philosophy with phenomenal effects, as if philosophy can justify the existence of the nature of a phenomenon. Do we need a support of philosophy to understand a phenomenon? 

Just as important it is to propose this question, it is also important I feel, to let the revelation occur and not expect anything or the process of revelation that would be encountered. 

If this situation, as it stated above, becomes acceptable, then perhaps an equilibrium is felt. 

Monday, June 16, 2025

श्री

 श्री 


रुपात जन्म, वावर, बदल आणि मरण अशी क्रिया होते आणि ते कार्य भगवंताची शक्ती करते. त्या कार्याचे स्वरूप असे की अद्वैत अदृश्य स्थितीपासून ते द्वैत संबंधित स्थिती पर्यंत गती _जाणिवेत_ येतात. इथे जाणीव भावना मी अस्तित्व भाव म्हणून वापरत आहे. 

ह्याचा अर्थ की जाणीव द्वैत अनुभव निर्माण करू शकते किंव्हा अद्वैत स्थितीत स्थिर राहू शकते. 

पण हे फक्त गणित नाही. वरील कार्य विश्लेषण म्हणून उलगडीत केलं जातं ग्रंथान मधून किंव्हा संतान कडून. प्रत्येक रूपाला किंव्हा मनाला त्याचा त्याचा मार्ग शोधायला लागतो स्थिर होण्यासाठी. सर्व रूपांचे ध्येय अर्थातच एकच असले, तरीही तिथपर्यंत पोहोचण्याची वाट ही दृश्याचा संबंधातूनच निर्माण करायला लागते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून मार्ग वेगळे. 

सिद्ध करण्याची हौस प्रत्येकाला असते. ते ही कार्य भगवत इच्छेमुळे प्रकट होते. त्याच बरोबर असंख्य शंका ही प्रस्तुत केल्या असतात. आणि त्याच्यातून जाणिवेला शुद्ध कसे करावे, हे जोपासले जाते. 

म्हणून त्रास जो आहे, तो त्या करिता असतो. घटकांचा अर्थ काय असावा, तो प्रत्येकाने ओळखावा. जो अर्थ आपण देऊ, तो खरा वाटतो! इथे _अर्थ_ म्हणजे त्यात आपण विलीन होऊन त्याला कार्याचे स्वरूप देतो आणि क्रिया घडवतो. म्हणजे अर्थ खूप खोल ठिकाण्यातून बाहेर प्रकट होतो. अर्थ फक्त शब्दात न राहता आपल्या पूर्ण अंतरंगात भरलेला असतो. 

म्हणून शुद्ध होणे ही क्रिया पूर्ण अंतरंगात परिवर्तन करून घ्यायची असते. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

श्री

 श्री 


तीन विचार...

कार्य किंवा कुठल्याही घटकेत आपला वावर का होतो, त्यातून आपुलकीचे काही दोरे कारणीभूत असावेत. म्हणजे घटक अडवून न ठेवता, ते "येऊ देणे आणि वावर होऊ देणे आणि निघून जाऊ देणे". अशी भूमिका ठेवल्यामुळे नकळत आपले योग्य परिवर्तन होतं. परिवर्तन म्हणजे शांत होणे. ह्याचा हा अर्थ आहे की शांत होणे म्हणजे प्रवासातून जाऊन, अनेक परिस्थितीला सामोरे जाऊन, शांती संक्रांत होते. प्रवास अटळ आहे, मग तो शांतीने स्वीकारावे.

कुठलाही घटक, विचार, भावना, रूप हे इतर घटकां बरोबर गुंतले गेले असते. म्हणजे त्यात मुळातच हालचाल, गती, बदल, संबंध असे अनेक गोष्टी त्याला निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे एकच गोष्टीतून निर्णय देण्याची घाई करू नये. सैय्यम हवा. ह्याचा असाही अर्थ निघतो की कुठल्याही गोष्टीचे मूळ दृश्यात मिळत नाही, किंबहुना ते अदृश्यातच असतं. म्हणून सर्व गोष्टी हे भगवत इच्छेने साकार होत असतात.

तिसरी गोष्ट ही की वासना शांत कधी होतील ह्याला भगवत इच्छा आणि कृपा लागते. म्हणून प्रयत्न करणे, एवढेच आपल्या हातात आहे - कशाचाही बाबतीत. योग्य परिवर्तन तो घडवून आणतो. 

हरि ओम.

Shree

 Shree


Creation 's experience can't be foretold and this is most natural. Creativity comes when it is set in motion. For critical stance, we may ought to engage with creative ideas to understand what we are creating. 

Most people perhaps fear the unknown in creative venture but that's ok. I mean I too have taken enormous pressure to prove something by giving a creative solution. But I have started to feel that this pressure is seriously not required. Creation obviously takes within a situation but can definitely go beyond the same. Context is relative, a construct of the mind, so it can have some made up demands. Creation may not or shouldn't adhere strictly to any demands as such. How can you control the unknown?!! 

So be free of everything. By this I mean to be simple and non judgemental and realize the crux. Along the way of course, people may royally misinterpret such intentions and place you under some radar or some containment. But a choice still exists if one is answerable to such fictitious demands and should one be defined by anything?!

Hari Om.

Shree

 Shree 


In continuation of the above thought, it is observed in different examples the necessity to create a _disoriented_ experience or an experience that creates some turbidity. 

From my niece I heard that students get reshuffled every academic year with the hope that new friends are made, new situations are encountered and so on...There seems to be belief that one will fix hard on an individual as a friend of the same batch of friends continue till 10 th STD. In this case mixing may mean different opportunities.

There are programs or workshops wherein an 'Expert' is called to undertake exercises in sets of teams to break hierarchical behaviour of boss and workers and collaboratively work to generate creative ideas. The belief seems to be that creativity gets stiffled if the same set of conditions of people, processes continue in an organization. 

And there might be many more consciously done efforts to change the status quo of a situation. 

This was also done culturally in our consciousness. The idea behind यात्रा, पालखी, परिक्रमा to encounter a completely different set up of environment may suggest a similar concern and a similar opportunity of broadening one's consciousness.

And at a more fundamental level of our mind, we may consider this tendency of expansion and contraction (or resisting change of any kind). As humans, we pendulum between these two tendencies and it is the critical stance and effort that can ensure progressive expansion of our mind.


नामस्मरण करण्याचा हेतू तोच.

Hari Om.

Shree

Shree 

As architects, I think, we have the right to _design experiences_ that may necessarily not be targeting any measurable (or immediate) parameters of life or efficiency or whatever imagination of demands mean, but it means to always have a notion of beyond.

In that sense, design may address universal experiences (as an overall approach to creation, since I prefer to believe that a person cannot become isolated or hardened to his/her own beliefs) and offer, in the end, innumerable opportunities to feel a person at home. 

Therefore, what are such universal experiences? It would mean that this is an action of discovery and there are limitless 'forms of spatial organizations' that can convey/ express this idea or a concern. 

An architect ought not to be guilty or feel shameful if a form appears completely weird but it contains universal experiences of home coming. 

The experience is the start point, middle, end and complete.

Times are such, that even above approach is demanded to be articulated to utmost detail. Frustrating of course, since as a phenomenon, we are beyond any fixed notions and hence we can consider ourselves to bask in this ambiguous terrain! म्हणजे उगाचच बाऊ करण्याची गरज असू नये...आणि कुणी केल जरी बाऊ, तरी ते दुर्लक्ष करणे!

This has repercussions of course, on our lives. There is a general confusion regarding that one always ought to remain preoccupied trying to produce or fix something! Personally, i hate this stance, but to resist the urge of not producing anything also comes with its own complications! 

There is also a confusion about speed, multitasking, urgency, explicitness, deterministic products, efficiency, articulation, logic and a couple of other things. Well, I think one can't be held responsible for fixing the confusion. Clarity is for the self, not to prove anything.

Perhaps the approach would be to just let things be as they are and not bother about maths of life, as in where will all our steps lead to and so forth...or should 1+2 must always be 3 (even in our imagination?!)...

Hari Om.

Saturday, June 14, 2025

श्री

 श्री 


बोलण्यातून आपण उगाचच विघटित कार्यात गुंतून राहतो, म्हणजे स्वतःचे स्पष्टीकरण देण्यात गुंग होतो! कितीही केलं, बोललो, सांगितलं तरी पूर्ण समाधान त्यात नाही कुणालाही. बारकाईने परिस्थितीतील घटक सांगून आणि उलगडा करून समाधान असते का हे ओळखावे. तसे न केल्याने जे होण्याचे आहे, ते थांबते का? तात्पर्य माझ्यावर काही अवलंबून नसतं. आणि मी म्हणेन तसे काही होईल असे काही नाही. म्हणजे अशी परिस्थिती नैसर्गिक मानायला हवी! 

अस्तित्व भाव, जो अत्यंत शुद्ध होऊ शकतो, तो कुणावर अवलंबून नसतो आणि तो नुसता असतो. म्हणजे तो दृश्यात दिसत नाही, त्याला बघायला आपण सूक्ष्म होणे आले आणि अंतर्मुख होणे आले. ते होताना श्रद्धा ठेवणे आहे, सैय्यम ठेवणे आहे आणि चिंतन करत राहणे आहे. 

सर्व अस्तित्वातील घडामोडी भगवंताच्या शक्तीचे परिणाम दर्शवतात - त्यावर पूर्ण श्रद्धा बसायला हवी. आपण त्याच्या इच्छेच्या बाहेर नसतोच म्हणून काहीही येत गेल, तरी त्याला _प्रसाद_ मानावे आणि ते स्वीकारावे. 

हरि ओम.

Friday, June 13, 2025

श्री

 श्री 


आपण एखाद्या _गोष्टीला_ कसे धरून राहतो, त्याचे स्मरण करतो, संबंध जोडतो, आकारात आणतो, भाव निर्माण करतो - हा प्रकार अत्यंत गूढ असतो आणि तसा त्याकडे बघावा आणि स्वीकारावा. गूढ म्हणजे भगवत इच्छेतून निर्माण होऊ पाहणारे, अस्तित्व शक्तीचे कार्य, क्रिया आणि परिणाम. गूढ म्हणजे स्थळाच्या आणि काळाच्या भाषेत तो प्रकार पूर्ण मांडता येत नाही. इच्छा कशी कार्य करते हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. म्हणून सर्व घटकांचे मूळ भगवंताच्या अस्तित्वात असते, त्या गोष्टीला आपण निर्माण नाही करत. आपली निर्मितीही गूढ असते, वासनेतून होते आणि इतर गोष्टींशी _व्यवहार_ करते. म्हणजे _व्यवहार_ क्रियेचे मूळ देखील भगवंताच्या शक्तित आहे.

म्हणून घडामोडी सूक्ष्मातून होतात. ते होतातच. आपण काही बोललो नाही तरी आतील घडामोडींचे बीज पेरले जात असते आणि त्यामुळे आपल्याला परिस्थिती जाणवते. अंतर्मुख होऊन परिवर्तन होणे, ह्याला सैय्यम आणि श्रद्धेची जरुरी आहे. अंतर्मुख क्रिया सर्व रूपाच्या पलीकडे आहे, बुद्धीनेही ती पूर्ण कळणे अवघड. सूक्ष्म होणे ही स्थिर होणारी गोष्ट आहे, शांत होणे, सत्य जाणणे, असे निरनिराळी नावे आहेत. सूक्ष्माचा प्रवास प्रामुख्याने श्रद्धेने होतो मग इतर रूपाचा पाठिंबा लागतो. रूपांचे पर्यवसान शेवटी पूर्ण श्रद्धेत होणे गरजेचे आहे. 

भगवंत जाणण्याची गोष्ट आहे, पटवण्याची नाही किंव्हा हेतू ठेवून सापडवण्याची नाही किंव्हा मुद्दामून व्यवहारात आणण्याचीही नाही.

हरि ओम.

श्री

 श्री 


शक्तीचे कार्य म्हणजे असण्याचा परिणाम. जीव त्याला कार्य, किंव्हा निरहेतू, किंव्हा परिणाम, किंव्हा घटक असे शब्द लावतो समजून घेण्यासाठी. हे समजून घेणे स्वच्छ मनाने करावे, त्यातून काय मिळेल किंव्हा हेतू अधिक प्रबळ करणे असे विचार करू नये. 

साहजिकच जीव झाल्यामुळे वासना, साखळी, चक्र, प्राण, आकार, दृश्य अश्या गोष्टी होत राहणार किंव्हा त्या प्रमाणे _स्मरण_ घडवणार. त्याने आपण तात्पुरते आहोत किंवा वेगळे आहोत असे भासणार, तसा भाव वावरणार. त्यामुळे खूप कृत्य करण्याची इच्छा होत राहणार. ह्यातून हे कळेल की कार्य कोणाचे आहे, तर एका शक्तीचे आहे! त्या शक्तीच्या असण्यामुळे ह्या सर्व वरील गोष्टी निर्माण होत राहतात, वावरत राहतात आणि बदल पावतात. म्हणजे आपण, आपली इच्छा, अट्टाहास, धडपड, परिणाम, शंका, हे शक्तीमुळे उदयास येते. 

कितीही बारीक सारीक विचार करण्याचा प्रयत्न केला तरीही तात्पुरतेपण जात नाही, कारण त्याच्या पाठीमागे अहं भाव किंव्हा तात्पुरतेपण किंवा भीती असते. 

त्यासाठी सर्व भाव शांत होऊ देणे, हे संतांचे सांगणे आहे. त्याची क्रिया आपल्यासाठी म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.



श्री 

दृश्यात वावरायला लागलो की भीतीतून, सिद्ध करण्यासाठी काहीतरी खटपट करत राहणे, हे जरुरी आहे का?!..

दृश्यात आलो, ह्याचा अर्थ क्रियेचा परिणाम झाल्यामुळे चक्र अनुभवात वावरत राहिले आणि त्याचा एक भाव प्रकट झाला. त्यात अनंत घटक, संबंध, साखळी आले. त्यात स्थळाची संकल्पना आणि काळाची आली. त्यात अनेक जन्मांचे कृती आल्या. 

असो, हे माहित नाही की ह्याचे काय प्रयोजन असतं आणि त्यामुळे कुठला हेतू ठेवावा. म्हणजे आपण दृश्याशी निर्भर राहून चालेल का? असे आपण का करतो?

हे स्वीकारायला नामस्मरण.

हरि ओम.

Wednesday, June 11, 2025

श्री

 श्री 


गोष्ट बदलत राहते. बदल, ह्याचा अर्थ की ती अस्तित्व शक्तीच्या क्रियेतून _निर्माण_ झाली आहे. निर्मिती होणे, हे देखील एक गूढ प्रकरण आहे ज्यात अनेक घटक, स्तर, सूक्ष्म स्थिती ते स्थूल साखळीचे घटक, संबंध, भाव, अनुभव, परिणाम, द्वैत प्रकरण, चक्र, स्मरण, रूप, आकार - हे सारे प्रकार अस्तित्वात _घडतात_. ह्या सर्वांना आपले मन गुंतून राहते, म्हणून मनाचाही उगम खूप गूढ क्रियेतून आणि सूक्ष्मातून झाला असतो. त्याला "भगवंताची इच्छा" असे सांगितले आहे.

मी कसा झालो, का झालो, काय भोग असतात, काय दिसून येतं, कसा वावरतो, कुठे जाणार, कधी जाणार - हे बौद्धिक तर्काच्या दृष्टीने कदाचित माहीत होणार नाही, तरीही शांती प्रकट होणे हे माझे ध्येय आहे - असे स्वतःच्या मनाला सारखे सांगत राहायला लागते. 

गूढ, ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे सर्व विश्व शांतीतून आणि श्रद्धेतून आले आहे, त्याला व्ययक्तिक हेतू अजिबात नाही. "व्यक्ती" म्हणलं तर स्वतःचे रूप आणि आकार अपुरे/ तात्पुरते आहे; निर्मितीच्या क्रियेतून आले आहे आणि भगवत इच्छा दर्शवते. मग _निर्मिती असण्याचे_ सर्व गुण व्यक्ती मध्ये असणार! ह्याचा सरळ अर्थ हा की माझ्या अनुभवांचा सूत्रधार भगवंत आहे आणि म्हणून परिस्थितीतील सर्व घडामोडी त्याच्या इच्छेने आलेले आहेत आणि त्याच्या इच्छेने निघून जाणार आहेत. येणे, वावरणे आणि जाणे, हे त्याच्या शक्तीचे कार्य आहे, हे ध्यानात राहू देणे. 

त्यासाठी नामस्मरण करत राहणे.

हरि ओम.

Sunday, June 08, 2025

श्री

 श्री 


नाम हे सर्व घटकांशी, कार्याशी, स्थळाची, काळाशी आपुलकीचे _संबंध_ जोडतो. जाणीव शुद्ध होते आणि ती सूक्ष्म झाल्यामुळे विस्तार पावते, म्हणजे की सर्व प्रकारचे चक्र, क्रिया, भाव त्या जाणिवेतच सामावतात. हा प्रकार "गोळा बेरीज" करण्याचा नाही आहे, किंबहुना त्या भाषेच्या पलीकडचा आहे. सामावणे म्हणजे सूक्ष्म होऊन शांती अनुभवणे. 

भगवंताच्या अस्तित्वातून, शक्तीतून "आपण" की संकल्पना वेगळी नाही. वेगळे वाटणे हा मानसिक भ्रम आहे आणि त्यामुळे अनंत परिणाम आपण ओढून घेतो स्वतःवर. 

कार्य करणे भाग आहे. मग प्रत्येक व्यवहार नाम घेऊन केलेले उपयोगी ठरेल. कारण त्याने स्मरण राहील की कार्य कशासाठी आणि कुणासाठी केले जाते. संबंध आपुलकीचे होण्यासाठी कर्तव्य करणे भाग आहे, सर्व कार्य करणे महत्वाचे आहे. जे भोग असतील आणि ज्याला सामोरे जायला लागेल, ते करायला लागेल, शांत राहून. त्यातूनच कुठल्याही क्षणी आपुलकीचे संबंध येतील, प्रतिक्रिया उमटणार नाही, शांतीत स्थिरावले जाऊ, निरहेतू होऊ. 

 _संबंध_ प्रकार अस्तित्वाची क्रिया आहे. म्हणून सर्व काही जाणिवेशी निगडीत असते. सत्य जाणणे हे आहे, की जाणीव शुद्ध शक्तीची व्हायला हवी. 

तो अभ्यास नामस्मरणाने होत राहतो.

हरि ओम.




 श्री 

मनात येणारे विचार संबंध जोडतात दृश्याशी आणि ते बोलून दाखवायला हवे नेहमी असे नाही. बोलणे सहज व्हायला हवे. सहजता हेतू नसल्यावर येते. मग जाणिवेतून हेतू मावळला तर कुठलीही क्रिया सहज होते. बोलणे सहज का होत नाही, ह्याचा पाठीमागचा विचार करावा आणि बघावे की त्याच्या आड कुठली वृत्ती येते. वृत्ती म्हणजे स्वार्थीपणा, अहं भाव, देहाची आसक्ती, वेगळेपण वगैरे. 

सर्व वासना भगवंताकडे वळवणे म्हणजे सहज होणे व्यवहारात. ह्याचे दुसरे नाव म्हणजे आपुलकी भाव सर्व ठिकाणे प्रकट होणे. किंव्हा जाणीव शुद्ध करणे.

हरि ओम.

Saturday, June 07, 2025

श्री

 श्री 

चक्र आहे अस्तित्वात, तर जे उगवू ते पेरू आणि जे निघून जाईल ते येत राहणारा. आपल्याला फक्त इतर स्थिती इंद्रियांना दिसत नाही, म्हणून त्याचे स्वभाव _वेगळेपणाच्या_ भाषेत मांडणे कठीण पडते. आपल्याला वाटते की इंद्रिय गोचर एखादी वस्तू अनुभवात आली की त्यावर ताबा मिळवू शकू किंवा नियंत्रण ठेवू शकू. 

मुळात सत्य हे आहे की अनेक कारण मिळून गोष्टी दृश्यात येतात किंव्हा इंद्रिय गोचर होतात...त्याच्या अगोदर आणि नंतरही क्रिया सुरू असते आणि ती क्रिया शक्ती करत राहते. म्हणजे अनंत सूक्ष्माच्या पायऱ्या ओलांडून स्थूलात वस्तू येते आणि निघून जाते. आणि जसे ते येते दृश्यात, तशी स्मरणाची प्रक्रिया बदलत जाते आणि त्या प्रमाणे अनुभव निर्माण होतात. 

कुठलाही क्षण किंव्हा वस्तू स्थूल ते सूक्ष्म माध्यम दर्शवू शकते. निर्णय आपल्यावर आहे की वस्तू म्हणजे काय ओळखावे. 

ह्यातून हे बघावे की कार्य कसे करावे आणि त्याचे महत्व काय. आपण भगवंतासाठी आलो आहे, दुसरे तिसरे काहीही केले, तरी त्यातून चक्रच संपादन होणार आहे आणि द्वैत जीवनात राहणार.

म्हणून शांती चक्रा मध्ये स्थिर होणे, हे आपले ध्येय आहे. 

हरि ओम.



श्री 

अस्तित्वात हालचाली किंव्हा गती असणे असणार. हे सर्व शक्तीचे कार्य म्हणावे, ज्यामुळे चक्र, संबंध, साखळी, भाव, जाणीव ही असतेच. त्यामुळे अदृश्यातून दृश्यात येणे आणि अदृश्य स्थितीत निघून जाणे ही क्रिया घडते. ती घडत असताना द्वैत उद्भवते आणि त्या बरोबर अनेक विचार, भावना ह्यांचे स्थान. "द्वैत अनुभव" निर्माण होतो आणि तो अनुभव असतो जीवाचा. म्हणजे अनुभवाचे ही स्थान निर्माण होते आणि त्यात बरेच घटक, क्रिया सामील असतात. 

अनुभव जीव करतो असे स्मरण आपल्याला असते. पण जीव होणे, ही दैवी क्रिया आहे आणि त्यामुळे अनुभवही त्या क्रियेतून येते. भगवंत निरहेतू माध्यम असल्यामुळे, त्यावरून होणारे सर्व घडामोडींचे मूळ निरहेतू हवे. आपल्याला "वाटते" की हालचालींचे "कारण" एखादी घटना असते, पण तसे वाटून घेणे ही एका प्रकारची जाणीव आहे. सत्य हे सांगतात की जाणीव शुद्ध होऊ शकते, ज्यामुळे अनुभवात स्थिरपणा येतो आणि पूर्णपणे अद्वैत अनुभव प्रकट होतो. 

म्हणून नामस्मरणाचे महत्व.

हरि ओम.

श्री

श्री 

शांती संक्रांत होणे, हे तर्काने जीवाला मांडणे अवघड असावे, म्हणून तिथे श्रद्धेला स्थान लागते. श्रद्धा जीवाच्या रूपाच्या पलीकडे आहे आणि जेवढी ती शक्ती आत्मसात केली जाईल, तेवढी जवळीकता भगवंत बरोबर साधता येईल. भगवंत स्वतः श्रद्धा आहे, स्वतः सिद्ध आहे, शांत आहे, पूर्ण आहे, अंतर्मुख आहे. त्याला त्याच गुणांनी ओळखायला लागतं  - म्हणजे हेच सर्व गुण इतर स्तराना सामावून घेऊ शकतात - म्हणजे हे गुण "पूर्ण" आणि "शाश्वत" म्हणून ओळखले जातात. 

विघटन दिसणे आणि भेद करणे आणि प्रतिक्रिया देणे, ही अस्तित्वाची एक स्थिती आहे. त्याला द्वैत म्हणतो आपण - दोनपणा. वास्तविक सत्य ओळखले किंवा सत्य आत्मसात केले, तर तसे वेगळे दोन विभक्त काहीच नसतं. द्वैत स्मरणात निर्माण होणे हे शक्तीचे _कार्य_ आहे, ते मुद्दामून कुणी करत नाही. कार्याचा उगम शांतीतून होतो, म्हणून त्याला हेतू ही व्याख्या लागू पडत नाही! कार्य _का_ असते, असा प्रश्न विचारून चालत नाही, कारण ते स्वतः सिद्ध आहे! म्हणजे आपल्या रूपाचा उगम, क्रिया, बिंदू, साखळी, पुढे, आत्ता, मागे - ह्यात गुंतून राहण्यात काहीच अर्थ नाही, की ज्यामुळे माझे कर्तृत्व किंव्हा सिद्ध होऊ पाहणे साधेल! आपण असतोच, अर्थाच्याही पलीकडे! 

पलीकडे म्हणजे शुद्ध अस्तित्व. 

हरि ओम.

Wednesday, June 04, 2025

Shree

  Shree 


Forms in the built environment perhaps indicate the presence of flexibility, potential, encounters, natural elements and idea of engagement. Form seems to be an "idea" of belonging / existing hopefully (although these are loaded terms). 

Therefore the intent of form can be profound, vast, collective, hopeful, consciousness, comforting, anchoring...to name a few experiences of space. Our engagement to create a form may respond to above indicated intent. 

Perhaps the best examples in all times till now, may have expressed above intent, _regardless_ of the method used to design. 

 _Regardless_ is an important word. It means that a favourable poetic enriching experience is not limited to (or a function of) a set method of design. Far from it...

Hari Om.

Tuesday, June 03, 2025

श्री

 श्री 


भगवंताला पूर्णपणे मागणे, ही प्रार्थना आहे अस्तित्वाकडे. त्यापेक्षा कुठलीही दुसरी वस्तू मागणे म्हणजे त्याच्याकडे "केरसुणी" मागण्यासारखे होईल!..हे विधान श्री गोंदवलेकर महाराजांनी केले आहे.

म्हणजे कुठलही वस्तू, आकार,  रूप, भाव, साखळी, दृश्यांची स्थिती ही खूप _संकुचित_ असते, एका केरसुणी प्रमाणे ठरते! दृश्य भाव संकुचित असतो, परावलंबी ठरतो, चक्रात अडकतो, विषयात गुंतून राहतो, अहं वृत्ती जागृत ठेवतो, कशालातरी चिकटून राहतो. म्हणून तो भाव कसा शांत होईल, ह्याचा अभ्यास करावा. 

इथे "मागणे" म्हणजे जाणीव शुद्ध करत राहणे हे आहे. म्हणजे शक्तीकडेच, जी स्वतःच्या आत आहे, त्याकडे आपण प्रार्थना करतो.  

प्रार्थनेची क्रिया म्हणजे नामस्मरण. 

हरि ओम

श्री

श्री 

असण्यातून, ह्या स्थितीतून, कार्य होते. असणे आणि कार्य हे वेगळे नाही. म्हणजे असण्याचा परिणाम असणार आणि मुळातील अस्तित्व भावना स्वतः सिद्ध असलेले प्रेम आहे, समाधान आहे, श्रद्धा आहे, स्थैर्य आहे. ते पूर्णतः अंतर्मुख होणे आहे आणि त्या होण्यामध्ये अनुभवाचे स्वरूप खूप बदलून जाणे आले. _मार्ग_ जगण्याचा जो आहे, तो म्हणजे हा. 

मार्ग ही खूप मोठी, गूढ, विशाल संकल्पना आहे. ती नुसती रेघ नाही किंव्हा एका बिंदू पासून ते दुसऱ्या बिंदू पर्यंत जाणे अशी ही सोप्पी व्याख्या नसावी. 

जेवढं बुद्धीने दाखवून दिलेलं dnyan आपण संपादन करतो, तेवढे जास्ती प्रमाणात हालचाली, गती, विघटन, बदल, तात्पुरतेपण जाणवतं! असे का, कारण बुद्धीची भाषा तशी आहे! 

तसंच, त्या प्रकारे श्रद्धेचे बीज स्वतः मध्ये रोवले, तर ते पसरून सर्व ठिकाणी कार्य करते आणि त्यातून शांती लाभू शकते. 

 *कार्य* म्हणजे स्वतः सिद्ध असलेली गोष्ट. 

हरि ओम.

श्री

 श्री 


बुद्धीला किंव्हा त्या शक्तीच्या तर्काला मर्यादा असतात हे विसरू नये. म्हणजे ज्या पद्धतीने, जाणिवेतून ती कार्य करते, त्याला एक चौकट असते. म्हणून जाणीव सूक्ष्म करत राहणे आले, ज्यावरून बुद्धी देखील सूक्ष्म, विशाल, निरहेतू आणि श्रद्धेने कार्य करेल. आपलं शुद्धीकरण बुद्धीवर किंवा भावनांवर केंद्रित नसावे - ते जाणिवेवर असावे, कारण सर्व चक्राचा उगम जाणिवेतून होतो, बुद्धी किंव्हा भावनेतून "नाही". 

भगवंत विषय समजून घेण्यासाठी ' हा मोठा बुद्धिमान आहे, हा भावनिक आहे, हा नेणता आहे ' असा भेद नसतो - त्याचा काही उपयोग नाही. श्रद्धेने जगणे हे कुणीही आत्मसात करू शकते आणि ते सर्वात मोलाचे जगणे आहे. रूपाला चिकटून आपण मर्यादेत राहतो, म्हणजे न्यूनपणा बाळगतो, भीती बाळगतो, राग किंव्हा हेवा बाळगतो...काय उपयोग त्याचा?! 

त्रास होतो, तेव्हा समजून घेणे की जाणीव अजून सूक्ष्म होण्याची गरज आहे. आपण हेतुला (किंव्हा त्या गुण धर्माला घट्ट धरून राहतो) म्हणून झालेला परिणाम, भोग वगैरे.  हेतूचे कार्य खूप खोलवर रुजलेले असते, म्हणून अनंत प्रश्न, धडपड, इथे आणि तिथे भटकणे, मूळ शोधत राहणे, सुटकेची व्याख्या निर्माण करणे हे चालू राहते. 

हे सारे चक्र *शांत* करणे आले.

हरि ओम.

Sunday, June 01, 2025

श्री

 श्री 


अगोदरच्या लेखाच्या पार्श्वभूमीवर असे म्हणतात की सर्वात गतिमान, हालचालीत आणि कुंपण करणारी संकल्पना आहे अहं वृत्ती. पैसे का हवा असतो? त्या सारखच दृश्य, नाती गोती, संबंध, भावना, विचार, शरीर हे का हवे असतात?! कारण ह्या घटकांचा आधार वाटतो, त्यातून एक सुरक्षित असण्याची कल्पना मन करते, म्हणून ह्या सर्व होऊ पाहणाऱ्या घटकांना _धरून_ ठेवते. ह्या होणाऱ्या क्रियेला चक्र, भाव, संबंध, बदल, तात्पुरतेपण असे म्हणू. 

आज आपला भाव हा _रेघ_ आहे. रेघ एक वर्तन आहे. त्या वर्तनातून भीती किंव्हा राग ही भावना निर्माण होते. त्या रेघेला जर गोलाकार किंव्हा आकाशा सारखा पोकळीपणा आला, तर भाव शांत होईल. म्हणून शुद्ध जाणीव हे मोकळे आणि पोकळे आकाश आहे, ज्यात सर्व गोष्टी शांत स्थितीत असतात. म्हणजे "शांत" हे सर्वात शक्तिमान प्रकरण मानायला हवे, ज्याच्यातून काहीही निर्माण करण्याची शक्ती असते!

हरि ओम.