Saturday, November 30, 2024

श्री

 श्री 


सर्व विश्व, त्यातील स्तर, घटक, स्थिती, चक्र, संबंध, परिणाम, हे एकच सत्य दर्शवते - तो भगवंताचा विलास आहे. ते कळण्यासाठी नामस्मरण करावे लागते. 

गोष्टी आणि आपण आणि त्यातील संबंध हा सर्व अस्तित्वाचा खेळ किंव्हा किमया आहे. भेट, देणे, पाहुणे आणि श्रद्धा आपल्यासाठी महत्वाची बाब आहे जीवन जगण्यासाठी. तरच आपण शुध्द आणि स्थिर होतो आणि भगवंताशी समरस होऊ शकतो. 

भगवंत भेटावा हा भाव मनात संक्रांत व्हायला लागतो, तरच तशी शक्ती हालचाली करते आणि तशे प्रसंग आणते आणि मार्ग प्रकट करते. शक्तीला भाव आहे, म्हणून जशी आपली जाणीव होते, तशी ती कार्य करते. जाणीवच शक्ती चक्र निर्माण करते. 

भगवंत भेटावा म्हणजे त्याचे गुण खरे वाटणे, पलीकडे होणे, मर्यादित न होणे,  परावलंबन स्वीकारणे, हेतू ची मर्यादा ओळखणे, प्रवाहाची जाणं येणे, अट्टाहास सोडणे, सूक्ष्म हऊ पाहणे, आनंदी सदा सर्व काळ राहणे, सिद्ध करण्याचा खटाटोप सोडणे वगैरे...

त्यासाठी, स्वतःसाठी अभ्यास करावा. कृपा कधी प्रकट होईल ते भगवंत जाणिवेत आणेलच. 

बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की भगवंत आणि प्रपंच्यामध्ये तालमेल कसा साधायचा? तर तसे न विचार करणे. कारण हा प्रश्न विचारातून उद्भवतो, ज्याला उत्तर शोधण्याचा मर्यादा आहेत आणि त्याचे परिणाम आहेत. भगवंत - ही वस्तुस्थिती श्रद्धेने उमगते. श्रद्धा प्रपंच्यामध्ये निर्माण करत पलीकडे आपल्याला नेते. विचाराने पलीकडे होता येते नाही. श्रद्धेने होऊ शकते, कारण भगवंताचा तो पूर्ण, शुध्द, सत्य गुण आहे. 

हरि ओम.

Friday, November 29, 2024

श्री

 श्री 


भाव किंव्हा जाणिवेच अस्तीत्व असतं, म्हणजे चक्र, परिणाम, निर्मिती, क्रिया असते. त्या क्रियेतून संबंध भावना तैय्यार होत राहतात. मूळ शक्ती भगवंताची - तिच शुध्द शक्ती आणि सूक्ष्म जाणीव आहे जीच्यातून अनंत विश्व भाव निर्मितीला येत राहतात आणि बदलत राहतात - असे दिसून येते जाणिवेत. खरे पाहिले तर हे प्रकरण लाटांच्या ओहोटी आणि भरती प्रमाणे आहे किंव्हा श्वास घेणे आणि सोडण्या प्रमाणे आहे. सुरुवात असते का? आणि शेवट? ज्या वस्तूला सुरुवात आणि शेवट नाही - त्या संकल्पनेच्या पलीकडे आहे, ती कायमच आहे. त्यातून आलेले सर्व रुपयांना सुरुवात आणि शेवट आहे किंव्हा _तत्पुर्तेपणा_ आहे. म्हणून त्याच भाषेच्या माध्यमातून पलीकडे होणे हा मार्ग आहे. 

तसे प्रयत्न करतांना अनेक स्थितिंना आणि आकारांना सामोरे जाणे आहे. अस्तित्व कुठलीही परिस्थिती निर्माण करू शकते आणि म्हणून "हे का होत आहे" असे विचारणे बरोबर ठरतं नाही. 

दुसरी गोष्ट ही की सर्व गोष्टींमध्ये फरक भासणार. ते सपाट करण्याचा अट्टाहास करू नये. समरसता वेगळ्या आकाराशी किंव्हा रुपाशी होऊ शकते, पण त्यातून तत्पूर्तेपणही राहतो. म्हणून समरसता भगवंताशी साधणे.

भगवंत प्रकट होतच राहतो. The principles of existence always manifest as hierarchies, scales,  transitions, cycles, changes and so on and those help to build connections and relations.

हे जर ध्यानात घेतले तर "मी" ही भगवंताशी जोडला जाऊ शकतो. मग श्रद्धा का वाढवू नये?

हरि ओम.

श्री: सिद्ध

 

श्री: सिद्ध

 

मी सिद्ध का करण्याचा अट्टाहास धरतो

 साहजिकच ती अनंत गरज असावी जीवा मध्ये म्हणून तसेच बघितले जाते. अर्थात सिद्ध होण्याची प्रक्रिया प्रत्येक जीवात वेगळी उमटू पाहते - ते समजून घेतले तरी त्याने समाधान नाही मिळणार, कारण माझ्या मते सिद्ध होण्याची प्रक्रिया आणि न होण्याची - हे बौद्धिक पद्धतीने सोडवणे कठीण आहे. 

 सिद्ध होण्याचा भाव स्वीकारा. तो आहे भीतीचा किंव्हा जाणीवेच्या स्थितीचा. आणि तो भाव शक्तीच्या क्रियेमुळे निर्माण होत राहतो आणि गुंतून ठेवतो. म्हणून तो भाव कुठून येतो आणि का आणि कश्यावर निर्भर असतो, ह्यात गुंतून राहण्यात अख्खं आयुष्य निघून जाईल, तरी कळणार नाही की प्रकार काय आहे तो. 

 म्हणून शांत होत जाणे अभिप्रेत आहे. त्यासाठी नामस्मरण करत राहणे.


 हरि ओम.

Thursday, November 28, 2024

श्री

 श्री 


दृश्य जग निर्मिती क्रिया दर्शवणार आणि भगवंताचे कार्य किंव्हा अस्तीत्व जाणिवेत आणणार. आपण किंव्हा आपलं मन किंव्हा मानवी जाणीव भगवंताच्या अस्तित्वाला _शक्ती रूपाने_ अनुभवते. तीच शक्ती अशी असते की त्यात विघटित क्रिया होण्याची संभावना असते म्हणून सूक्ष्म स्तरापासून ते स्थूल स्तरापर्यंत आणि तसे _भाव_ (awareness) निर्माण करत ती स्मरण शक्ती निर्माण करते आणि अनुभव जाणिवेत आणते साखळी आणि संबंधांच्या पद्धतीने. 

सध्या जाणीव अशी आहे की त्यात भाव असतो, म्हणून संबंध निर्माण होतात. _संबंधाचे_ कार्य, या शब्दाचा फोड केला, तर त्यात _क्रिया_ दिसून येईल. जाणीवेच्या शक्ती मुळे क्रिया त्या पद्धतीची होते आणि त्यातून अनेक आकार भासत राहतात - ते निर्माण होतात, वावरत राहतात आणि निघून जातात. हे असणार. हे आपले अस्तीत्व आहे. हे आपले अनुभव आहे. हे आपण आहोत. हेच आहे _अस्तित्वात_ असणे.   

म्हणजे आपण _इथेच_ असतो, आणि परिस्थिती बदलत राहण्याची जाणीव होत राहते. बदल घडणे हे बाहेरील कवच समजावे जाणीवेचे आणि स्थिर होणे ही आतील स्थिती समजावी. आतून ते बाहेर निर्मिती क्रिया वाटतं राहते. आपण हे दोन पणाने त्याकडे बघतो सध्या. त्यातून सुरुवात मानून दोन्ही रूप _एकाच_ सत्याचे आहेत, हे ओळखावे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


भाव किंव्हा जाणिवेच अस्तीत्व असतं, म्हणजे चक्र, परिणाम, निर्मिती, क्रिया असते. त्या क्रियेतून संबंध भावना तैय्यार होत राहतात. मूळ शक्ती भगवंताची - तिच शुध्द शक्ती आणि सूक्ष्म जाणीव आहे जीच्यातून अनंत विश्व भाव निर्मितीला येत राहतात आणि बदलत राहतात - असे दिसून येते जाणिवेत. खरे पाहिले तर हे प्रकरण लाटांच्या ओहोटी आणि भरती प्रमाणे आहे किंव्हा श्वास घेणे आणि सोडण्या प्रमाणे आहे. सुरुवात असते का? आणि शेवट? ज्या वस्तूला सुरुवात आणि शेवट नाही - त्या संकल्पनेच्या पलीकडे आहे, ती कायमच आहे. त्यातून आलेले सर्व रुपयांना सुरुवात आणि शेवट आहे किंव्हा _तत्पुर्तेपणा_ आहे. म्हणून त्याच भाषेच्या माध्यमातून पलीकडे होणे हा मार्ग आहे. 

तसे प्रयत्न करतांना अनेक स्थितिंना आणि आकारांना सामोरे जाणे आहे. अस्तित्व कुठलीही परिस्थिती निर्माण करू शकते आणि म्हणून "हे का होत आहे" असे विचारणे बरोबर ठरतं नाही. 

दुसरी गोष्ट ही की सर्व गोष्टींमध्ये फरक भासणार. ते सपाट करण्याचा अट्टाहास करू नये. समरसता वेगळ्या आकाराशी किंव्हा रुपाशी होऊ शकते, पण त्यातून तत्पूर्तेपणही राहतो. म्हणून समरसता भगवंताशी साधणे.

भगवंत प्रकट होतच राहतो. The principles of existence always manifest as hierarchies, scales,  transitions, cycles, changes and so on and those help to build connections and relations.

हे जर ध्यानात घेतले तर "मी" ही भगवंताशी जोडला जाऊ शकतो. मग श्रद्धा का वाढवू नये?

हरि ओम.

Monday, November 25, 2024

श्री

 श्री 


विघटित स्थिती हे शक्तीचे कार्य होऊन त्या कार्याची जाणिव देखील मर्यादित रूप घेते - त्या रुपाचा _भाव_ म्हणजे "मी". शक्ती तशीच नसते, तिला स्वतःची जाणिव असल्यामुळे एक प्रकारचा भाव ती घेऊन येते किंव्हा निर्माण करते किंव्हा प्रकट करते किंव्हा प्रज्वलित ठेवते. त्या भावामुळे आपल्या स्मरणात किंव्हा जाणिवेत हालचाली दिसून येतात आणि अनेक रूप, वृत्ती, आकार, संबंध, बदल अनुभवले जातात. त्याला आपण घाबरतो कारण ही क्रिया आणि जाणीव कशी घडते हे आपल्या बुद्धीला पूर्णपणे कळत नाही. आपण कुठून आलो, कुठे जाणार आहोत आणि सगळ्या गोष्टी भलत्याच वेगळे होत राहतात ह्याने आपण बेचैन होतो. हे शक्तीचे स्वतः बद्दल विचार करणे आहे. मूळ शक्ती *भगवंत* स्वतः आहे - त्यातून शक्तीचे अनेक रूप निर्माण होतात आणि त्याला "मी" असे मानतो. 

म्हणून जर या क्रियेतून मी निराळा झालो किंव्हा स्वच्छपणे क्रियेला क्रियाच ओळखली तर शांती भाव प्रकट होतो. 

बुद्धीचे गुण आहेत. पण बुद्धी पेक्षा जाणीव अधिक सूक्ष्म म्हणून तिचा अभ्यास करणे आहे. बुद्धीने कोडी सुटत नाहीत. उलट गुंता अधिक वाढण्याचा संभावना असते. बुद्धीचे गुण तसेच गुण अस्तित्वतून घेते - तर अस्तीत्व तसेच दिसून येणार. ज्या गुणांना आपण चिकटून राहतो त्यातून अस्तित्वाची संकल्पना आपल्या ध्यानी प्रकट होते - इतकं प्रकरण विस्तारलेले आहे. म्हणजे आत आणि बाहेर आणि सर्व स्थितीत त्याच गुणांची भाषा वावरत राहते. 

असो, तात्पर्य हे की भक्तीचे गुण सर्व ठिकाणी वावरले तर सर्व ठिकाणी शांती भाव जाणवू शकेल. म्हणून अंतर्मुख झालो तर सारे विश्व अंतर्मुख क्रियेतून दिसून येईल. 

शेवटची गोष्ट ही की भीती खूप सूक्ष्म रूपातून आली असते. तिला टाळता येत नाही किंव्हा डावळू शकत नाही. ती नैसर्गिक आहे. त्या भावनेचा स्वीकार करतच ती नमवायला लागते. त्यासाठी भगवंताची कृपा मागायला लागते - की कुठलेही विषय नको - समाधान हवे.

हरि ओम.

श्री

 श्री 


भोग संकल्पना मानवाने निर्माण केली आहे. भोग याला प्रसाद असे ही संबोधित आपण करू शकतो. आणि तसे मानले तर आपण शांत होऊ. 

अस्तित्व जाणीव हे काय आहे, हे नीटसे लोकांना किंव्हा कुठल्याही आकाराला उमगलेले नाही. ते कळले नाही म्हणूनच तो आकार तिथे आहे आणि आपल्याही जाणिवेत त्या आकराशी संबंध येत राहतात. संबंध क्रियेतून होतो - किंव्हा अस्तित्वाच्या गुण धर्मातून. 


स्वतः शक्ती विघटित होऊन आकार _निर्माण_ करते (संकल्पना) आणि त्यात गुंतून राहते. विघटित होऊ पाहताना संबंध निर्माण करते आणि सर्व स्थिती प्रकट करते. त्या स्थितीच्या द्वारे शक्ती _कार्य_ करते असे आहे. _विघटन होणे आणि संबंधित राहणे आणि वेगळेपण भासणे हे आहे शक्तीचे कार्य_ . ते सगळ्यांना पेल्वायला लागणार आहे! त्या क्रियेत आपण आलो आहोत, तर तसे ओळखावे. 

बाकी सर्व भगवंत असतोच हात पुढे करायला.

हरि ओम.

श्री

 श्री 


अहं भाव किंव्हा ज्याला "मी" संबोधित होतो तो खूप खोलवरून प्रकट होत असतो म्हणून त्यात अनेक स्तर, स्थिती, क्रिया, चक्र, गुंतागुंती, परिणाम, अनुभव आणि स्मरण असतं. त्याने अनेक आकार दिसून येतात, वेगळेपणा भासतो, बदल जाणवतात, गती दिसते, संबंध दृष्यासी निर्माण होतात आणि कार्य करतात. ही एक प्रकारची अस्तीत्व शक्ती आहे.

म्हणून खोल म्हणजे किती खोल, त्यासाठी श्रद्धेचा भाव पत्करून स्वतः मध्ये परिवर्तन करायला लागते. प्रत्येक स्तरात भावाचे रूपांतर होणे आवश्यक असते; प्रत्येक स्तरात "मी" किंव्हा वेगळेपणा आणि संबंधांची व्याख्या असते; प्रत्येक स्तरात दृश्याचा भाव आणि आकार जाणवत राहतो. त्या टप्प्यांना श्री ज्ञानदेव "लोक" असे म्हणतात. असे सात स्तर आहेत. ते ओलांडून भगवतस्वरूप होण्याची क्रिया आहे. म्हणजे प्रत्येक स्तरातील संबंध (आणि त्यावरून स्मरण किंव्हा संकल्पना किंव्हा मुळातील होणारे स्पंदने) बदलत जातील. तो _अभ्यास_ आहे - कष्टी होण्याचा अट्टाहास नाही. अभ्यासाला शुध्द हेतूची गरज आहे. 

म्हणून संबंध गूढ असतात आणि आपल्या बरोबर चालून आलेले असतात. त्या संबंधाच्या मुळे रूप निर्माण होणे, वावरणे आणि विलीन होणे हे चालू राहते. तो शक्तीचा परिणाम आहे - अस्तीत्व आणि त्याचे कार्य आणि त्याचा भाव समजून घेण्याचे स्तर. 

या वरील प्रक्रियेला _अंतर्मुख होणे_ असे म्हणतात. 

हरि ओम.



श्री 

संबंध अस्तित्वाचे असतात. आपण अस्तित्वात असतो, म्हणून संबंध "निर्माण" करतो इतर अकारण बरोबर. एकाच वेळेला विघटन होण्यामुळे क्रिया, कार्य, स्तर, बदल, वेगळेपण, स्मरण, अनुभव, आकार आणि *संबंध* तैय्यार होऊ पाहतात. 

म्हणजे संबंधांचे होणे, वावरणे आणि त्या प्रमाणे गोष्टी *सामोरे* येणे आणि बदलणे हे शांतपणे स्वीकारावे. काहीतरी दैवी प्रबोधन आहे, ज्याच्या मुळे गोष्टी घडतात, हालचाली होतात, बदल होतात आणि संबंध त्यांच्या बरोबर निर्माण होतात. 

आत खूप खोल क्रियांमुळे, जी दैवी इच्छा आहे, आपण होतो आणि परिस्थिती मधले घटक आणि विस्तार ओढून घेत राहतो आणि प्रतिक्रिया देतो - चक्र. या सर्व घडामोडींना सूक्ष्म रुपात गेलो तर हेतू नसतो - निर्मिती होत राहते. हेतू नसणे म्हणजे कुठलीही वृत्ती, कार्य, आकार घडण्याची गरज न राहणे - म्हणजे शांत भाव होणे. 

आपली नजर ज्या वृत्तीवर असते, त्या प्रमाणे घडामोडी निर्माण होतात, संबंध जोडले जातात आणि अनुभव येत राहतात - चक्र. म्हणून अस्तित्वात पूर्णत्व आकारात नसते किंव्हा वृत्तीतही नाही. पूर्णत्व आत अनुभवायला लागते, बाहेरच्या गोष्टींवर लक्ष देऊन नाही, कारण त्या बदलत राहतात आणि त्या स्वतः खूप खोलवरून आलेल्या असतात. स्वतःची चिंता करू नये - दुसऱ्यांना आपण वेडे आहोत, घाबरट आहोत, त्रासिक आहोत, बावळट आहोत - ह्या उद्गरांना आणि शब्दांना काहीही मोल नाही, कारण त्यांच्या समजुती अपूर्ण असतात. आणि त्या समजुती पाडण्यासाठी आपण काहीतरी सिद्ध करणे हे ही गरजेचे नाही. कारण सारे खेळ तो जाणिवेचा आहे - देह बुद्धी आपल्याला गुंतून ठेवते आणि कष्टी करते. फक्त आत्मज्ञान शांत भाव *प्रकट* करते. 

स्थळ, काळ, बदल ह्यांची चिंता असू नये. आपण इथेच आहोत. भगवंताची कृपा असतेच. मला स्वतः कधी कधी गोष्टींचा प्रचंड त्रास होत असतो, पण वरील विचार मनात येऊ दिले की या सर्व अनुभवांचे प्रबोधन भगवंताने केले असेल असे मी समजून घेतो आणि कर्तव्य करत राहतो. कदाचित आणखीन शुध्द होण्याचा मार्ग असावा; आणखीन देण्याचे प्रबोधन असेल; आणखीन देणे लागू असेल; आणखीन सत्याच्या जवळ होण्याची भगवंताची इच्छा असेल....

हरि ओम.

Thursday, November 21, 2024

श्री

श्री 


बुद्धीचे कार्य जरी विघटन करणे असले आणि वेगळेपणाचा भाव देत असले तरीही शांती संबंध आपण प्रकट करू शकतो. ते असे, की आपण बुद्धीच्या कार्यावर अवलंबून असता कामा नये. म्हणजे ते जे दाखवेल किंव्हा अर्थ निर्माण करेल ते पूर्ण सत्य असायला हवे किंव्हा पूर्ण सत्य त्यावर आधारलेले हवे असे मानू नये. कितीतरी गोष्टींचे होणे हे बुद्धीच्या पलीकडील क्रिया करून आणते, तर ते बुद्धीच्या भाषेत कसे कळून येईल?!

दुसरी गोष्ट अशी की विघटन काहीही होऊ दे, अनेकपणा आणि त्याच्यातून आलेले संबंध कितीही प्रकारचे रूप घेऊ दे, ते "सर्व" गोष्टी (दृश्यात आणि आदृश्यात असलेले) एकाच पूर्णत्वाचे घटक आहेत. वेगळे होणे किंव्हा दिसणे ही संकल्पना आहे किंव्हा स्थिती आहे. त्यातून "भीती" हा भाव  का उमटवू  देणे?! निर्णय, समज, जाणीव आपली आहे....वेगळेपण दिसले तरी ते एकाच शांती स्थितीचे रूप आहेत हे ही ध्यानात ठेवणे. 

आता आपण भीती ह्या भावने बद्दल जरा बोलू. हा भाव - _भावनेच्या_ भाषेत जाणून घेतला तर कदाचित तो स्वीकारला जाईल. बुद्धी भीतीला मिटून टाकण्याचं अट्टाहास धरेल - त्याने ते काही साध्य होणार नाही. भीती - या भावनेला नैसर्गिक बाब मानली पाहिजे, जिच्यामुळे आपण भगवंताच्या दारी पोहोचू शकतो. म्हणजे भीती सोडवू नका. भीती बरोबर आपुलकी असते, शोध असतो सत्याचा, परावलंबन भावना असते, जे कळू शकत नाही त्याची प्रचिती असते, आपण कुठून आलो, का आलो, कुठे जाणार आहोत, त्याची विचारपूस असते. जे अनंत आहे, चिकित्सा न करता, ज्याला कारण न लागता स्वीकारावी लागते, हे शिकवण असते. ज्याला शांतपणे बघून स्थिर व्हायचे असते, ती आहे भीती! म्हणजे भीती एकटी येत नाही - तिच्या बरोबर अनेक गूढ, हळूवार, अदृश्य भावना असतात. हे सर्व भीती स्वीकारायला भाग पाडते!

म्हणून भीतीला आपलेसे माना . त्याच्यातून स्थिरता येणार आहे.

हरि ओम.


श्री 

विघटन झाले की गती आणि संबंध आले. त्याचा भावनेत होणारा परिणाम म्हणजे "हाव" किंव्हा अतृप्त भावना. म्हणून आपण आणखी चिकित्सक होतो, आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणखीन धावपळ करतो, आणखीन मागून घेतो, आणखीन चंचल राहतो, आणखीन साठवून घेतो, आणखीन नाकारतो, आणखीन पळ काढतो, आणखीन इंद्रियांच्या आहारी जातो....तरीही आपली भूक काही तृप्त होत नाही! 

त्याचा एकमेव पर्याय म्हणजे अहं वृत्ती विलीन करणे. 

गोष्टी वेगळे शेवट पर्यंत वाटतच राहणार आहेत. त्याला नजरेआड किंव्हा पुसून टाकण्याचा अट्टाहास करू नका. आपण स्वतः मध्ये खोल जाऊन सुद्धा वेगळेपणाचा संबंध बदलत जाणार आहे - त्यातून सुखाचे आणि दुःखाचे आणखीन गूढ रहस्य उमगणार आहे. याचा अर्थ मार्ग चुकला असे होत नाही. हेच कळायचे आहे की खोल जाऊन सुद्धा किती सूक्ष्म पातळीवर शक्तीची क्रिया होत असते आणि जाणीवावर परिणाम करत असते. तरीही ते सातत्याने क्रिया करत राहायला लागते. त्याला तपश्चर्या म्हणतात.  

श्रद्धा ठेवा.

हरि ओम.

Tuesday, November 19, 2024

श्री: भेट

 श्री: भेट


भेट हा भाव आहे. म्हणजे कुणीतरी भेटायला येते, थोडे काळ राहते, संबंध येतात आणि ती व्यक्ती निघून जाते. हे माहीत असते की काही काळ ती व्यक्ती असणार आहे आणि जाणार आहे. आणि काही ना काहीतरी येत राहणार आहे आणि जात राहणार आहे. त्यातून हे दिसून येईल की येणे आणि जाणे हे होत राहते. त्याकडे कसे बघावे आणि संबंध कसे निर्माण करावे हे आपल्यावर आहे. अपेक्षा कुठल्याही हालचालीवर ठेवली नाही, तर येणे आणि जण्यानी आपली शांती बिघडणार नाही. 

तसेच आपल्या आतही विचारांचे निर्माण होणे क्रिया चालू असते - येणे आणि जाणे असते. थोडक्यात निर्मिती क्रियाकडे "भेट" म्हणून बघितले तर मन समाधानात राहील. कारण मन हे विचार नाही, शक्ती आहे अस्तित्वाचे - हा अनुभव घ्यायला हवा. त्या मनात अनेक वृत्ती येऊ पाहतात आणि निघून जातात - आणि ही साखळी राहतेच. त्या साखळीने स्वतःचा अहं भाव किंव्हा वेगळेपणा निर्माण होतो आणि त्यामुळे हालचालींना आपण त्रासून जातो. स्वस्थता वाटतं नाही. 

आपल्याला स्मरण भगवंताचे करायचे आहे - म्हणजेच तो गोष्टी भेटीस आणतो. ते आपल्या जाणिवेत येत राहतात आणि ते निघूनही जातात त्याच्याकडे. म्हणजे त्याची आणि आपली देवाण घेवाण होऊ पाहते. भगवंत हे चक्राचे कारण आहे, हे मान्य करणे. 

तसेच आपण दृश्यात आलो पाहुणे प्रमाणे आणि निघूनही जाणार आहोत हे ध्यानात ठेवणे. म्हणजे दृश्य भावही पाहुणे प्रमाणे बघणे आणि आपणही पाहुणे आहोत भगवंताच्या घरी हे जाणून घेणे. कायम आहे तो भगवत भाव, इतर गोष्टींचे होणे हे पाहुणे प्रमाणे वावरणे आहे - आपली ही तीच गत आहे.

दुसरी गोष्ट ही की कुठले विचार मनात घोळत राहतात, त्याने त्रासून न जाणे. त्यातूनच येणे आणि जाऊ देणे हा भाव आपण आत्मसात करणार आहोत. त्याला पूर्ण होणे म्हणतात. सारे स्तर, घटक, हालचाली, वेगळेपणाचा भाव, आतील क्रियांचे परिणाम, बाहेरील वेगवेगळ्या वस्तू हे *पूर्ण* मानणे - म्हणजे एकाच सत्य भावातून आले आहेत हे ओळखणे आणि आपुलकीने स्वीकारणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्व तिथेच असते. गोष्टी प्रकट होणे, बदलणे, विरघळून जाणे, संबंधित राहणे आणि हे चक्र सुरू राहणे हे अस्तित्वाचे कार्य आहे किंव्हा गुण धर्म आहे. अस्तित्व आहे, म्हणून वरील गोष्टींचे रूप प्रकट होणार, त्याचा परिणाम होणार, वेगळेपण जाणिवेत येणार, प्रतिक्रिया होणार, आकलन होत जाणार आणि शांती भावाकडे जीव पोचणार. ह्यातील प्रत्येक टप्पा भगवंताने योजिले आहे - त्याची इच्छा आहे, संकल्पना आहे, कार्य आहे. असण्याला अंत नाही - किंबहुना "नाही" ही स्थिती अस्तित्वातच नसते! म्हणून अस्तित्वाची शक्ती सर्व ठिकाणी कार्य करत राहते, सर्व ठिकाणी पसरलेली असते, आत आणि बाहेर असते, आणि सर्व स्तरांमध्ये तिचा वावर असतो. 

आपल्या ध्यानी मनी गोष्टी वेगळे भासतात, किंव्हा दूर वाटतात. ही संकल्पना आहे. मग ते जाणून घेण्याचे प्रयत्न करतो. ते जरी झालो तरी "इतर गोष्टी" त्या प्रमाणे वेगळ्या दिसतात आणि अपुरेपणाचा अभाव कमी होत नाही! म्हणजे आपल्यात काहीही बदल झाला किंव्हा प्रयत्न केला गेला, तरीही ह्या नाव रूपाच्या समुद्रात आपण सैरबैर पोहोतच राहतो! आपण काहीही नाही केले, तरीही मनात बदल येत असल्यामुळे, इतर जगाशी संबंध बदलणारा आणि तात्पुरता वाटतं राहतो! म्हणजे चैन नाही!! 

थोडक्यात जाणिवेचा स्वभाव सध्या असा आपण केला आहे, की त्यात वृत्ती उमतल्यामुळे असंख्य बदलणाऱ्या आणि परावलंबी राहणाऱ्या स्थितीला सामोरे जायला लागते! हा खेळ कोण मांडू पाहते? 

त्याच्यातून घडामोडींच्या पलीकडे किंव्हा महाकारण ते काय, हे जाणवू शकेल. त्याचा अनुभव घ्यावा. म्हणजे तसे आपण व्हावे, शांत व्हावे, शुध्द व्हावे, नामस्मरण करावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


विश्व असणे आणि त्यातील घडामोडी होत राहणे हे प्रसादा प्रमाणे स्वीकारावे लागते. कोण करते, का होते हे प्रश्न येत असावेत, पण त्यातून अस्वस्थ होणे की शांतीने ते घडू देणे - हीच शिकवण आहे. थोडक्यात अस्तित्वाचा अर्थ अनुभवणे. 

हे प्रश्न येतात कारण मनोरचना तशी घडवली गेली आहे. मन हे शक्ती आहे, क्रिया आहे, कार्य आहे, आणि त्याचे परिणाम आहेत. ते परिणाम जाणीवेच्या रचनेमुळे निर्माण होतात. म्हणजे आपण असतोच, शक्ती प्रकट होत असते आणि त्या प्रकट होण्याचा परिणाम कसा होतो आणि काय करून घ्यावा हे डोळसपणे बघणे आले. तीच शक्तीचे जागे होणे आहे. शक्ती आहे भगवंताची, तशी ती आपल्याला जाणवायला हवी, म्हणजे स्वतःचे विषय सोडायला हवे. "मी काहीतरी करतो; असेच असायला हवे" वगैरे भावना सोडायला हव्यात. गोष्टी आपल्या इच्छेनुसार होत नाही, ह्यातच भगवंताच अस्तीत्व आणि कृपा दिसून येते! म्हणजे गोष्टी प्रसाद म्हणूनच स्वीकारणे आले आणि अपेक्षा बाजूला सरणे आले. सर्व काही अस्तीत्व जाणवते, ते भगवंताचे कार्य आहे. 

आपल्यात खुप धिमेपणा वाढवायला हवा. बुद्धी शांत झाली की तो आपोआप अंगी येतो. सतत काहीतरी करत राहणे ही तापदायक वृत्ती आहे. उलट काहीही न करणे, हा भाव उत्पन्न करायला खूप ताकद लागते. ताकद येणे म्हणजे सहन करणे होत नाही - शुध्द होणे आणि समाधानी राहणे हे आहे.

अर्धवट वाटणे, अनेक गोष्टी दिसत राहणे, बदल चिंतेत पाडणे, तात्पुरते वाटणे - याचा अर्थ की शुध्द होण्याचा मार्ग पत्करायला हवा आणि अस्तीत्व काय आहे, हे अजून कळणे आले. 

त्यासाठी त्या शक्तीची प्रार्थना करणे.

हरि ओम.

Monday, November 18, 2024

श्री : जाणीव

 श्री : जाणीव


विचारांचा प्रवाह आणि शक्तीची क्रिया सतत सुरू असते. त्या क्रियेला अंत नाही, मर्यादा नाही आणि हेतू ही नाही. त्या क्रियेला होण्यासाठी कारणही नाही. जी क्रिया आशिच असते, कार्य करते हेतुरहित त्याला दैवी इच्छा संबोधले आहे. म्हणून असणे आणि होणे - या दोन्ही गोष्टी दैवी स्वरूपाचे आहेत. 

 _होण्यात शक्तीचे दर्शन_ वेगळ्या पद्धतीने घडते आणि परिणाम करते. त्यात अनेक स्तर, स्थिती, चक्र, परिणाम, भोग, अनुभव आकार, गती, गुण, हालचाली या सारे गोष्टी _जाणिवेत_ येत राहतात. ते दर्शन जाणिवेत तेव्हा येते जेव्हा विघटित कियेशी जाणीव समरस होते. म्हणून अनंत हालचाली जाणीव मध्ये अवतरतात किंव्हा निर्माण होतात. 

जशी जाणीव स्थिरावते तसे हे सारे हालचाली मंद होऊन किंव्हा परिणाम न होता, भगवंताचा भाव, म्हणजे शांती रस प्रकट होते. 

म्हणून जाणीवा म्हणजे अस्तीत्व भाव म्हणजेच अस्तीत्व भाव. आपण आहोत, हा भाव अस्तित्वामुळे येतो. म्हणजे ती शक्ती रूप देते आणि जाणीवही घडवते. दुसऱ्या अर्थाने जाणीव असते, म्हणजे शक्ती असते आणि तिचे कार्य असते. मूळ जाणीव भगवंताची आहे - त्यातून क्रियेमुळे जीवाचे जाणीवा होतात. पण सर्व जाणिवांचे मूळ एक भगवंतच आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्व कुठल्याही रूपाने जाणून घेणे म्हणजे अनंत पद्धतीने समजणे - त्याला अंत नाही - म्हणून शोध, किंव्हा असमाधान भाव राहणार. हे नैसर्गिक आहे, कारण जन्म होणे किंव्हा एखादं रूप धारण तेव्हाच होते जेव्हा विघटन क्रीयेशी रूप समरस होते. विघटन पद्धतीनेही अस्तीत्व जाणवते - पण ती एक बदलणारी, परावलंबी, शक्ती रूप, स्थळ - काळ चौकटीतील पद्धत आहे. त्याच्यात अहं वृत्ती निर्माण होते, मी होतो, वेगळं किंव्हा मर्यादित स्मरण होत आणि शक्ती दिसत नाही, नाव - रूप वेगळेपणाने दिसत राहतं, त्याचा परिणाम आपण ओढून घेतो आणि त्याची बाधा भोगतो. हे आपले जीवन! 

म्हणून स्थिर भाव हा श्रद्धेने प्रकट होतो. स्थिर म्हणजे एक होणे, एक दिसणे, सत्य होणे, स्थिरावणे, शांत होणे. त्यासाठी नामस्मरण ह्यावर श्रद्धा बसायला योग्य वेळ द्यायला लागतो. ती भगवंताची कृपा म्हणायला हरकत नाही. श्रद्धा बसण्यासाठी सतत, शंका न घेत, चलबिचल कमी करत, सैय्यम ठेवत नामस्मरण करायला लागते. त्यातून अतींद्रिय शक्तीची जाणीव प्रज्वलित होते. मी - हा भाव मंदावतो आणि त्याची जागा शांती भाव घेतो. शक्तीचे कार्य काय आणि ती किती सूक्ष्म स्तरापासून सुरू होते हे जाणवते. म्हणजे आपला भाव सूक्ष्म होतो. 

हरि ओम.



श्री 

बारीक सारीक गोष्टी सांगणे किंव्हा ऐकत राहणे ह्याने त्रासून न जाणे. बरेच लोक सिद्ध होण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी बारीक सारीक गोष्टी बोलत राहतात. मूळ हेतू काय आहे, हे त्यांना माहीत असतं नाही आणि जे बाहेर येत राहते ते म्हणजे अहं वृत्तीचा परिणाम. ते ऐकून घेतांना आपण होत नाही किंव्हा ठरतं नाही. कश्यावरही आपण ठरतं नाही आणि स्वतःला काय वाटतंय तो निव्वळ त्या क्षणाचा भाव व्यक्त होत असतो - तो माझा नसतो. शिवाय आत - बाहेर प्रक्रिया खूपच गूढ आहे आणि ती चपाट्यावर आणण्याचा ठेका किंव्हा गरज नसतेच. त्याने आपण सिद्ध होत नाही. सत्य ओळखणे आणि सांगणे ह्याला जवाबदारी समजू नका आणि सिद्ध होण्याची गरजही.

सत्य असते. ते फक्त आपण बनतो अनुभवातून. त्यासाठी भगवंताच स्मरण आवश्यक.

हरि ओम.

Friday, November 15, 2024

श्री: गोष्ट होण्याची क्रिया

श्री: गोष्ट होण्याची क्रिया 

भगवंत भाव दृश्यात अवतरतो. ते अवतरतांना अनेक स्तरातून शेवटी तो दृश्यात प्रकट झालेला दिसतो. हे कार्य आणि क्रिया अनंत आहे, तोच त्याचा भाव आहे, शक्ती आहे म्हणून एक पासून ते अनेकपणात हा भाव "प्रकट" होतो किंव्हा जाणवतो. 

जाणीव देखील अस्तीत्व भाव आहे, ज्याच्यातून निर्मिती क्रिया घडतं राहते - त्यालाच जाणीव म्हणतात! 

सांगण्याचे तात्पर्य हे, की ही क्रिया कुणाची मानायची आणि ती कधी पासून आहे हे कुणी सांगावे?!! ज्याला मी माझे मानतो, ते माझे कसे मानू?! मी कोण ठरवणारा आणि अट्टाहास करणारा?! आलेले पदरात असलेले गोष्टी या रूपाचे का, हे विचारून काय मिळेल?! मी कुठून आलो आणि मी हे प्रकरण काय आहे, हे कुणास ठाऊक?! 

तसेच, विषय होणे किंव्हा भासणे हे ही गूढ प्रकरण आहे. कितीही विषय सोडवण्याचा विचार करा, आपण स्वतः अनेक स्तरात गुंतलो असतो, म्हणून विषयही खूप गहन पद्धतीने सामोरे येतो आणि त्याचा उगम, गुण, गती, बदल, रूप - बुद्धीला ठाम ठिकाणा लागू शकतं नाही. मग आपण भीती ही भावना निर्माण करतो. जसे विषय गहन, भीती हा भाव देखील खोल आणि गहन असतो. भीती शांत करणे, म्हणजे विषय शांत होणे म्हणजे मी हा भाव शांत होणे, म्हणजे भगवंत भाव प्रकट होणे.

जर तसे करणे उचित असेल, तर त्याचे मार्ग पदार्पण करणे गरजेचे आहे - ज्यात एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.

श्री : अस्तीत्व

 श्री : अस्तीत्व


वेगळेपण भाव आणि एक सत्य हे अस्तित्वाचे दोन गुण आहेत. ह्या पद्धतीने अस्तित्वामुळे गोष्टी असतात, येतात आणि जातात. 

अस्तित्व भाव मानणे म्हणजे त्याचे कार्य आणि क्रियाही मानणे - म्हणजेच निर्मिती क्रिया किंव्हा विघटन, गोष्ट, संबंध, वेगळेपण, बदल, हालचाली, अनेक रूपे मानणे. वरील _परिणाम_ अस्तित्वाचा असणारच आणि त्याचा प्रभाव जीवावर होणार. जीव होणे हे ही त्याच क्रियेतून आलेले रूप आहे, मग "मला जग का दिसते" हे त्रासून जाऊन काय अर्थ आहे?! ती दैवी इच्छा आहे, हे पूर्णपणे ओळखणे. 

विघटन नैसर्गिक क्रिया मानली, तर त्यातूनच अनेक स्तर, स्थिती, संबंध, रूपे - वृत्ती, विचार, भावना, शरीर आणि त्यांच्यातील वेगळे स्वभाव आणि संबंधही आले! मुळात आपण विखुरले आहोत म्हणून जग भासते. विखुरलेपण जर विलीन झाले तर राहते ते फक्त शुध्द अस्तीत्व. प्रत्येक विखुरलेला घटक त्या पद्धतीचा चक्र निर्माण करतो (corresponding pattern of perception) म्हणून जाणीव त्या पद्धतीने होते!

मी हा भाव जो पर्यंत घट्ट आहे, तो पर्यंत जग आणि त्याचे भोग आले. जेव्हा हा भाव सूक्ष्म होत विलीन होतो, तसे फक्त अस्तीत्व जाणिवेत प्रकट होते. 

हरि ओम.

श्री : स्मरण

 श्री : स्मरण


आपण जिवंत आहोत ह्याचा अर्थ जिवंत आहोत! ती भावना अनेक सूक्ष्म ते स्थूल संबंधीत क्रियेतून प्रज्वलित राहते आणि क्रियांमध्ये हालचाली जाणिवेत दिसून येतात आणि त्यात आपण गुंतून राहतो. क्रियांचा एक परिणाम म्हणजे स्मरण _होण्याची_ पद्धत (awareness of existence) आणि त्यामुळे होणारे भोग आणि परिणाम आणि चक्र आणि बदलांचा अर्थ. मुख्यतः कार्य आहे _असण्याचे आणि त्यावरूनच होण्याचे._ 

म्हणून आठवण किंव्हा स्मरण होणे/ राहणे ही देखील क्रियेतून _निर्माण_ झालेली गोष्ट आहे. त्या स्मारणाला आपण घट्ट पकडून ठेवतो म्हणून आयुष्य किंव्हा व्यवहारात आपण वावरतो. 

स्मरण अनेक प्रकारचे असू शकते. आत्ताच्या काळात सुद्धा समरणाची संकल्पना आहे जशी पूर्वी वेगळ्या प्रकारे होती/ असावी. तरीही स्मरण का असावे, हा स्वतःला प्रश्न विचारला, तर तो अस्तित्वाचा गुण धर्म आहे हे ध्यानात येईल. मग अस्तित्वाचे स्मरण आणि जीवाचे स्मरण ह्यात कसा फरक असतो, या बद्दल विचार सुरू होईल. त्यातून निर्णय होईल आणि प्रवास सुरू होईल स्मरण शुध्द होण्यासाठी.

स्मरण _शुध्द_ होण्याची क्रिया म्हणजे नामस्मरण. 

हरि ओम.

श्री

 श्री 


दृश्याचे घटक आणि संबंधांचा किंव्हा त्यातून प्रकट होणाऱ्या भावाचे नाते असते. नाते अनेक प्रकारचे असते, सुक्षमापासून ते स्थूल स्थितीचे किंव्हा स्पंदना पासून ते विचार, भावना ते शरीर पर्यंतचे. 

त्यातून एखादी गोष्ट आणि त्या बरोबरचे आपले संबंध "निर्माण" होते. म्हणजेच ही क्रिया गूढ आहे...आणि त्या क्रियेचे व्ययशिष्टे हे की अनंत हालचाली, रूपे सामोरे येतात, संबंधात राहतात आणि निघून जातात - चक्र प्रमाणे. 

म्हणून दृश्यात येणे म्हणजे क्रियेत राहणे. त्यात विचार हे का ते, तिकडचे का इकडचे, त्या काळातले की ह्या काळाचे - ह्या सर्वांना वाव आहे किंव्हा ते होत राहणार. विचारांचा उगम दैवी शक्तीचे कार्य असल्यामुळे ते बरोबरीने काहीही निर्माण करू शकते, जी त्या शक्तीची किमया आहे. 

मी कुठून आलो, हा भाव किंव्हा ही दृढ भावना कदाचित पूर्वी कुठल्याही कृतीत सामावलेली असावी. आता मी स्वतःला खूप घाबरतो - त्यातून संबंधांचे स्वरूप कळून येईल की आपण कुठल्या दिशेने जात आहोत.

एक संकल्पना आठवणीची अशी की पूर्ण पर्यावरण म्हणजे मी आहे, म्हणून मी शांत होतो. तसे काहीसे वृत्तीची जाणीव बऱ्याच लोकांमध्ये वावरत असावी पूर्वी. आता मीच आहे, पर्यावरणाशी माझा काही संबंध नाही...त्या भावातून  बहुसंख्य लोक वावरतांना दिसतात. औषध पाहिजे ते आतील स्थिती बदलण्यासाठी - बाहेरचे प्रयत्न ठिगळ लावण्या सारखे वाटतात.

हरि ओम.

Shree: Principles

 Shree: Principles

Balance, hierarchy, transition, patterns of connections are all internal Principles of Being. All these state the nature of consciousness – that if consciousness is to be realized, then it is crucial to feel transition of difference experiences (and not compartments), hierarchy (relationship among changing experiences) and patters (recurrence, transference, continuity). With this, we can hope top transcend the space-time phenomena. Therefore, transcendence is a process of scaling (up or being subtle and steadying the self) till the consciousness is revealed within. This generates or creates calmness.

I think in architecture therefore above Principles are searched. Architecture can also be seen as an action of being. The action is supposed to create calmness. If it does, then the architectural action has been profound beyond words.

Hari Om. 

श्री

 श्री 


अर्धवट वाटणे आणि सांत्वन करणे आणि बडबड करत राहणे हे काही केल्या लोकांचे थांबत नाही! स्वतःचे विचार तरी कुठे थार्यावर असतात?! विचार धारा किंव्हा कुठलीही गोष्ट आपल्या हातात नाही. याने हे आकलन व्हायला हवे की समाधान कष्यावरही अवलंबून असण्याची गरज नाही! 

विचार चक्र ही अस्तित्वाची एक स्थिती दाखवते - मुख्यतः तात्पुरतेपण आणि परावलंबन आणि त्यातून सिद्ध होण्याची गरज. 

मला काळजी आहे, हे मान्य आहे. पण ती सिद्ध करण्याची नाही कारण त्याने काहीही होत नाही. काळजीचे मूळ कुठे आहे आणि ते का रुपात येऊ पाहते हे स्वीकारायचे आहे. मग त्यासाठी मुद्दामून काहीही करत राहणे आणि धावाधाव करणे गरजेचे नाही. मला उत्तरे माहीत नाही, सत्य माहीत नाही, ह्यामुळे ते होते आणि त्यामुळे हे होते - ह्याच्यात फारसा रस नाही. ह्यातून काय उद्भवेल माहीत नाही! हे माहीत असणे गरजेचे आहे का, ते ही माहीत नाही! 

काहीतरी घडेल. घडू दे! घडणे हा स्थायी भाव आहे, तर ते होणार!

हरि ओम.

श्री

 

श्री 

 आपले विचार कुठून येतात, याला बरेच स्तर असले हवेत, म्हणून त्यातील घटक, संबंध, भाव, हेतू, परिणाम, अनुभव आपण भोगतो. त्यात "मी" हा भाव आहे आणि "विचार होणे/ वावरणे/ असणे" हे चक्र आहे. मी आणि विचारांची पद्धत ह्यात अनेक स्तरांचा संबंध आहे, म्हणून जसे विचार बदलतात, तसा भाव बदलतो, जगाशी संबंध बदलतो आणि मी ही जाणीव बदलते. सुरुवात कुठून करणे हा प्रश्न यावा हे कळण्यासाठी, पण त्याचे उत्तर गूढ आहे आणि ते श्रद्धेच्या मार्गाने चालत कळू शकते किंव्हा स्वीकारलं जाऊ शकतं. 

 हा जीवनाचा किंव्हा अस्तित्वाचा गुढपणा आहे. त्याचा अर्थ खूप सुक्ष होण्यामध्ये आहे, असे संतांचे म्हणणे आहे. हेतू, काळजी, चक्र, वृत्ती, तात्पुरते वाटणे, कर्म करण्याची हाऊस, सिद्ध होण्याची खटपट, वेगळेपण - यांचा उगम खूप खोलवर स्तरात असतो आणि तो स्वभाव त्या स्थितीत निराळाच असतो! तिथं पर्यंत जाण्याचा मार्ग आणि स्वीकारण्याची शक्ती नामस्मरण देते. तसे ते शुध्द होण्याचे चक्र आहे. 

 हरि ओम.

 

 श्री 

 वरील लेखातून असे दिसून येते की शक्ती म्हणजे असणे आणि त्याचे दुसरे रूप म्हणजे कार्य होणे, आकार घेणे, गतिमान होणे, हालचाली दिसणे वगैरे. शक्ती असतेच, ती भगवंताची असते आणि त्या भावातून, शांती रसातून रूप प्रकट होते. प्रकट होणे ही देखील अनंत स्तरांची प्रक्रिया आहे, ज्यावरून शेवटी आपल्या जगाची जाणिव होते. विश्र्वविशलेषण हे आहे - म्हणजे निर्मिती क्रिया आहे. 

 In this sense, there is no objection cause of universe, so it is obvious that the cause has to be something Divine or beyond anything one can even imagine. 

 The cause of creation is not the thought that is felt. To base all meanings on thought has repercussions - causal identities, causal actions, causal self awareness and the emphasis on meaning creation to make or conceive a product (purpose/ concept) are some of those self imposed requirements. Therefore also, logic, limited time and space, optimization, increased pace of development, fragmentation, ruptured, proving oneself are also extensions of this basic assumption of thought. Fundamentally - fear and temporariness. So deep rooted is this sense of incompleteness and fear!

 शक्तीचे जागे होणे म्हणजे या चक्रातून बाहेर होणे आणि असे वावरणे की त्यासाठी विचारांचा साचा लागू नये. मी असतोच. मी पूर्ण आहे, हे ओळखणे आणि होणे.

 हरि ओम.

 

       

Shree

 Shree

We do not need to adhere to anything of the phenomenon to feel complete – we are already complete as a phenomenon coming from God and interconnected to everything else. With this birth, we will generate many vibrations and those may keep affecting us and compel us to be engaged in action, but that need not bother us to fix anything external or the self or anything internal. Things appear, change, dissolve, vibrate, affect, trigger memories and so on and this is the action that happens or takes “place”. Thus being = consciousness = vibrations = action = causes = effects = phenomenon = perception.

One need not push or feel irritated or incomplete or compelled to do anything. One exists. It is not even a matter of thinking anything specific or confirming anything or justifying or even having any intent or any start or any sequence or anything dependent on time and space.

Hari Om.

Monday, November 11, 2024

Shree: cycles

 Shree: cycles

At times I am worried about the pace of things – thoughts, words, actions, product, review and the cycle it creates. At the crux is the issue of “noise, mapping of noise, slotting, relationship, Sequence, extent, control, decision and ensuring permanence”. Perhaps everyone is in this game and if this cycle is not completed to the extent of clarity it may create anxiety or stress or reaction of any kind. Perhaps this is how the intellect works to make sense of situation and plan.

I feel sometimes, that this mentioned cycle happens so fast at times, that expectation to complete the cycle “needs suspension”. The cycle can no longer be completed and even I it is attempted to, the rate of change disrupts the attempt to complete the said loop! So there is a conclusion of the intellect – it is “always’ at a loss to make sense – so it stays bewildered!

Therefore the inquiry now is: what does one mean by control and how should one feel at peace in this situation?

Therefore who or what creates a cycle of perception and what is perception then? Is the intellect everything or do we have the power to understand things that are more subtle and prior to the making of the intellect? What are their cycles of causes and effects and their nature of perception? And how do those connect with the intellect’s cycle?

So existence is a “cycle”  - of states of perception. Let us not forget this.

Hari Om. 

Saturday, November 09, 2024

श्री

 श्री 


आपण किंव्हा होणे किंव्हा असणे ही क्रिया "auto pilot" समजली हवी. अस्तित्व हे माध्यम असल्यामुळे स्पंदने निर्माण होऊ पाहतात आणि त्यातून असंख्य वासना, चक्र, भाव आणि आकार होतात आणि एकमेकांवर अवलंबून राहतात. _आस्तित्व म्हणजेच स्पंदन पावणे_. 

यातून हे दिसून येईल की अस्तीत्व शक्तीची क्रिया आहे, ते नुसते रिकामटेकडे बसलेले नाही! त्या स्पंदनाच्या द्वारे अस्तीत्व शक्ती प्रकट पावते किंव्हा जाणिवेतून बाहेर येऊ पाहते. ही _सर्वात नैसर्गिक असण्याची क्रिया आहे._ 

ही नैसर्गिक स्थिती भावनेत समजून घ्यायला लागते. आपण नाही, त्याची शक्ती खरी म्हणजेच "auto pilot being". हा अनुभव कसा आहे, तर तो पूर्ण शांती भाव निर्माण करणारा आहे. आपण जर नसलो, तर एवढे होणार असेल, तर काय हरकत आहे अनुभवायला शांती भाव?!!

म्हणून उगमाची काळजी करू नये, सबंधातून कोडे सोडवण्याचा अट्टाहास धरू नये, स्वतःची काळजी करू नये, विषयाचे विघटन करून स्वतःला दोष देऊ नये, दुरुस्त करण्याच्या मागे पडू नये, अहं वृत्ती शांत करावी, फक्त logic वापरून निर्णयाची घाई करू नये, निर्णय दिला तरी त्यात स्वार्थी हेतू राहू नये, माझं काय होईल ह्या चक्रात अडकु नये....

अजून एक गोष्ट की _रूप_ येणे, बदल पावणे, आणि कुठल्याही आकारात कधीही, केव्हाही, कसेही जाणवणे - हे पूर्ण स्वीकारणे. सर्वांगीण भाव आत्मसात करून हे सर्व रूप भगवंताच्या शक्तीने प्रकट पावत आहे, अशी श्रद्धा बाळगावी.

हरि ओम.

श्री

 

श्री 

 अध्यातमामध्ये बऱ्याच पद्धतीने अंतर्मुख होणे म्हणजे काय, हे सांगितले आहे. त्यावरून सारासार विचार करून अपेक्षित भाव काय आहे तो ओळखावा आणि प्रयत्न करावा. आणि कदाचित अभिप्रेत तेच असावे. 

 सत्य जे आहे, ती बुद्धी फेरफार करून वेगवेगळ्या पद्धतीतून मांडू पाहते  - त्यात बहिर्मुख स्वभाव, धर्म, अंतःकरणच्या गोष्टी, इंद्रियांचे स्थान, आतील क्रिया, चक्र आणि घटक, वृत्ती आणि वासना, बदल होण्याची अपेक्षा, अट्टाहास आणि उन्मन अवस्था, भगवंत वस्तू आणि प्रवास हे सारे घटक येतात. सर्वांगीण पद्धतीने अस्तीत्व आहे, ते मांडतांना मनाच्या भाषेत मांडायला लागते.

 मौज अशी आहे की वाचक घटकांचे संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातील दिशा, प्रवास, अपेक्षा असे गुणधर्म त्यावर जोडतो. पहिले काय, नंतर काय, महत्वाचे काय, दुय्यम काय, हे विचार तो करतो. पण त्यातून आपण तिथेच गोलगोल फिरत राहतो! 

 अर्थात ही सुरुवात आहे. एकदा हे कळले की बुद्धीची मर्यादा असावी आणि ती मान्य केली गेली, आनंदाने स्वीकारली गेली, की श्रद्धेची वाढ होते. मग वरील गोष्टी आपोआप सर्वांगीण पद्धतीने कळतात. मग आपण खरे शांत होतो. शांत होणे म्हणजे पूर्ण होणे.

 वरील संकल्पना जीवनात देखील लागू करता येते. घटकांचा विचार करणे, पुढे, आत्ता, नंतर या बद्दल आपण एक प्रक्रिया किंव्हा संकल्पना मांडू पाहतो आणि त्या दिशेने वाटचाल करतो. गोष्टी बदलत राहतात, म्हणून वाटचाल तिथेच फिरत राहते. हा अनुभव येणे महत्वाचे असावे.

 तिथून श्रद्धा वाढू शकते आणि अंतर्मुख होण्याचा प्रवास सुरू होतो. आलेले अनुभव, कितीही त्रासिक वाटले तरी त्यातून साखळी सोडणे हे अपेक्षित असते की नाही याचा विचार करावा. कदाचित काहीतरी प्रबोधन असेल तो अनुभव निर्माण होण्यासाठी आणि आपल्या वाट्याला येण्यासाठी. तर शांत होऊन कार्य करत राहावे. काळजी करू नये, कारण त्यातून आपण तिथेच फिरत राहतो. 

 श्रद्धा वाढवणे.

 हरि ओम.

  


श्री 

 शांत होऊन सर्व कार्य घडतात, यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे. आपण बेचैन असलो, तर त्याच पद्धतीने स्पंदने येऊ पाहतात आणि क्रियेत गुंतून ठेवतात. म्हणून भगवंताच्या कार्यावर, शक्तीच्या रुपावर, अनुभवांवर, हालचालींवर, स्वतःवर पूर्ण श्रद्धा ठेऊन स्थिर व्हा. 

 अस्तित्वात आहोत, बरेच गोष्टी समोर येणार आहेत....शांतीने त्याकडे बघा.

 हरि ओम.

 

 

Thursday, November 07, 2024

श्री

 श्री 


अस्तित्व अशी गोष्ट आहे की अनंत क्रियांचा समावेश असल्यामुळे अनंत प्रवाहात असलेले आकार, अर्थ, परिस्थिती, वेगळेपण प्रकट होते. ह्यांनी भांबावून जाऊ नये. 

हे नैसर्गिक आहे असे ओळखून, जे आपल्या आकलनात येऊ पाहते, तसे कार्य करत राहावे. श्रद्धा असणे की पूर्ण भगवंत इथे हाजिर आहे. त्याच्या सानिध्यात, साशनात, घरी आपण सुरक्षित आहोत. कार्य करायला त्याची इच्छा आहे, तर ते करावे. भोग जे असतील, ते प्रसाद म्हणून स्वीकारावे. 

कार्य करत राहताना त्याला स्मरून कृती करणे. त्याचा संबंध कसा असतो, याची चिंता न करणे आणि उत्तरही शोधू नये. जे काही चक्रात आहोत आणि परिणाम भोगत आहोत, त्यात त्याचे स्मरण ठेवणे. जे प्रकट होईल आत आणि बाहेर, ते होऊ देणे आणि नैसर्गिक आहे, असे ओळखणे.

तसे केल्याने कालांतराने शांतता लाभेल. 

हरि ओम.