Saturday, May 31, 2025
Shree
Wind or movement is all over the "space". Rather "space" has every aspect of movement within it. It is _however not felt_. To feel then, space requires to "limit" itself or contain itself or construct a boundary. The moment a boundary is constructed, all sorts of "movements" occur - of time, change, relations, air, water, _forms of all kinds_!....
This means all such aspects of "space" come to fruition or creation only when a boundary is perceived...else those aspects in truth aren't there! Those aspects aren't there means their effects and causes are _perceived_ in a particular frame of limitation..which is the "scaled down version of the truth"!...
In the above explanation currently, space is equated with existence itself - the two are considered synonymous. Therefore even whatever physical and mental space is perceived, becomes a scaled down version! Hence "existential space" is even above or vast or limitless or beyond the space we see or perceive!
"Movement" is felt in our perception as change, dependence, temporariness and _pressure_.
Pressure to perform, pressure to change, pressure to stick around, pressure to prove, pressure to do multiple things, pressure because of incompleteness, pressure because of differences, pressure because of thoughts and feelings, pressure on account of connections, pressure because of circumstances and the list can be unending.
Summary "presence of pressure" is inevitable and is God's Will or the Existential Will to become the Truth, again. Hence one aspect of all these pressures is to transcend once and for all.
That is referred as स्थिर होणे, शांत होणे.
Logically then, if there is a Will to transcend, so should there exist a Will to become something and take up a form! Why so?
I don't know. Saints refer to this _action_ of Existence as Divine Will.
Hari Om.
Friday, May 30, 2025
श्री
श्री
आपले स्मरण शुद्ध जाणीव आहे. त्या जाणीवेच्या बळावर साखळी "निर्माण केली जाते", कार्य होत आणि हेतूच स्वरूप होते, भाव होतो आणि संबंध तैय्यार होतो. त्या जाणिवेला आपण _शक्ती_ म्हणू शकतो. शक्ती असतेच स्वतः सिद्ध. तिला _भगवंत_ , अशी उपमा आपण देतो. भगवंत आहे, म्हणून त्या कारणाने दृश्य जग आहे, हालचाली आहेत, बदल आहेत, संबंध आहेत, भाव आहे, प्रक्रिया देणे आहे...एखादी गोष्ट का करावी, ह्याचे मूळ कारण भगवंतासाठी.
दररोजचा सूर्य, वारा, पाऊस, पाणी, आकाश ह्यांना कोण निर्माण करते आणि संबंधित ठेवते?! आपण कुठून येतो, विचार कसे होतात भावना का जाणवतात?
स्वतः सिद्धेच स्मरण आणि कार्य, हे अनेक संस्कृती मध्ये, अनेक काळात लिहून ठेवले आहे किंव्हा उल्लेख सापडतो. त्यातून अध्यात्म, समाज, कार्य, सामूहिक क्रिया, संकल्पना, कलाकृती असे काहीसे रूप आणि आकार तैय्यार होतात. त्यात आपल्या स्मरणाचाही हातभार लागतो. त्या कार्यात आपण राहतो. आणि शांत होतो.
वरील प्रकार अहं वृत्तीही निर्माण करते. तिच्या मागे गेलो तर ती इतक मोठ जाळ तैय्यार करते की सर्व क्रिया क्लिष्ट आणि विघटित आणि वेगवान होतात. त्यातून माणूस विभक्त आणि एकलकोंडा होतोच होतो, त्यात दुमत नाही.
आहे ते असे आहे. अस्तित्वातून जाणार आहोत कुठे आपण?! जाण्याची जरूरी नाही! आपण होतो कार्यातून, म्हणून निघून जातो एका स्तरात. दृश्यात वावरताना (ज्याचे ७ स्तर संत Dnyaneshwar ह्यांनी उल्लेख केले आहेत) सारे पायऱ्या अनुभवात आणायला लागतात...म्हणजे जाणिवेत. अनुभवाला पकडून ठेवता येत नाही. अनुभव सोडून देणे आणि निरहेतू पद्धतीने बघणे म्हणजे जाणीव शुद्ध करू देणे.
म्हणून शांत होत राहणे. जाणीव शुद्ध करत राहणे.
हरि ओम.
श्री
श्री
भीती घालवण्याचा आटापिटा करणे वायफळ प्रकरण आहे. तो अस्तित्वाचा एक भाग असल्यामुळे, हा घटक आणि त्याचा परिणाम राहणार! घटक घालवणे, म्हणजे त्यावर लक्ष दिले तर तो अधिक गुंतवून ठेवतो आणि त्याप्रमाणे पूर्ण साखळी दर्शवतो!
म्हणून वासना भगवंत भावाकडे वळवावी, मन आपले पूर्ण त्याच्या विचाराने भरून घ्यावे, म्हणजे इतर वासना उरत नाही, त्यां नाहीसे होतात, त्या शांत होतात...मग भीती कशी काय राहील?! मनाच्या घागरीत भगवंताला ठेवा म्हणजे इतर पदार्थ त्यात येत नाही.
आपल्याला वासना ढकलता येणे कठीण, तिचे रूपांतर करायला लागते एक सूक्ष्म स्थितीत आणि शेवटी शांत करायला लागते.
शांत होण्याची प्रक्रिया आणि त्या पद्धतीने जाणीव होण्याची शक्यता नामस्मरण प्रकट करते.
हरि ओम.
Tuesday, May 27, 2025
श्री
श्री
मी जेव्हा व्यक्तीकडे बघतो तेव्हा आजकाल असे वाटते, की व्यक्ती त्याच्या त्याच्या दुनियेत दंग का होतो किंव्हा कसलेतरी विषय का निर्माण करतो?! जस लोहचुंबक काहीतरी स्वतःकडे ओढून घेतो आणि काहीतरी दूरही करतो. जवळ राखून ठेवणे किंव्हा दूर लोटणे, हे दोन्ही एकाच गुण धर्म मधून, क्रियेतून, समजुतीतून येतात. ती शक्ती एकच आहे, जी दोन्ही क्रिया घडवून आणते.
म्हणून त्याच प्रमाणात, सारे वासना, रूप, आकार, घटक, परिणाम, स्मरण, भाव, संबंध एकाच शक्तीचे कार्य आहे. त्या शक्तीला _जीवाची शक्ती_ समजू. त्या शक्तीचा भाव असा असतो की ती अहं वृत्ती जागृत ठेवते म्हणून त्यामुळे होणारे सर्व परिणाम भोगायला लागतात. भोग, हा प्रकार असणार, जर जीवाचा भाव असेल तर. व्यवहारातला अर्थ हा की असमाधानात राहणे, कारण सतत काहीतरी हवे असते किंव्हा नसल्यामुळे चैन पडत नसते किंव्हा दूर लोटण्याची आशा असते किंव्हा पळून जाण्याची प्रवृत्ती असते. अशा प्रकारे आपले मन सतत दृश्याशी संबंधात राहते आणि कुठली ना कुठलीतरी परिस्थिती ओढून घेते/ निर्माण करत राहते. मन आहे म्हणून परिस्थिती आहे, तिच्या अर्थाची मांडणी आहे.
भोगाला देखील दोन पद्धतीने बघू शकतो. एक म्हणजे नाईलाजाने दृश्याचे परिणाम सहन करणे, ह्याला भोग म्हणता येईल. दुसरा अर्थ भोग ह्या शब्दाचा म्हणजे _प्रसाद_. आपली नजर ठरवते की भोग नाईलाज आहे की दिलेला प्रसाद, ज्यामुळे स्वतःची सुधारणा होईल.
अहं भाव नामवता आला, किंव्हा जाणीव शुद्ध झाली, तर भोग प्रसादासारखे वाटतील.
शुद्ध होणे म्हणजे बुद्धीच्या पलीकडे होणे, स्थिर होणे, निरहेतू होणे, सूक्ष्म होणे, स्वतः सिद्ध होणे, शांत होणे.
हरि ओम
Shree
Shree
The experience or awareness of wholesomeness is present any time. Some knowledge systems have spoken about the same. The method to realise the awareness are varying.
There is one concept or realization based on behavioural geography and that is 'emergence'. Emergence of a Force that transforms itself into any form which is interlinked with everything around it and even to us or to the unborn and to the dead. In this setup, the things to become, those which are in the visible realm and those which have gone are given a place of existence (their actions inform visible realms) too. Existence therefore is not only a visible state, but an interlinked web of force having many layers of being, which become combinations of many states. This link remains and forms come and go in a cyclic way. This cyclic way is expressed as a respect, not something to be curbed or stopped or problematised. In totality, this becomes a Memory of Existence.
This awareness can be approached in many ways. However the majority of us are full of fragments and give too much premium on individuality. Our perception and memory is determined by our nature of awareness, either it becomes the Truth or operates as a wavering experience of forms.
To bring or transform the memory to its true nature is our motto.
Hari Om.
श्री
श्री
एकमेकांशी, इतर रूपांशी, इतर आकारांशी, इतर घटकांशी संबंध दुरावतो, तेव्हा होणारा आतील भाव त्रासिक होतो. बिना संबंध कुठलाही घटक जगू शकत नाही. आपली व्यक्तिगत स्वातंत्र्य ह्याची व्याख्या कुठे जात आहे, हे पारखावे. व्यक्ती स्वातंत्र्य जर भावनिक एकटेपण देणारं असेल, तर ती संकल्पना पडताळून पहायला हवी.
प्रगतीच्या नावाखाली आपण जर बघितलं तर गेल्या काही शतक आपण "विघटित क्रियाना" खूप दुजोरा दिला आहे भरपूर गतिमान, वेगवान, प्रगतिशील, आर्थिक भरभराट वगैरे होण्याच्या इच्छेपोटी.
त्याचे ताणतणाव सामाजिक, संस्कृती, व्ययक्तिक भावनांवर उमटले गेले आहेत आणि माणूस एकलकोंडा, विभक्त, स्वकेंद्रित (स्वतःच्या कोषात), हिंसा करणारा, बेचैन, त्रासिक झालेला दिसतोय. थोडक्यात आलेल्या मानसिक स्थितीचे आरोग्य बरोबर नाही. त्यातून होणारे चर्चा, संबंध, क्रिया, कार्य, संकल्पना अधिकाधिक विभक्ताच्या पार्श्वभूमीवरून येत आहे.
त्यासाठी काही पाऊल उचलली हवी. आपण विभक्त झालो आहोत. इथून जगाकडे बघण्याची सुरुवात करून, "आपण पूर्ण आहोत, एकच आहोत" इथ पर्यंतचा भावनिक प्रवास करायचा आहे.
मूळ प्रश्न खरा आध्यात्मिक आहे. जाणीव न शुद्ध केल्यामुळे ९९ टक्के लोकांची संकल्पना विघटन अधिक करण्याच्या मागे आहे.
हरि ओम.
श्री
श्री
श्रद्धा भाव आतील फुलतो. आतील म्हणजे त्याला दृश्याच्या भाषेत किंवा स्वभावात मांडणे कठीण. आणि कदाचित हेच सर्वात मोलाचे dnyan असावे, की दृश्यात राहून सुद्धा, श्रद्धेने वावरत राहणे शक्य आहे. असेही म्हणता येईल की दृश्यात जर कुठलीही एकमेव स्थिर आणि शाश्वत वस्तू असेल तर ती आहे श्रद्धा. बाकी सर्व वस्तू, आकार, पदार्थ, रूप हे अस्थिर असतात म्हणून गुंतून असलेले, बदलणारे, तात्पुरते, वेगळे असतात.
जेव्हा जर तर ची वळवळ मनातून कमी होईल, तेव्हा समजून घ्यावे की श्रद्धा प्रज्वलित होत आहे. श्रद्धेने सारे प्रश्न, कुठलेही प्रश्न मावळतात, त्याचा विपरीत परिणाम होत नाही, ते चिंता प्रकट करत नाही. स्वतःची चिंता देखील मावळत असावी.
रूपावरून, आकारावरून किंव्हा कुठलाही हेतू ठेवून क्रियेवरून स्वतःला पारखू नये किंव्हा संकल्पना मांडू नये. मी कशावरूनही ठरत नसतो, सिद्ध होत नसतो, समाधान पावत नसतो, अपेक्षित होत नसतो, व्याकुळ होत नसतो, वाट बघत नसतो.
दृश्यात उत्तर नाही. किंव्हा कुठल्याही प्रश्नात उत्तर नसते. हे एकदा कळले की आपण स्वस्थ होतो. प्रश्न म्हणलं तर सोडवण्याची अपेक्षा आली, ती आली की क्रिया आली, क्रिया झाली की फळ आले, फळ मिळाले की चिंता आली टिकवण्याची आणि त्यातून नवीन प्रश्न....हे चक्र ओळखता आले पाहिजे, की आपण कशात गुंतून राहतो आणि का. प्रपंच एक चक्र भाव आहे. कोण कधी येतो आणि जातो आणि काय घडत राहत आणि कशावरून आणि कुठे आणि कधी आणि कसे, असे चक्र अनुभवात वावरणे म्हणजे प्रपंचच तो! ह्याची काळजी किती करावी आणि कशासाठी?!
चक्र मावळण्याचं रसायन म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
Friday, May 23, 2025
श्री
श्री
सिद्ध किंव्हा हेतू असणे व्यवहारात किंव्हा क्षण घालवण्यात, ह्या मताचा पलीकडे मला यायचे वाटते.
क्षण कसा येतो, कुठून येतो, कसे गुंतून ठेवतो, काय दाखवतो, कसा बदलत राहतो, कसा जातो, काय साखळीत समावेश करतो, ह्यात आपला काही हात नसावा. हे मान्य केलं, तर कदाचित अर्धी काळजी तिथेच गळून पडेल. थोडक्यात अनुभवावर आपला हेतू मिसळू नये.
मग हेतू प्रकरण खूप गूढ आहे. ते का असते आणि त्याचे परिणाम कसे होतात हे ही गूढ प्रकरण आहे, म्हणजे त्याची जाणीव व्हायला आतून शांती भाव किंव्हा निवांतपणा लागतो.
हेतू गळून गेला किंव्हा उद्भवला नाही, किंव्हा प्रकट होण्याची गरज उरली नाही, तर सिद्ध होण्याची धडपडही निघून जाईल. आपण स्वतः सिद्ध माध्यमात आहोत, नव्हे तेच माध्यम आहोत हे जाणवेल.
पूर्ण जीवन जाणिवेची भाषा ओळखण्याचे आहे, सिद्ध करून दाखवण्याची नाही.
हरि ओम.
Wednesday, May 21, 2025
श्री
श्री
प्रश्नाचे उत्तर फक्त बौद्धिक मार्गाने मिळते का हे बघावे. आपली तळमळ, त्रास, अपेक्षा, साखळी, भाव, क्रिया, संबंधांचे स्वरूप हे कुठून येते, ह्याचे उत्तर तरी कुठे माहित आहे?! ह्याचा अर्थ की सर्व निर्मितीची क्रिया आहे आणि त्या क्रियेच स्थान शक्तीतून उद्भवत असावे. आपण कुठून येतो, कसे येतो, काय करतो, का जातो, कुठे जातो हे प्रश्न बौद्धिक पद्धतीने एका मर्यादे पर्यंत नेतीलही. त्याला जोड श्रद्धेची लागते, म्हणजे भगवंत शक्तीचे अस्तित्व आणि कार्य आपण ओळखू लागतो. त्यावर अधिकाधिक भरवसा ठेवायला लागतो आणि निरहेतू होतो. किंबहुना बुद्धी शांत होते आणि त्याने थाटले गेलेले प्रश्न मावळू पाहतात. ह्याचा दुसरा अर्थ हा की कुठलाही प्रश्न, स्वतःच्या रूपा प्रमाणे प्रस्तुत होतो (निर्माण होतो, प्रकट होतो) आणि तो गुंतून ठेवतो.
सर्व प्रश्नांचे मूळ मनोरचनेत आहे, जी वासनेतून निर्माण होते. परत स्वतःला सांगायला लागते की निर्मिती क्रिया स्वतः सिद्ध आहे, ती होणार, त्यातून साखळी येणार, त्यातून बरेच स्तर होणार, त्यातून येणे आणि जाणे होणार, त्यातून मर्यादा भासणार, त्यातून परिणाम होणार. इथे कुठेही खंडित कारभार नाही आणि सतत प्रवाह आहे. _हे असणार._
प्रवाह मध्ये शांत होणे, हे आपल्याला साधायचे आहे. सर्व गोष्टींचे स्पर्श होऊ देणे आपल्याला. कशालाही अडवू नये. सर्व स्तरांना सामोरे जात राहणे. सर्व येऊ देणे आणि जाऊ ही देणे. सर्व घडू देणे. सर्व हालचाली होऊ देणे. सर्वांचे स्थान प्रकट होऊ देणे.
हरि ओम.
श्री
श्री
रूप आणि आकाराचे प्रयोजन एवढेच असते की त्यांच्या पलीकडे जाऊन फक्त शांती भाव आत्मसात करावे किंव्हा त्यात स्थिर होणे.
ह्याचा अर्थ असा की दृश्य, संबंध, क्रिया, आकार, भाव हे निर्मितीचे घटक आहेत आणि ते सर्व शांत करता येतात. सध्याचा भाव वेगळा असल्यामुळे आपल्याला अनेकपणात व्यवहार करणे भाग आहे. हे कोण निर्माण करते? तर त्याचे उत्तर असे आहे, की भगवंत माध्यम करते, त्याची शक्ती करते.
अस्तित्वाचा भाग होणे, म्हणजे शक्तीचे कार्य ओळखणे, आपण शक्तीच होणे. "मी" ही देखील संकल्पना शुद्ध शक्तीतून निराळे असल्यामुळे, दृश्य मला _भासते_.
तिथून _गुंता_ निर्माण होतो. गुंता ही देखील आपल्या भावनेतून झालेली संकल्पना आहे. आपल्याला असे वाटत राहते की जो पर्यंत गुंता सुटत नाही, तो पर्यंत मला सुख अनुभवता येणार नाही. हे विधान पारखले हवे.
गुंता सुटण्याचे बरेच कारण गूढ असतात, अदृश्य स्थितीत असतात. मग तो दृश्य जगात कसा काय सुटेल?! अदृश्य आणि दृश्याचा संबंध गूढ असतो, म्हणजे तो सरळ अजिबात नाही. दृश्य कसेही असले, तरीही त्यातून अदृश्याकडे झेप घेता येते. जी क्रिया अपेक्षित आहे, ती फक्त करावी - म्हणजे श्रद्धा वाढवणे. बाकी सर्व भगवंत करेल.
Tuesday, May 20, 2025
श्री
श्री
दृश्याशी संबंध आणि त्याचे रूप हे कसेही भिडायचे म्हणालो तरी फरक कसा होतो, हे ओळखावे. त्यातील प्रश्न म्हणजे दृश्य म्हणजे काय, ते का बदलत राहते, मी कोण, मी का बदलत राहतो, हा सर्व प्रकार काय आहे, हे सर्व कुठून येतं आणि कुठे जातं, ही क्रिया कशी होते वगैरे.
_आपले असणे_ , ही एक स्थिती आहे अस्तित्वाची. ती निर्माण केली गेली आहे आणि "निर्मिती" होणे, ही दैवी उद्भवलेली क्रिया आहे, म्हणून त्या क्रियेत मूळ स्मरण आपण विसरतो. हे कदाचित विधिलिखित असावं, म्हणून दृश्याशी आपल्याला भिडायला लागतं. त्यात दृश्य आपल्याला वेगळं वाटतं आणि म्हणून संबंध संकल्पना उदयास येते. त्या संबंधात इतके घटक असतात की त्यामुळे बेचैनी, तात्पुरतेपण, भीती, तळमळ ह्या भावना उदयास येतात.
जी परिस्थिती असते आणि बदलत राहते, त्याचा आणि शांती मिळवण्याचा संबंध अजिबात नाही जोडावा. म्हणजे शांती संक्रांत होण्यास स्थिर व्हायला लागते, त्याचे उत्तर परिस्थितीच्या _मार्गातून_ शोधावे. परिस्थिती ही मानसिक जाळ आहे. जसे आपले मन, तशी परिस्थिती, हे विसरू नये. म्हणून भगवंताचे कार्य ओळखणे अत्यंत गरजेचं आहे.
इथे कार्य म्हणजे येणे, होणे, वावरणे, जाणे आणि तसे होत राहणे सदैव. ह्या घडामोडी असणारच आहेत, आणि त्या हेतूच्या पलीकडे असावेत, म्हणजे त्याला होण्यास तसे कारण नाही. सूर्य म्हणलं तर त्याच्या पाठोपाठ सावलीची निर्मिती आली, तसे काहीसे आहे.
म्हणून जे स्वतः सिद्ध आहे, त्याच्या पाठोपाठ हेतू (सावली) निर्माण झाला आणि हेतूच्या डोलारावर अनंत रूपे आणि आकार आणि त्यांचा संबंध. प्रश्न असा जाणून घ्यावा की सावली खरी की सूर्य?!
गडबड काय होते की आपण सावलीला निस्तारण्याचा प्रयत्न करत राहतो. ती कशी पुसून जाईल?! आपले प्रयत्न चुकीच्या ठिकाणी आहेत, हे आपण मान्य करायला हवे पहिले. कुणी काही बोललं, मनाच्या विरुद्ध काही झालं, चढ उतार अनुभवास आले, शरीर जीर्ण झालं, तर आपण "दुखी" होतो, आपल्याला "राग" येतो...
*हे का होतं?*
माझ्या कॉलेज मध्ये असंख्य गोष्टी राबवण्याचा उपक्रम बजावण्यासाठी एक calender करण्यात येणार आहे. हजारो गोष्टी, पर्याय, choices, options, सांगितले तरी मूळ प्रश्न राहतो की कुणाचे "भले" होणार आहे? विद्यार्थ्यांचे भले होईल का? आणि ते कसे?
हाच प्रश्न प्रपंचात विचारावा. काय मिळवून, धडपड करून, अट्टाहास धरून, उपद्व्याप करुन - स्वस्थ चित्त होणार आहोत का आपण? का खरे प्रश्न झाकून टाकायचे आहेत, म्हणून घेतला प्रपंच हातात?!! वास्तविक सत्य ओळखण्यासाठी आपण तैयारी करत आहोत की नाही, हे पारखावे.
हरि ओम.
ReplyForward |
Shree
Shree
Proximity and extremely large distances have intriguing effects on _forms._
I think a useful query to consider is what is the intention behind a form/ architecture? This is not only a brief or a program or to prove something, is it? Designers may have the above intentions, but is satisfaction created?
Here, satisfaction can be equated to the quality or experience of "being in the world or making sense of the world or at peace"....A space can _become_ this quality or a form may come out of this deeper need to belong.
If this is agreed as an important thing to be acknowledged, then what experiences do traditional settlements (and forms) generate as compared to exploded cities?
I think, we cannot ignore experiences of relating to others, and feelings of enclosures, anchoring, transitions. These perhaps even go beyond a critical stance. Language of efficiency, sturdiness, evaluation, performance fade out if not linked to the fundamental core of experience.
Automobile, industries, mass communications, have accelerated distances of all kinds - physical and mental. Who will inquire about the cost paid in return?
Hari Om.
श्री
श्री
आपल्या अनुभवातली परिस्थिती नेहमी बदलती असते आणि "अपूर्ण" असते. अपूर्णचा एक अर्थ असा की कितीही विचारांतून समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यात स्थळ आणि काळाच्या व्याख्या मिसळल्या, घटक, साखळी, स्तर, क्रियाची मांडणी केली, तरी आतील चलबिचल कमी होईल का?
इथे प्रश्न असा पडतो, की आतील क्रिया का होते, कशी होते आणि त्यावरून कुठल्या भावना प्रकट होतात?! ह्याचे उत्तर मिळवण्यास वेळ देणे भाग आहे आणि बरेच उत्तर विचारांच्याही पलीकडे असावेत, गूढ असावेत, परिवर्तन झाल्यावर कळणारे असावेत. आपण चौकट कधी पार करू, हे गूढ प्रकरण आहे. गूढ जरी असले, तरी उतावळेपणाची गरज नाही.
त्यासाठी श्रद्धा वाढवावी. श्रद्धा कुणावर? श्रद्धा, हा भाव, स्वतः सिद्ध करावा. म्हणजे शांती भाव प्रकट करावे. ते ही का करावं? कारण ते आपले मूळ स्वरूप आहे, असे संत सांगतात. मूळ स्वरूप ह्याचा अर्थ की शक्तीचा शोध सुरू राहणार आणि ह्याच बेचैनीतून शेवटी शांतीकडे आपण पोहोचू. जो पर्यंत आपण (जीव) अशी जाणीव राहते, तो पर्यंत आपण बेचैनच राहतो. बेचैन वाटणे ही एक अस्तित्वाची स्थिती आहे. त्या बेचैनीतून दृश्य जगाशी संबंध आपला येतो. This is called "vibrations".
हा भाव कसा शांत होऊ द्यावा, हा जाणिवेचा *प्रवास* समजावा. म्हणून प्रवासात श्रद्धा वाढवावी. तसे पहिले तर पूर्ण अस्तित्व आणि त्याचे अनेक घटक, रूप, आकार हे निव्वळ श्रद्धेपोटी होत असते, दुसरा हेतू नाही! त्याची जाणीव जशी आपण आत्मसात करी, तसे आपले परिवर्तन शांती रसात होते. भगवंत हा जाणिवेचा भाग आहे, बाहेरील रूपाचा नाही.
म्हणून कुठलीही परिस्थिती, कुठल्याही पद्धतीतून, कुठल्याही रूपात, कुठल्याही स्थळात आणि कुठल्याही काळात कधीही प्रकट होत गेली, तरीही तिचे पर्यवसान शांती रस प्रकट करण्यातच आहे.
हे ओळखण्यासाठी नामस्मरणाचे महत्व आहे. आपण अपुरे आहोत, त्यात अनेक गुण, अवगुण ह्यांची सरमिसळ होत असते. त्यातून आपण भावनेत वावरतो किंव्हा इतरांच्या संबंधात येतो. मान्य आहे की आकलनाच्या पलीकडे अनुभव येतात आणि खूप काही देऊन जातात.
जसे काही प्रसंगात लोकं येतात आणि निघूनही जातात वेळ आली की, प्रत्येक अस्तित्वाचा क्षण तेच खुणावतो. आलेला क्षण आनंदाने स्वीकारा आणि तीच भावना ठेवा. क्षण, येणे, जाणे हे अस्तित्वाचे गुण धर्म आहेत.
हरि ओम.
Sunday, May 18, 2025
श्री
श्री
आपल्या अनुभवातली परिस्थिती नेहमी बदलती असते आणि "अपूर्ण" असते. अपूर्णचा एक अर्थ असा की कितीही विचारांतून समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यात स्थळ आणि काळाच्या व्याख्या मिसळल्या, घटक, साखळी, स्तर, क्रियाची मांडणी केली, तरी आतील चलबिचल कमी होईल का?
इथे प्रश्न असा पडतो, की आतील क्रिया का होते, कशी होते आणि त्यावरून कुठल्या भावना प्रकट होतात?! ह्याचे उत्तर मिळवण्यास वेळ देणे भाग आहे आणि बरेच उत्तर विचारांच्याही पलीकडे असावेत, गूढ असावेत, परिवर्तन झाल्यावर कळणारे असावेत. आपण चौकट कधी पार करू, हे गूढ प्रकरण आहे. गूढ जरी असले, तरी उतावळेपणाची गरज नाही.
त्यासाठी श्रद्धा वाढवावी. श्रद्धा कुणावर? श्रद्धा, हा भाव, स्वतः सिद्ध करावा. म्हणजे शांती भाव प्रकट करावे. ते ही का करावं? कारण ते आपले मूळ स्वरूप आहे, असे संत सांगतात. मूळ स्वरूप ह्याचा अर्थ की शक्तीचा शोध सुरू राहणार आणि ह्याच बेचैनीतून शेवटी शांतीकडे आपण पोहोचू. जो पर्यंत आपण (जीव) अशी जाणीव राहते, तो पर्यंत आपण बेचैनच राहतो. बेचैन वाटणे ही एक अस्तित्वाची स्थिती आहे. त्या बेचैनीतून दृश्य जगाशी संबंध आपला येतो. This is called "vibrations".
हा भाव कसा शांत होऊ द्यावा, हा जाणिवेचा *प्रवास* समजावा. म्हणून प्रवासात श्रद्धा वाढवावी. तसे पहिले तर पूर्ण अस्तित्व आणि त्याचे अनेक घटक, रूप, आकार हे निव्वळ श्रद्धेपोटी होत असते, दुसरा हेतू नाही! त्याची जाणीव जशी आपण आत्मसात करी, तसे आपले परिवर्तन शांती रसात होते. भगवंत हा जाणिवेचा भाग आहे, बाहेरील रूपाचा नाही.
म्हणून कुठलीही परिस्थिती, कुठल्याही पद्धतीतून, कुठल्याही रूपात, कुठल्याही स्थळात आणि कुठल्याही काळात कधीही प्रकट होत गेली, तरीही तिचे पर्यवसान शांती रस प्रकट करण्यातच आहे.
हे ओळखण्यासाठी नामस्मरणाचे महत्व आहे. आपण अपुरे आहोत, त्यात अनेक गुण, अवगुण ह्यांची सरमिसळ होत असते. त्यातून आपण भावनेत वावरतो किंव्हा इतरांच्या संबंधात येतो. मान्य आहे की आकलनाच्या पलीकडे अनुभव येतात आणि खूप काही देऊन जातात.
जसे काही प्रसंगात लोकं येतात आणि निघूनही जातात वेळ आली की, प्रत्येक अस्तित्वाचा क्षण तेच खुणावतो. आलेला क्षण आनंदाने स्वीकारा आणि तीच भावना ठेवा. क्षण, येणे, जाणे हे अस्तित्वाचे गुण धर्म आहेत.
हरि ओम.
श्री
श्री
एखादा बिंदू (रूप, विचाराचे घटक, भावना, वासना) सिद्ध करण्यात कष्ट होतात. त्याला पकडून राहता येत नाही आणि सिद्ध होणे, ह्याला तर आपण स्वतःचा हेतू मिसळतो, म्हणून त्रास होतो.
गोष्टींचे रूपात येणे, होणे, वावरणे, बदल होणे, हालचाल दिसणे, जाणे हे सर्व _स्वतः सिद्ध_ प्रकार आहे - म्हणजे अस्तित्व माध्यम असल्यामुळे, त्याचा _परिणाम_ होणार, आणि तो परिणाम म्हणजे ज्याला _क्रिया_ म्हणू आणि त्या _क्रियेतून_ होऊ पाहणाऱ्या असंख्य गोष्टी, संबंध, रूप, आकार, साखळी, भाव वगैरे. ह्यामुळे *स्मरण* प्रज्वलित होते, जो जाणिवेचा अंश आहे. Awareness leading to memory of existence.
सर्व घडामोडी स्वप्नात किंव्हा हवेत होतात... similar to touching a smart screen. आपण अस्तित्वाचा अंश म्हणून होतो (एक बिंदू) म्हणून एक संबंध, वासना, भाव, साखळी धारण करतो आणि त्या प्रकारे क्रिया करतो. जसे आपण बिंदूचे स्मरण ठेवू, त्या स्मरणाच्या पोटी सर्व सृष्टी अनंत बिंदूचा साठा अशी दिसते. इथे "दिसणे" म्हणजे जशी वासना, तसे इंद्रियांच्या क्रियाना मुल्य दिले जाते आणि त्या प्रकारे परिणाम आपण अनुभवतो. म्हणजे इंद्रियांच्या हालचालींना जी शक्ती उत्तेजीत ठेवते, ती वासना समजावी.
तात्पर्य - दृश्याशी संबंध आतील स्थितीमुळे निर्माण होतो. ती स्थिती शुद्ध केली, की जग देखील सूक्ष्म दिसते/ सूक्ष्म होते.
स्थूल किंव्हा सूक्ष्म, जेवढा क्रियेचा, रूपाचा, आकाराचा भाग आहे, तेवढा भावनेचाही असावा. भावनांचे रूप बिंदू म्हणून वेगळे असते आणि भगवंत म्हणून वेगळे होते. आपुलकी, प्रेम, सैय्यम, शांती, श्रद्धा, दान, आदर ह्या भावना मध्ये आपण स्थिरावू शकतो, ध्यानात आणू शकतो अभ्यासामुळे, अनुभवाच्या मार्गात जाताना.
ह्याचाच दुसरा अर्थ की भगवंत आपल्या पाठीशी आहे आणि जे काही आपण अनुभवतो, त्याची सुरुवात आणि शेवट एक शुद्ध आणि सूक्ष्म स्थिती आहे, म्हणून ती हेतूच्या *पलीकडे* स्थित असते. तिथे हेतू ही क्रिया पोहोचू शकत नाही, किंव्हा हेतूच्या भाषेत शुद्ध स्थिती समजून येत नाही. म्हणूनच एका पद्धतीने स्वतःच्या हेतुने भगवंत जाणून घेता येत नाही. हेतूचे त्याग केले किंवा ते सोडले तरच भगवंत आपल्यात प्रकट होतो. हेतूचे त्याग करणे म्हणजे स्वतःच्या भावाचे त्याग करणे, म्हणजे "मी" ही संकल्पना शांत होणे, विलीन होणे. आणि "मी" चे त्याग करणे म्हणजे जीवाच्या स्मरणाचे त्याग होणे, अनुभवाचे त्याग होणे!
गोष्टी, अनुभव, संबंध, वासना, स्थिती कुठून येतात, कसे येतात आणि कुठे जातात, ह्याची चिंता करू नये. ह्या गोष्टी स्वतः सिद्ध आहेत, म्हणजे त्यांचे रूपात येणे आणि निघून जाणे हे विधिलिखित आहे. म्हणून आपलेही होणे आणि निघून जाणे विधिलिखित आहे. ह्या गोष्टीला शांतपणे स्वीकारणे.
हरि ओम.
श्री
श्री
अनेक विचार...
ठासून भरून गोष्टी करत राहणे योग्य आहे का, हे स्वतःला विचारावे. खूप केल्याने वासना तृप्तीकडे जातात का, हे ओळखावे. तृप्त होणे म्हणजे सूक्ष्म, अदृश्य, समाधानी भाव संक्रांत होणे. हे वासना पुरवून होते का? वासनेला चिकटून किंव्हा धरून तृप्त वाटते का? वासना आणि अस्तित्व वेगळे असते का, म्हणजे पहिले काय असते आणि नंतर काय येते, कशातून येते आणि रूप होत असताना आणखीन कोणते रंग चढतात हे ओळखावे.
तर असे दिसून येईल की रूप धारण करताना किंव्हा दृश्यात येताना किंव्हा दृश्य अनुभवताना अस्तित्व शक्तित बरेच, असंख्य, साखळीतील स्तर चढतात. त्याला कांद्याची उपमा देता येईल आणि अनेक रूपांचे कवचे धारण करून शेवटी एक दृष्टीला भासण्यासारखे आकार दिसून येते.
म्हणून सर्वात शेवटचे, बाहेरचे, बदलणारे, परावलंबी कवच आहे ते आपले जग आणि देहाची जाणीव. त्याला स्थूलपणा सर्वात अधिक.
सर्वात आतील सूक्ष्म स्थिती म्हणजे भगवंताची शुद्ध शक्ती किंव्हा त्याच्या अस्तित्वाची जाणीव. ती शक्ती असते _म्हणून_ सर्वात बाहेरचे कवच दिसते किंव्हा निर्माण होते. बाहेरील कवच ह्याला तसे स्वतंत्र अस्तित्व अजिबात नाही. म्हणून त्याला तात्पुरते मूल्य, वेगळेपण असते. तो त्या कवचाचा गुण धर्म आहे.
Each of such _layers_ mean boundaries and potentials to transcend those. So there is a tendency to continue as a boundary or to transcend it...always. One can choose to engage oneself in transcendence and penetration of all layers or to keep identifying with some layer. Choice is ours. And the right choice can come from awareness.
हरि ओम.
श्री
भीती कदाचित अशी असते की एखादा विचार किती विस्तारू शकतो आणि कुठे नेऊन पोहोचू शकतो आणि ते करत असताना कोणता परिणाम पडेल स्वतःवर?! In a way, this is a _critical_ engagement having skepticism, doubt as some of its ingredients. हे केल्याने कधीतरी महत्वाचे प्रश्न असे येऊ शकतात की - दृश्य म्हणजे काय, ते कसे होते, ते कोण निर्माण करते, मी म्हणजे कोण, मी कुठून येतो, मला कशाची भीती असते, भीती आहे तरी काय, ती कशी घालवावी, मी परिस्थितीत का गुंतून राहतो, संबंध म्हणजे काय, पळून जाणे योग्य आहे का, ह्या प्रश्नांचे उत्तरे कसे संपादन करावे, शांत होणे म्हणजे काय, शांती संक्रांत कधी होईल, भगवंत म्हणजे काय, नामस्मरण का करावे, श्रद्धा म्हणजे काय, प्रतिक्रिया म्हणजे काय, सुरुवात कुठून करावे, केलेले कार्य योग्य आहे का?....
एकंदरीत ह्याला शक्तीचे जागे होणे असे म्हणू शकतो किंव्हा भगवंताची कृपा होते म्हणून प्रश्न पडतात असे म्हणू, किंव्हा स्वतःचे प्रयत्न चालू ठेवणे असे म्हणू.
प्रश्न पडणारच आणि शोध हा घेतला जाईलच. तो मार्ग निवडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार भगवंताने दिलेला आहे. त्यासाठी स्वतःला सिद्ध करणे हे आपले ध्येय अजिबात नाही, असे मला वाटते. भगवंत आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी निवडलेला मार्ग असू नये. तो शोध स्वतःने स्वतःसाठी घ्यावा. दृश्य काय आहे आणि त्याचे कोणते घटक असावेत हे स्वतः जाणून घ्यावे. इथे फक्त एक मी असतो, दुसरा कुणीतरी वेगळा असणे हा भ्रम आहे.
हरि ओम
Friday, May 16, 2025
श्री
श्री
विचार आणि त्याचे चिंतन करणे महत्वाचे आहे. जाणिवेचे स्थान असते, ते शक्तीचे एक गुण आहे. म्हणून अस्तित्वात जाणीव, अनुभव, क्रिया,परिणाम, भाव, रूप, वस्तू हे राहणार.
रूप किंव्हा आकार होत राहणे ही क्रिया आहे अस्तित्वाची, _तात्पुरती_ किंव्हा ज्याला मी "ठेहेराव" म्हणीन. तसे आहे, म्हणून ती स्थळ, काळ, क्रियाच्या चौकटीत वावरत असते, तसे गुण घेऊन झालेली असते. म्हणून असे होत राहणार, रूप आणि आकाराच्या बाबतीत.
सर्व थांबण्याचा क्रियेला चालना भगवंत देतो, त्याची शक्ती देते, ती दृश्यात दिसते/ भासते. म्हणून ती शक्तीच ठरवते की कधी, कुठे एखादे रूप दाखवायचे आणि विलीन करायचे. हे शक्तीचे कार्य आहे.
आपण त्या शक्तीतूनच आलो असल्यामुळे, आपण हे कार्य स्वीकारले, तर शांत होऊ. भगवंताचे अस्तित्व प्रचितीस येणे, म्हणजे शांत होणे.
हरि ओम.
Shree
Shree
How should one perceive an _object_ ?
Object only has a relational existence. I see it either as closed, introverted, disconnected with surroundings, product of a context, an inspiration, an experience, communal, human centric, controlled freak, historical, ahistorical and so on.
Therefore above indicate intents behind the form of becoming. Or intents give rise to objects.
In our discussions in academic institutions, students require to realize different intents that generate a form. A student need not latch on to existing vocabulary of objects (because that becomes stale), but they should take the opportunity of realizing the form from _intentions._
_Visualising_ is the becoming of intentions. Do we hurry students to create a form? That's a question we need to ponder about.
Now there might be preferred intents over those which suggest inappropriate ones. Why? Because probably the preferred intents suggest a few of these things - environmental sensitivity, ethical position, connections with everyone, community led experiences, crux of experience itself, expansion to a higher value, synthesis of everything and not leading to separations or fragments. These create a "memory" or "awareness" that suggests a concept of what it means to exist in this world?
Therefore, the _perception of form_ is a temporary stop in a long process of flow/ evolution. Whenever one wishes to station intents, it results into an experience of a form. One perceives a form whenever an intent materializes, quite similar to the vapour materializing into ice cubes! I can see an ice cubes, but I can only feel vapour, since vapour is unbounded, depicts a flow, and seems more subtle.
Therefore this indicates that feelings perceive unbounded, non territorial, fluid forces or ideas or intentions. Those crustallize into some form when the intellect interacts with feelings. Therefore feelings and intellect signify _different states of awareness._ Feelings seem more subtle state of awareness than the intellect. Desires (which lead to ego centric actions) seem even more gross and visible and urge an immediate action of some sort.
Therefore one critical inquiry is how does a form take shape from intentions?!
Hari Om.
Thursday, May 15, 2025
श्री
श्री
जाणीव ही अनेक क्रियेतून रूपात दिसून येते किंव्हा प्रकट होते. प्रकट होण्याला हेतू नसावा. जर जाणीव असण्याला आणि त्याचे परिणाम व्हायला हेतू नाही (स्वतः सिद्ध असल्यामुळे) तर त्यातून सर्व साखळी निर्माण व्हायला दृश्य व्हायला, त्या दृश्याशी संबंध होण्यालाही हेतू कसा असेल?!!
इथे समजणे आहे की स्वतः सिद्ध म्हणजे _असणे_, असण्याला कारण लागत नसणे, आणि त्यावरून होणाऱ्या क्रिया होत राहणे आणि त्या क्रियेतून अनेक रूप आणि आकार प्रत्ययास येत राहणे. दुसरा शब्द आहे ह्याला "प्रकृती".
वेगळ्या अर्थाने मांडायचे झाले तर _हेतू_ रूप आणि आकार निर्माण करते आणि जो पर्यंत हेतू टिकून असते, तो पर्यंत दृश्याशी संबंध होत राहणे आले. म्हणजे हेतू होणे असण्यातून आणि क्रियेतून होणारे प्रकरण ओळखायला हवे. असणे आहे, म्हणून त्यातून _हेतू होणे आले_. तसे पहिले तर असणे हेतूच्या अगोदर येते! किंव्हा असण्याला काही हेतू लागत नाही! म्हणजे आपण हेतूचा रंग कसाही घालू शकतो! हेतू दगडासारखे कडक समजण्यापेक्षा लवचिक, निर्माण होऊ शकते, असे ओळखायला हवे. आपल्या अस्तित्वाला (जीवाच्या) हेतू लागतो. हेतू नाहीसा झाला किंव्हा शांत झाला, की आपणही भगवत स्वरूप होतो.
आपल्या रूपास आणि शुद्ध अस्तित्वाला जोडणारा दुवा म्हणजे हेतू. हेतू एक विलक्षण चक्र, क्रिया, साखळी, परिणाम, संकल्पना, भाव दर्शवते! हेतू फक्त बौद्धिक न राहता, सर्वांगीण स्तरावर पसरतो किंव्हा कार्य करतो म्हणून हेतूचे पाया मुळे खूप खोल असतात, ते दृश्यात दिसत नाही, ते सूक्ष्म स्तरातून प्रकट होत राहतात. दृश्य तर त्या हेतूचे बाहेरील टोक आहे, ज्याची सुरुवात किंव्हा लगाम भगवंताच्या हातात असते! प्रत्येक खोल स्तरात जाताना, हेतूची _क्रिया_ बदलत राहते (म्हणजे प्रभाव, कार्य, संबंध, भाव, अनुभव वगैरे) म्हणून प्रत्येक आतील टप्प्यात शिरताना बाहेरचे सर्व संबंध सोडायला लागतात. परत संबंध हा सरळ अर्थ घेण्यापेक्षा, सर्वांगीण गूढ क्रिया आहे, हे ओळखणे.
हे ओळखण्यासाठी आणि तसा अनुभव घेण्यासाठी नामस्मरण करत राहणे.
हरि ओम.
श्री
श्री
समाधान म्हणजे दिलेल्या परिस्थितीत शांत वाटणे. परिस्थितीत वावरत असताना, शांती पूर्ण टिकून राहणे. म्हणजे निरहेतू कर्म करत राहणे, सर्व देणे, अपेक्षा न ठेवणे, शुद्ध होत जाणे, श्रद्धा वाढवणे, सूक्ष्म होणे, रूप जसे असेल किंव्हा अनुभव/ संबंध कसेही आले, त्यांनी व्याकुळ न होणे, कालची आणि उद्याची चिंता न उद्भवणे वगैरे.
काल आणि उद्या किंव्हा स्थळ, काळ, क्षण, क्रिया हे शक्तीचे परिणाम आहेत, ज्यावरून भाव आणि संकल्पना होते, चक्र होतं आणि विषय तैय्यार होतो. रूप, साखळी, बदल, गुंतागुंती, संकल्पनांचे स्वरूप, निर्मिती क्रिया आपल्या हातात नसते - ती दैवी उद्भवत असते. म्हणून दृश्याचे असणे, होणे, वावरणे आणि बदल होणे हे भगवंत ठरवतो.
आपल्याला शांतीने संबंध ठेवायला लागतात अस्तित्व जाणून घेण्यात. त्या मार्गावर असणे. मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग का आहे, हे जाणून घेणे.
हरि ओम.
श्री
श्री
अस्तित्वात असणे ह्याचे बरेच अर्थ निघतात, आणि ते जाणवणे म्हणजे आपला प्रवास होतो.
जीव हे _शक्ती चक्र_ आहे. चक्र म्हणजे क्रियेच एक स्वरूप. त्या स्वरूपात साखळी, घटक, स्तर, भाव, विषय, मन, गुंतणे, परावलंबन, जाणीव, विचार, भावना, परिणाम, भोग, वासना असे अनेक घटक ध्यानी वावरत असतात. त्याचे वर्णन सूक्ष्मापासून ते स्थूल पर्यंत होत असतात, किंव्हा ध्यानी येतात आणि ते सांगत असताना त्या होण्याची रचना काय किंव्हा विश्लेषण काय, हे शब्दात मांडू शकतो आपण. आध्यात्मिक पद्धतीने आपले आणि अध्यात्माचे नाते काय, म्हणजे वरील वर्णन जाणून घेणे.
विचारांच्या बळावर समजून घेत राहताना सर्वांगीण चिंतन चालू ठेवायला लागते आणि त्या संकल्पनांचे _अनुभव_ घ्यायला लागते. परत, वरील क्रिया ही अनुभव देते. सध्या अनुभव आणि मी ह्याला वेगळे आपण मानत नाही, म्हणून प्रवास जो म्हणायचा तो म्हणजे अनुभव शुद्ध होत त्याचा परिणाम कसा कमी होईल (कष्टी न बनवेल) हे जाणून घेणे.
वरील दोन्ही गोष्टी दररोजच्या प्रपंचावरून करत राहायला लागतात. प्रपंच हा झालेला संबंध अस्तित्वाशी, किंव्हा एका स्थितीत गुंतून राहण्याची क्रिया आहे. त्या गुंतण्यामुळे एका प्रकारचे अनुभव, जाणीव, क्रिया, परिणाम होत राहते. ते मनाला घट्ट चिकटून राहते आणि त्याचे संस्कार होत राहतात किंव्हा स्मरण राहते. त्यास आपण भोग म्हणतो.
आपला प्रवास प्रपंचशी संबंधातून आहे. प्रपंच सर्वांना आहे आणि त्यात बदल, हालचाली, गती असे अनेक गोष्टी येत राहणार आणि निघून जाणार. त्यातच आपल्याला शांती भाव आत्मसात करायचा आहे, म्हणजे सर्व एकच आहे, अशी जाणीव होणे आहे.
हरि ओम.
Sunday, May 11, 2025
Shree
Shree
Choice can reach the ultimatum level of truth seeking and truth realization.
A concept can include anything regarding intangible realizations and that would mean that the concept is not interested to prove anything, justify anything or seek any validation. It can suggest an opportunity given to the self to grow.
Life is a concept and is an opportunity to "be" in the most natural state of being. This is one definition that is suggested here. And in suggesting this, a position is not suggested and neither one is answerable to what has been suggested here.
Hari Om.
Shree
Shree
Traditions and histories are _relation forming concepts_ with the now.
It is not necessary to start knowing a relationship in that way.
Another kind of relationship starts with engaging with 'now' and realizing connections with histories or traditions...which is also fine.
An architectural thought 'spreads and connects' and isn't required to be handed down as a precedent or a successor to anything that might have happened before. In such a case, the architectural thought is unconcerned with a defined forward movement or building on above something else.
Bottomline is of connections..how does one realize it?
A _history_ as an undertaking seems irrelevant. All is present only in the 'now' as connection seeking need.
Hari Om.
श्री
श्री
*गोळ्याचा* अनुभव संक्रांत होणे म्हणजे
स्थिर वाटणे
शांत वाटणे
हालचाली बघणे
प्रतिक्रिया मर्यादित वाटणे
सर्व घडू देणे
उतार चढाव ह्याची चिंता न वाटणे
बदलांचे साक्षी घेणे
प्रश्न असले तरी शाश्वती वाटणे
अट्टाहास गळून जाणे
स्वतःची परिस्थिती स्वीकारणे
गतीवर भरवसा येणे
दोष ह्या क्रियेच्या पलीकडे येणे
टापटीपचा आटापिटा गळून जाणे
स्थळ आणि काळ ह्याची चिंता किंव्हा निंदा न करणे
आपण कशासाठी आलो आहोत, ह्या प्रश्नाने चिंतित न होणे
श्रद्धा वाढत राहणे
श्रद्धेने बदलांकडे लक्ष न वेधले जाणे
पुरे - अपुरे ह्या तुलनेवर प्रक्रिया न देणे
का ह्या प्रश्नावर निर्भर न राहणे
गूढता स्वीकारणे
आतील स्थितीचे स्थान स्वीकारणे
आतील स्थितीचे स्वभावाचे, गुण धर्माचे स्थान पूर्णतः स्वीकारणे
हरि ओम.
श्री
श्री
दृश्य जगाचा अनुभव स्मरणात आणणे, ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून ते स्वीकारावे शुद्धतेने.
त्या अनुभवात अनंत हालचाली, गोष्टी, पदार्थ, गुंतागुंती, आकार, गुण, रूप, परिणाम जाणवत राहतात. त्यामुळे आपली स्वतःची जाणीव आणि जगाची जाणीव प्रज्वलित होत राहते. जसा मी आहे,तसे बाकी सारे आकार आहेत. अनुभवाचे रूप जसे मी भोगतो, तसे सर्व भोगतात. वेगळेपण, तात्पुरतेपण हा देखील जगाचा गुण आहे आणि त्यातून येणारे संबंध.
इथून प्रवासाला सुरुवात आहे. तो प्रवास अनेक जन्मांचाही असावा, कुणास ठाऊक?! प्रवासाचे कारण भगवंत आहे आणि शेवट तोच आहे. म्हणून तिथ पर्यंत जाणे आहे.
हरि ओम.
श्री
श्री
अस्तित्व गोल असते आणि मोकळं असते - त्यात आकाश आणि क्रिया ह्याचे समावेश असते. फक्त आकाश नाही, आणि फक्त क्रिया आणि त्यातून होणारे आकार नाही. दोन्ही असण्याला अस्तित्वाचे गुण, जिवंतपणा किंव्हा श्वास किंवा इच्छा म्हणावे. हे दोन्ही गोष्टी आपल्या अनुभवात येतात, आपण ह्या दोन्ही गोष्टींचे आहोत. बदलांच्या _मध्ये_ आकाशाचे अंश तर असतेच आणि जसे अंतर्मुख होत जाऊ, तसे आकाशाचे प्रमाण वाढते आणि बदलांचे किंव्हा आकारांचे कमी होत जाते. ह्याचा कदाचित अर्थ असा असावा की जे आपल्याला आकार वाटायचे पूर्वी, ते अंतर्मुख होताना विरघळून आकाशात त्यांचे रूपांतर होते! म्हणजे आकाश सगळ्या वासना ह्यांना, वृत्तीना, साखळीला, संबंधांना, रूपांना, आकारा ह्यांना, *समावते*. सगळ्या गोष्टी आकाशात (भगवंतात, आत्म्यात, शक्तित, सूक्ष्मात, अदृश्यात) *विलीन* होतात. म्हणून आकाशाला "सत्य" ही उपमा दिलेली आहे, त्यात दुसऱ्या कुठलाच अनुभवाच शिरकाव होत नाही, निर्मिती होण्याचे कारण असत नाही.
दररोजच्या दृश्य जगातून आपल्याला सुरुवात करायला लागते. जे काहीही असो, कुठूनही आलेले असो, कसेही असो, कुठेही जाणार असो, कसलेही हालचाली असो, ते पूर्णतः स्वीकारावे, ही पहिली पायरी. गोष्टी येण्यात, होण्यात, वावरण्यात, बदलण्यात, जाण्यात - ह्यात शक्तीचा (आकाशाचा) हातभार असतो. आकाशाचे स्रोत आपल्यातही असते, त्याचे चिंतन करत आत्मसात करायला लागते. त्याचा अनुभव हा आपल्याला सर्वव्यापी करतो, शुद्ध करतो, स्थिर करतो, मोकळे करतो. हीच ती नामसाधना.
सर्व गोष्टींचे कारण, संबंध - ह्याचे बीज आपल्यात असते. ते ओळखावे आणि त्यास शुद्ध करावे. त्याची सतत आठवण आणि संस्कार आत पर्यंत होण्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम
Shree
Shree
To perhaps bring a _global_ clarity to mankind's existence may lead to disorder! Such an enterprise seems flattening, authoritative, narrowly conceived, bureaucratic, exploitative and so on.
The experiences we all have are unique and varied. Those become a measure to make sense of the world we live in. Somewhere in this process, the reality of connections and relations begins to unfold and that subsequently transforms to include all things. That makes us steady.
Therefore, unique experiences automatically create a situation/ right to approach the phenomena in a unique way to each one of us. That uniqueness would suggest ideas of purpose, free will, destiny, variables, relations, transcendence, efforts, processes, space, time, being and so on.
Therefore there can't be a uniform theory of architecture. The many voices of the same testify this observation. But one has the ability to realize Principles, which could be the core of design. Also one need not necessarily always refer to a theory as a start point of appreciating and creating architecture. Appreciation and creation can be sharpened, since those tendencies are already present in us. Those need some opportunity to develop.
Hari Om.
श्री
श्री
कुणाला काहीही वाटू द्यावे, काहीही फरक पडत नाही. मी कुठून आलो, कसा आलो, काय वाटते, कधी वाटते, कसे वाटते, का वाटते - हे महत्वाचे प्रश्न असावे का इतरांना? आणि मी नाही त्याचा उलगडा केला, तर त्यातून प्रेमाचे महत्व काही गायब होणार आहे का काय?! मी मुका असलो, तर काय प्रेम करणार नाही का?! मी शांत बसलो, तर काय जग बुडी होणार आहे की काय?! मी इथे असलो किंव्हा तिथे, त्याने दृश्यात काय फरक होणार आहे की काय?! मी हे केलं किंव्हा ते केलं, वेळ असा घालवला किंव्हा तसा, त्याने काय त्रास होणार आहे की काय तुला?! मला गोष्टी अस्पष्ट वाटत असल्या तर ते स्पष्ट करण्याचा अट्टाहास मी बाळगू की काय?!
एवढ काय भूत मागे लावले आहे स्पष्टता द्यायला?!!
हरि ओम.
श्री
श्री
प्रत्येक जीव, _आपण_ , कसले रूप घेऊन येतो, त्याची चिंता करू नये. आपण खूप साऱ्या स्थितीतून आलो आहोत, बदलणार आहोत आणि परिवर्तित होणार आहोत.
असू द्यावे सगळे. अर्धवट स्मरण असू द्यावे आणि त्यातून जे अनुभव येत आहेत, ते येऊ द्यावे. टीका स्वतःसाठी असते, दुसऱ्यांसाठी नाही. चिंता असणार. ते येऊ द्यावे. सर्व येऊ द्यावे. समजून घेणे की काय येत आहे, काय वावरत आहे, काय निघून जात आहे.
असू द्यावे बोलणे किंवा न बोलणे. असू द्यावे अनेक स्थिती. असू द्यावे खूप अवघड प्रश्न आणि गुंता. असू द्यावे गाठी. असू द्यावे प्रयत्न आणि सैय्यम. असू द्यावे सर्व काही. असू द्यावे हालचाली. असू द्यावे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. असू द्यावे कडक उन्हाळा, पावसाळा आणि थंडी. असू द्यावे चढ आणि उतार. असू द्यावे गुदमरणे आणि मोकळे होणे. असू द्यावे वेग आणि स्थगिती. असू द्यावे दोष आणि गुण. असू द्यावे आपुलकी आणि एकटेपणा.
असू द्यावे सर्व काही.
हरि ओम
Thursday, May 08, 2025
Shree
Shree
Space is consciousness/existence. That is, it is a form of expression and experience of existence. We can connect or relate to consciousness/ existence _through_ a spatial phenomenon. Therefore space affects us and we project and experience spatially. Therefore consciousness, experience and space seem to be the same.
When one talks of space, possibly one is expected to talk about the above mentioned relationship. The understanding of space possibly may appear incomplete, if experience and consciousness is not spoken about.
Hence someone working with space, the engagement required is far more fundamental that what meets the eye.
Hari Om.