Thursday, July 31, 2025

Shree

 Shree

I was referring to one of the previous thoughts and what it had to say – that hearing things out from other people or even doing your own stuff may make you feel rather disoriented and urge you to take “some action” at an urgent level. One can decode why this happens. Some of the reasons that could be understood were;

Everyone’s scope pf perception and thereby the inferences one draws or the kind of connections and sequences one makes is different and talks about a “scale” of action/ memory. I may not wish to do anything in a given situation whereas the other person may think that action is immediately required. Why this tendency differs is because of how one is thinking and one’s awareness of reality. Here are certain fears one constructs based on this and potentials one senses because of this – all differ from person to person. And incidentally one is so consumed by one’s thought processes that it takes effort and patience to understand the position in which other is saying something. With shortage of time, this leads to arguments.

I am seriously thinking what should be the approach to quieten this tendency of arguments? “resolving” and prioritizing and insisting a relationship among different positions is one of the ways – but provided one is willing to resolve and come to some inference, else it is too much exhausting and not worth the effort. I sometimes resist talking if I get a feel that this is where the communication may lead. Again why does this happen? This is a question that requires substantial time to understand and the more we fragment space and time and action and ourselves arguments increase as each one’s perception becomes extremely limiting. And the more limiting it becomes, the more urgent it prompts the person to act.  Therefore fragmentation has serious effects on people.

We can’t avoid fragmentation – that is what I am realizing. We cant prove to anyone (and the other is does not realize) why resolution is required. In this case, we should develop the strength of “letting things be as they are” and remain silent. Being silent does not mean non action in any way. Secondly we should encourage whatever the signals keep coming in the mode of discussion and arguments – whatever those take some shape and take time to let them float ad change. At times the other person talks more from some perception rather than a rational thought and by letting the person talk, the rationality comes in eventually and he/she is then more forthcoming to deliberate on matters. Therefore probably the conversations start from irrational spectrum and lead to a rational spectrum. We should operate from a rational spectrum and not the irrational ones.

 

Hari Om. 

श्री

श्री 

स्मरणाची उत्तम अवस्था म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा भाव. आपण साक्षात भगवंत आहोत, सूक्ष्म आहोत, अस्तित्व आहोत, हे ओळखणे. 

 *स्मरण* , ही संकल्पना, म्हणून गूढ आहे, लवचिक आहे, त्यात बरेच घटक आहेत, त्यात भाव आहे, जाणीव आहे, आणि त्यातून होणाऱ्या क्रिया आहेत, ज्यात संबंध येऊ पाहतात. 

इतर वेळेला आपण कुठल्यातरी स्मरणेच्या स्थितीत असतो, म्हणून त्या प्रमाणे दृश्याशी संबंध ठेवतो आणि त्याचे परिणाम भोगतो किंव्हा अनुभवतो. मग ते स्मरण देहाचे असावे, किंव्हा भावनेचे, किंव्हा बुद्धीचे, किंव्हा वृत्तीचे...त्यावरून रूप आणि आकाराचा अर्थ प्रचितीला येतो. 

अध्यात्माचे म्हणणे आहे, की स्मरण शुद्ध करावे. त्यातून सत्य कळेल आणि ते कळून घेताना विचार आणि भावना बदलून येतील आणि शांती संक्रांत होईल. म्हणजे ही परिवर्तन होण्याची क्रिया आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपण कप्पे का करतो, हे बघावे. कप्प्यात आपण इतके बुडून जातो, की समोरची हाक देखील ऐकू येत नाही! इतके आपण रूपाला, आकाराला, त्या भावनेला घट्ट पकडून वावरतो! ह्या भावनेचे मूळ कुठे असते आणि ते कसे निर्माण होते, ह्याचे चिंतन करावे.

 अस्तित्वात सर्व कार्य होते, स्तर, स्थिती, साखळी, चक्र, भाव, परिणाम, रूप, आकार, हालचाली, गती, बदल वगैरे. हे कार्य खूप विलक्षण आहे आणि त्याला कशाचीही मर्यादा नाही. ते कार्य अनंत रूप आणि आकार घेऊन वावरते, पण मूळ माध्यमाला धक्का लागत नाही! म्हणून कार्य काय समजावे, हे जाणून घ्यावे. इथे जाणे, तिथे जाणे, ताबा मिळवणे, सिद्ध होणे, आकार बघणे, व्यवहार करणे म्हणजे कार्य आहे का? कार्य रुपाशी आणि आकाराशी निगडित असायला पाहिजे का? की ते सर्वांच्या पलीकडे असू शकते? 

राग येणे म्हणजे कार्याची सीमा खूप आकुंचित आहे आणि क्षणात जाणीव आहे. शांत असणे म्हणजे कार्याला सीमा अमर्यादित आहे आणि जाणीव सूक्ष्म आहे, अनंत आहे, स्थिर आहे. म्हणून कशामुळे काय होते आणि कुठल्या भावना येतात, ह्याचा जास्ती विचार करू नये. आपण स्थिरतेकडे कार्य करावे, जे योग्य वाटेल ते करावे आणि सर्व फळांचा स्वीकार करावे. 

आपल्यासाठी मार्ग कार्यातून आहे आणि कार्य म्हणजे मनाच्या शक्तीवर संस्कार होत जाणे आणि शुद्धतेचा अनुभव येणे.

हरि ओम.

Sunday, July 27, 2025

श्री

 श्री 


स्मरण कशाचे असते? त्यातून काय धरलेले जाते आणि काय सोडलेले जाते? त्यातून कुठले स्तर निर्माण होते आणि त्यातून कुठले भाव होते? म्हणजे स्मरणातून खूप क्रिया आणि वेगवेगळ्या भावनांचे संबंध प्रकट होत राहतात. 

आज जेव्हा मी एक फोटो झाडाचा पहिला एक व्यक्तीने पाठवलेला, तर तो आकार बघून कसले स्मरण झाले, कुठल्या भावना मनात आल्या? त्या झाडाचे नाव, ते कुठे आले, दिवसाचे किरण, जागा, त्याचे वय, पर्यावरण ह्या बद्दल विचार येऊन क्षणात सर्व विचार परिवर्तित झाले एका गोष्टीवर - आनंद भाव. 

तो भाव, सर्व गोष्टी ओलांडल्या, की सर्वांमध्ये असतो आणि ज्यावरून खरे संवाद सर्वांशी होतात. स्पंदन येत राहणार, त्यातून _बदल_ होत राहणार. स्पंदन, जे अस्तित्वाचे कार्य आहे, त्यातून अनेक साखळी मिळून, वृत्तीचा उगम होऊन, स्मरण होऊ पाहते. 

बदल कार्य कसे होते, हे जाणवायला हवे. कार्य म्हणजे ते होत राहणार. त्याला का, कधी, कुठे, केव्हा असे प्रश्न विचारणे वेडेपणाचे ठरते. व्यक्ती, स्वभाव, हेतू, संबंध, आकार, भावना, विचार - हे होत राहणार...त्याला घडू द्यावे. कसलाही आकार किंव्हा रुपा बद्दल आपण काहीही म्हणू शकत नाही. ती सर्वस्वी भगवत इच्छा मानावी. सर्वांना शुद्ध भावनेने स्वीकारावे. बदल, परावलंबन, स्थिती, स्तर ह्या गोष्टी राहणार आहे. 

खरं तर, आपण स्वतःला घाबरतो आणि स्वतःच्या मर्यादा लपवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः पासून पळून जाणे अशक्य. त्यापेक्षा स्वस्थ होऊन शांतीने बघा की काय उमटत राहत स्वतः मध्ये. कालांतराने ते उमटण्याचे परिणाम शांतीत रुपांतर होतील.

हरि ओम.

हरि ओम.

Saturday, July 26, 2025

श्री

 

श्री 

 शांती म्हणजे योग्य संबंध आणि कार्य करणे. काहीही नको, असे होत नाही. कार्य तर राहणारच अस्तित्वात...त्या कारणामुळे/ कार्यामुळे/ स्पंदनामुळे काय होऊ पाहते, हे महत्वाचे आहे. त्याला आपण "भगवंताची इच्छा" असे संबोधले आहे. 

 म्हणजे शांती आपल्याला विचारत, भावनेत, कृतीत आणणे महत्वाचे आहे. जाणीव सूक्ष्म झाली की शांती येते, अंतर्मुख झालो, स्वावलंबित पद्धतीने गोष्टी केल्या, स्थिर झालो, सर्वांसाठी कार्य केलं - की शांती भाव संक्रांत होतो. 

 एका बाजूला स्वतःचे प्रयत्न आहेत, की मनाला अधिक सूक्ष्म कसे करत रहावे. दुसऱ्या बाजूला परिस्थिती स्वीकारणे आहे, की आपण मोठ्या प्रवासात आहोत, ज्यात गनिमी काळापासून असंख्य क्रियेतून आपण "होतो", दृश्यात येतो, व्यवहार करतो. म्हणजे शुद्ध जाणिवेत परिवर्तन होऊन जीवाची जाणीव होते आणि ती व्यवहार करते. त्यातून निष्कर्ष करावे की श्रद्धा का महत्त्वाची असते आणि ती कशी प्रकट करावी. 

 तिसरी गोष्ट ही की स्वतःच्या मर्यादांवर न्यून बाळगू नये, चिडू नये, त्रासिक होऊ नये. स्वतःची वावरण्याची स्थिती स्वीकारावे. कोडी सोडवण्याचा अट्टाहास करू नये. स्वतःचा स्वभाव किंव्हा दुसऱ्यांचा स्वभावातील गुंता सोडवणे कठीण...तो श्रद्धेने स्वीकारला जातो. सिद्ध होण्याचा अट्टाहास असू नये. कर्तव्य करत राहावे. जे होईल त्यातून, ती भगवत इच्छा आहे, असे खरे मानणे. 

 चौथी गोष्ट म्हणजे अनुभवाचे स्थान रेषेपासून ते चक्र होणे योग्य ठरेल. तो जाणीव शुद्ध होण्याचा मार्ग. म्हणजे सर्व काही - ज्याला आपण काल घडून गेलेल्या गोष्टी, आत्ता चे क्षण आणि उद्याची संकल्पना - सर्व एकाच ठिकाणी भेटतात आणि सर्वां मधली विभागणी निघून जाते. The _idea_ of past, present and future dissolves or merges. So it is always a matter of imagination, which we harbour or relate to or create. Imagination is a function of awareness of Being. So a heightened awareness will lead to a corresponding quality of imagination of Being. 

 पाचवी गोष्ट ही की भगवंताच्या कृपेची प्रार्थना करावी.

 

 हरि ओम.

 

श्री

 श्री 


परिस्थितीचा योग्य अर्थाचा आकलन करणे. *योग्य अर्थ होणे* , हा प्रवास आहे सत्य ओळखत राहण्याचा. ह्याला प्रवास म्हणायला हवा. 

मूळ संकल्पना जी आहे परिस्थितीची, ती अस्तित्व भावाशी निगडित असते. ज्या प्रकारे वासना, स्पंदन, संबंध होत राहतात त्या शक्तित, त्या प्रमाणे स्थळ, काळ, क्रिया आणि परिस्थितीशी नाते आपले होते. "मी" देखील परिस्थितीच आहे, जी अनंत प्रवासात आहे, आणि जी अनंत संस्कार घेऊन आलेली आहे. 

आपण जीव आहोत. ती एक अस्तित्व शक्तीची स्थिती आहे. जसे स्पंदने शुद्ध होतात, तसे सर्व संबंध, जाणीवा, क्रिया, परिणाम शुद्ध होत जातात. शुद्ध म्हणजे विशाल, सूक्ष्म आणि सर्वांमध्ये असणारा दुवा. आपल्याला अस्तित्व "संबंध" ह्या पद्धतीने समजत जाणार आहे, सत्य आहे की नाही, हे आत्ता कळणे अवघड. 

म्हणून भगवंताशी संबंध जोडावे, त्या शक्तीशी संबंध जोडणे. 

दररोजच्या जाणिवेत किंव्हा व्यवहारात आपण खूप स्वार्थी आणि विघटित वावरत असतो. हे कबुल करावे. म्हणजे भीती कुठून येते आणि ती कशी प्रकट होते, ह्याचे थोडेतरी भान व्हायला लागते. भीती आहे, ह्यात कबूल करायला काही न्यूनपणा नाही. ममत्व त्यामुळे प्रकट होते, हे ही कबूल करावे. ते नैसर्गिकही आहे. भगवंताची इच्छा आहे, तर त्याचे स्थान असणारच. फक्त त्यात अडकू नये, त्याला सर्वस्वी मानू नये. दृश्यात कुठलीही गोष्ट स्थिर आणि पूर्ण भाव प्रकट करत नाही आणि ती आपल्या मनाचा आरसा दाखवते. जसे आपले मन, तसे दृश्याचे रूप आणि आकार. ते बदलणार, वेगळे भासणार, तात्पुरते राहणार आणि प्रतिक्रियात्मक राहणार. त्यात आपण का आणि किती गुंतवून घ्यावे स्वतःला?! हा प्रश्न आहे. तो प्रश्न योग्यच आहे.

त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध म्हणजे नामस्मरण. 

हरि ओम.


श्री 

आपण चक्रासारखे गोष्टी आत ते बाहेर ते आत घडवत असतो. त्याचे आकलन होणे महत्वाचे. म्हणजे "मी" हा भाव रेषेसारखा न राहता, चक्र सारखा जाणवायला हवा. म्हणजे गोष्टी येत राहणार, वावरणार, बदलणार आणि निघून जाणार आणि ते संबंधितही असणार - ह्याचे आकलन होणे महत्वाचे. आज मी इथे आहे , तो काही पहिल्यांदा नाही आलो. आज, हा क्षण देखील परत, परत येतो. माझ्या भोवतालच्या व्यक्तींशी संबंध काही पहिल्यांदा असे रूप नाही घेत, ते संबंध युगानुयुगे चालून आलेले आहेत. दृश्य आकार बदलेल, पण आतील संबंधांचे रूप तसेच असते. 

हे जाणवणे आले. तसे झाले, की आपण काय करायला आलो आहे, काय करायला हवे आणि कार्य कसे करायला हवे, ह्या बद्दल विचार करू शकू. त्या गूढ प्रवासासाठी नामस्मरणात सतत राहणे. 

हरि ओम.

श्री

श्री 

विचारात काही गोष्टींचा वावर होत असतो...

विषय धरणे आणि तो बुद्धीने किंव्हा भावनेने सोडवता येईल असे समजणे. म्हणजे अर्धवट, तात्पुरतेपण घालवण्याचे आटापिटा करणे. म्हणजे भाव बुद्धीने घालवण्याचा प्रयत्न करणे. त्यात आपण प्रपंचात गुंतून राहतो...

परिस्थिती सतत बदलत राहणे, हे बघणे, चिंतन करणे आणि स्वीकारणे. म्हणजे परिस्थितीचा अर्थ लवचिक असणे आणि मोडून काढू शकणे हे ओळखणे. म्हणजे परिस्थितीचा योग्य अर्थ जाणवला, तर शांती प्रकट होणे....परिस्थितीशी त्याचा बौद्धिक संबंध नसतो. आपण तसा ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्रास होतो. 

अनुभवाचे रसायन, निर्मिती, प्रभाव, कार्य ओळखणे आणि नवीन, नवीन अनुभव मांडू पाहणे. त्यातून कोण सिद्ध होते, ह्याचा विचार न करणे. अनुभव आहे, त्याला स्वीकारणे, त्याला बघणे, आणि तो फक्त व्यक्त करणे. व्यक्त करण्याच्या तऱ्हा अनेक - शांती पासून ते बोलून ते कार्य करून. आपल्या आतील सर्व प्रकाराचे कार्य निरहेतू पद्धतीने पूर्ण स्वीकारणे आणि हे शक्तीचे कार्य आहे, हे स्वीकारणे. त्यात कुणाचाही व्ययक्तिक फायदा नसतो, ही संकल्पनाही नसते. जे आहे, ते आहे. 

हरि ओम.

Friday, July 25, 2025

श्री

 श्री 


अस्तित्व आपल्याला कळत नाही पूर्णपणे, म्हणून एखाद्या स्थितीचे कार्य आपण अनुभवतो आणि त्या प्रमाणे भावना प्रकट होतात. ही आपली वस्तुस्थिती आहे. 

ह्या वस्तुस्थितीत पहिले काय आणि नंतर काय आणि संबंध कसे, ह्यावर डोकेफोड करून विशेष उपयोग नाही, कारण ह्या चिकित्सक वृत्तीतून शरण जाणे होत नाही किंव्हा श्रद्धा निर्माण होणे अवघड. तरीही ह्या वृत्तीत वावरत राहताना, सर्व शांत कसे करावे ह्याचा अभ्यास निश्चित करावा. आणि तो अभ्यास आपण मानव जीव करू शकतो. म्हणून ते करावे. 

आपण खूप वेळा उतावळे होतो, त्रासिक होतो, दुःख सोसतो, सुखही अनुभवतो, चिंतेत राहतो, काळजी करतो. हे सारे भावना कुठून येतात आणि का? 

पहिले तर इथे सरळ रेषा सारखे काहीच नसेल. म्हणजे स्पष्ट तर्काप्रमाणे असेलच असे नाही. अनुभवातून,  त्याला स्वीकारून, त्याला बघून गोष्टी शांत होतात - एकमेकात स्पर्धा घेऊन नाही. म्हणून प्रवाह, बदल, आत - बाहेर, परिवर्तन, चक्र, जाणीव ह्या संकल्पना किंव्हा क्रिया स्वीकारायला लागतात. त्यातून शांती प्रकट व्हायला लागते. हे भगवंताचे कार्य आहे. 

हरि ओम.

Shree

 Shree

What thoughts happen inside? I can say as far as what I have felt for myself –

Seeing things generally through feelings. Everything guides by feelings from idea to process to execution to perception. And feelings can connect. I am concerned about how connection can happen or should happen, so empathy is felt. However it is not the primary goal of everyone, so the content of discussion can go in any direction. Questions that get raised in my mind are – am I responsible to make everyone see that feelings are important? Should I be doing it? Should I therefore see that time is sufficient for importance of feelings to get shared? Should I tie or break down feelings into bits of information or methods or sequences? Does it really matter that I should agree to other points of vies that have little to do with feelings? Evenif I don’t agree, does that suggest anything as truth?

Hearing out other people’s points of views may keep triggering urgency to state a position or a point or proving something or silencing the other - I think NONE of this is required. Just hear people out in a non judgmental way. Ways won’t align, but that is all ok I think. Noone is here to prove anything, neither are you.

Some people may continue to keep talking apart from the main action oriented point. Those would contain issues of expression, appeal, feelings, experiences, methods, urgency of things, desperation and so on. That means time for all things to be led bear should be accepted and given. It would silence the noise and the main point will be brought to focus.

Hari Om. 

Wednesday, July 23, 2025

श्री

 श्री 


घडामोडींचे *अर्थ* (निर्मिती शक्ती, उगम, प्रकट क्रिया, संबंध) भगवंत आहे. म्हणून घाबरण्याचे कारण नाही. कारण तसे पाहिले तर कशालाही लागत नसते! आपण कारण गोष्टीना चिकटवतो, म्हणून त्यात आपण गुंतून राहतो! म्हणजे त्या अर्थाने "कारण" ही संकल्पना स्वार्थी, मर्यादित, तात्पुरती झाली. 

आपल्याला गोष्टींचे अर्थ आणि संबंध खूप प्रकारे कळतात आणि हे एकसारखे असतातच असे नाही (आणि ते पाहिजेतही असेही नाही!). कोडी सर्व माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या समयी सुटतील. म्हणून बुद्धीने कोडी सुटली म्हणून शांती लाभेल असे नाही. सर्वांगीण जेव्हा आपला भाव शांत होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने कुठलीच कोडी राहत नाही. 

तसंच बुद्धीने सांगणे, श्रद्धेने करणे आणि कृतीतून जाणवणे आणि भावनेतून उमगत जाणे, ह्या "वेगळ्या गोष्टी वाटतात किंवा भासतात", पण त्यांना त्यांचे त्यांचे कार्य करू देणे. कधीतरी वेगळ्या पद्धती एकच ठिकाणी किंव्हा एकच निष्कर्षाला येत आहेत, हे जाणवेल.  म्हणून गोष्टींची भूमिका, आपला संबंध हा खूप स्तरातून प्रकट होतो. तो तसा होऊ द्यावा. आपण शांत रहावे. त्यातून सर्व एकच असते, हे जाणवेल. 

हरि ओम.

Shree

 Shree

There is a tendency of the mind to keep making connections and bring some form into the phenomenon. We may even refer phenomenon as the mind itself and the Truth is something from which all phenomena appear and go.

I can get entangled or engaged with any idea or a concept or an activity or an imagination – as a loop. I have a feeling that people generally only tend to vent off steam into words or actions and they do not question how that happens or why that happens. So much “locked” they are to this effect that to relook at this phenomenon of outward pull or the force may not be possible for them. They seem to be oblivious to this entire undertaking of questioning the self. The questions are “not there” in their consciousness. There are other questions by which they act.

Therefore, perhaps we can say that the form of action or engagement or form of existence depends on the quality of the question. I have this question of existence and what that means, so that creates patterns of dilemma, doubt, criticalness, exploration, sensitivity, relevance, authenticity, historicity, patterns, flows, continuity. Those play in my consciousness. I am not saying I love these effects, (sometimes these questions feel too much taxing) I am just saying those get replayed in my mind and those create subsequent connections and vibrations. Subsequently the introversion aspect, less talk, appearing serious perhaps, unending responsibilities, preference to stay quiet, preference to be organized, unsettled inner feel and so on.

Even if this is said or expressed, the feel doesn’t seem to go away and some people think that all that is being said makes no sense to them and appears complicated. So my problem remains as it is!

I have come to a stage where I am required to accept the loop as it is and not consider it as a problem to be fixed. The engagement will continue as a matter of a Divine Idea and I don’t know if something is required to be achieved as a mile stone or it is to be peacefully observed for what it is.

Hari Om. 

श्री

 श्री 


सर्व येऊ द्यावे. एकात एक गोष्टी होत असतात आणि तो प्रवाह अनंत असतो. बदल, ही नैसर्गिक अस्तित्वाची बाब आहे आणि त्यातून होत राहणारे परिणाम, संबंध, स्मरण. म्हणून भगवंताच्या गूढ कार्यावर श्रद्धा प्रज्वलित ठेवायला लागते, कारण तेच सत्य आहे. पुढे काय होईल, कुठलं रूप आणि आकार अनुभवात येईल, कसे संबंध असतील हे कोण जाणे?! आज मी कितीही खबरदारी घेतली, त्यातून संबंध होण्याचे थांबत नाही आणि त्यातून कुठलेतरी संबंध आपण स्वतःवर ओढून घेत राहतो. म्हणजे "मी" हे शक्तीचे एक _रूप_ आहे. रूप म्हणाल, तर एक प्रकारच कार्य आहे, कृती आहे, जाणीव आहे, परिणाम आहे, संबंध आहे, स्थिती आहे. ते रूप कार्य करत राहत. ते होत राहणार. त्यातून काही व्ययक्तिक मतितार्थ असतो का? 

प्रपंच म्हणाल, तर अस्तित्व शक्तीची एक छोटी आवृत्ती आहे. अस्तित्व शक्तित जे काही आहे, त्याचे सर्व गुण छोट्या चौकटीत आपल्या प्रपंचात वावरत असतात. अर्थात अखंडित शक्तीला चौकट निर्माण करणे किंव्हा होणे, ह्याचाच अर्थ विश्व भासणे. अजून मर्यादित चौकट केली, की अहं वृत्ती उदयास येते. अजून मर्यादित केली की आपले विचार सतत देहावरच केंद्रित राहतात. मर्यादे मध्ये संबंधांचे क्षेत्रफळ, वेग, गुंता, बदल, स्मरणाची व्याख्या हे सर्व घडत किंव्हा प्रकट होत राहत. 

ह्याचाच अर्थ असा की मर्यादा वाढवणे आले, किंव्हा त्याच्या पलीकडे होणे आले. म्हणजे जाणीव सूक्ष्म होणे, विशाल होणे, शांत होणे.

निर्गुण जरी सत्य अस्तित्व असलं , तरी मार्ग प्रपंचातून, मर्यादेतून, वृत्तीतून शोधायला लागतो. ते शोधणे सर्वांगीण कार्यातून असते. म्हणजे त्यात जीवाच्या सर्व प्रकारच्या जाणिवांचा उपयोग करायला लागतो, फक्त बुद्धी नाही. हे होण्यासाठी नामस्मरण करत राहणे असे संतांचे सांगणे आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


नाम घ्यावे. त्याने योग्य तो परिणाम होणार, कारण अस्तित्वात वावरणे, म्हणजे कार्य असणे/ होणे. कार्य हे प्रकरण सूक्ष्म स्थिती पासून ते स्थूल स्थिती पर्यंत प्रकट होते आणि खूप काही चक्र, भावना, विचार, संबंध, परिणाम घडवते. नुसतं पडून राहणे कुणाला जमलं आहे?! नुसतं बसून राहून सुद्धा जर पूर्ण शांती लाभत असेल, तर तो खरा भाग्यवान! मनाची वळवळ शांत कशी होऊ द्यावी, हे बघावे. 

सध्या परिस्थितीत असे काही घडामोडी होत असतात, जवळच्या लोकांचे हाल बघताना, प्रेमळ माणसांचे यातना बघताना, नात्यातले लोकांचे होडीस्फीडिस ऐकून घेताना, खूप शाब्दिक टोचणे ऐकून घेताना, इतरांचे आगाऊ वर्तन झेलताना, कामात खूप बदल सोसताना....काय करणार असतो आपण ह्या साऱ्या गोष्टींचे? आहे का उत्तर कोडी सोडवण्यासाठीचे?!

तर बौद्धिक पद्धतीने नाही. बरं कोडी निर्माण कोण करतं?! मीच. ते का होतात? आपणं माणूस आहोत म्हणून. तर संबंध, परिणाम, त्रागा, सुख - दुःख, प्रश्न असणारच. मला एक कळलं आहे, की वरील सर्व क्रिया किंव्हा कठीण विचारांना दुर्लक्ष करू नये. ते येऊ द्यावे. ते एक दिवस मावळतीलही. दुःख, त्रास हे सूक्ष्मातून दर्शन देते, तर ते प्रकट होऊ पाहतात आपल्या मनोरचने प्रमाणे. ते व्ययक्तिक जरी खूप वाटले, तरी ते येऊ द्यावे आणि सोडून द्यावे. ते सोडूनच आपण स्थिर होतो. म्हणजे ते पकडून ठेवण्याची गरज नाही. त्याने काहीही निष्पन्न होत नाही. सोडावे कसे, हेच खरे शिकवण आहे. आणि त्यातून स्थिर होणे.

हरि ओम.

Monday, July 21, 2025

श्री

श्री 

गुळ ठेवला अस्तित्वात, की मुंगळ्या लागल्या. म्हणजे कुठलेही कार्य केले, की त्याचे परिणाम ते होणार. किंबहुना कार्य हे परिणाम होण्यासाठीच असते अस्तित्वात. 

हेतू आणला मनात, की कार्य होणार, त्याचे परिणाम असणार, संबंध निर्माण होणार. 

नामाची आठवण केली, की त्या प्रमाणे कार्य होईल, परिवर्तन होईल, दर्शन घडेल, शांती लाभेल. नामाचा नेम धरणे महत्वाचे आहे. ह्याचा उल्लेख हरि पाठ मध्ये केला आहे. शक्तीचे कार्य आणि जागे होणे, ह्या दोन्ही गोष्टी नाम घेऊन साधल्या जातात. 

आपला मार्ग कार्य करण्याचा आहे आणि त्यातून भगवंताकडे जाण्याचा आहे. कार्य करण्यास टाळू नये.

हरि ओम.

Saturday, July 19, 2025

श्री

 श्री 


एखादी व्यक्ती खूप आजारी असली, की तिच्याशी काय आणि कसे बोलावे, हा मला पडलेला एक अवघड प्रश्न आहे. कारण, कुठेतरी माहीत असते की आपण कितीही केलं, काहीही केलं तरी त्याचा शेवट, जे अटळ आहे, ते होणार आहे...काही व्यक्तींशी आपले संबंध खूप खोलवर, सूक्ष्मातून जाणवलेले असतात, म्हणून अशा व्यक्तींचे हाल आपल्याला बघवत नाही. त्यातून मार्ग कसा काढावा असा काहीसा प्रश्न डोक्यात रुजू होतो. मग आपण ती वेदना टाळण्याचा प्रयत्न करतो... कामात झोकून देतो, कमीत कमी त्याच व्यक्तीशी बोलतो, कारण प्रत्येक शब्द, नजर ही आघात केल्यासारखी वाटते. 

२ वर्ष असे करून, मग विचार आला की ह्याने साध्य काय होणार आहे मला आणि त्या व्यक्तीला? मी तर खूप कष्टी होणार, खंत निर्माण होणार आणि आणखीनच बोचरे भावना निर्माण होणार. त्यातून सोलून निघाल्यावर असा काहीसा मतितार्थ निघायला लागला की आपण शांत व्हावे. त्या व्यक्तीला जसे जमेल तसे वेळ द्यावे, विचारपूस करावे, मोकळे मनाने बोलावे, आठवणी सांगावे. जे होणार आहे, ते होतच राहणार आहे. ह्या घडामोडींना कुणीच जबाबदार नसतं. सगळ्या गोष्टीना माफ करावे, स्वतःला सुद्धा (जे अवघड असते). आपण माणूस आहोत ह्याचे भान ठेवून, मर्यादा असायचेच, तरीही शांत रहावे. 

सध्या माझ्या जीवनात असे ३ सर्वात जवळचे व्यक्ती आहेत, ज्यांचा माझ्या मनावर प्रभाव जबरदस्त होतो. खूप दुःख होऊन सुद्धा, मनात राग न आणता, प्रेम करत राहणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, अत्यंत अवघड...की ते कुणाला सांगताही येत नाही, ते जे काही ओझ असतं, ते आपल्याला नेऊ जायला लागतं. हे कोड बुद्धीने सोडवता येत नाही. 

त्यासाठी वेगळीच क्रिया लागते. कदाचित त्याचे उत्तरे अध्यात्म मध्ये असावेत... उत्तरं लगेच मिळत नसतात. ते सैय्यम वाढवून कळायला लागतात. आणि ही आहे माझी अग्नी परीक्षा.

हरि ओम.

Shree

 Shree 


Confusion (which may include apathy, anger, doubt, pain, stress, anxiety) doesn't mean that a perceived problem requires immediate solution and one's worth is not determined by solution solving of confused tendencies of the self or the other. The question may be perceived intellectually. But can it even transcend an intellectual pattern of thoughts? And if that is a possibility, what can be it's effects? In other words, there is a possibility of pure action without meager intent and pure existence beyond space - time impacts. 

देव अस्तित्वाच्या स्थितींची काळजी घेतो, कारण हे त्याचेच कार्य आहे. म्हणून स्वतःला दोष देऊ नये, त्रास करून घेऊ नये, चिंतेत राहू नये, खूप चिकित्सा करू नये. देवाला सगळ्याचे पूर्ण अर्थ माहित आहे, म्हणून आपल्या समोर जे काही मांडले जाते, ते दर्शन, ह्या भावाने स्वीकारावे. प्रतिक्रियांची आवश्यकता असावी का?...

हरि ओम.

Shree

 Shree 


We are also evolved into a present form through many subtle forces and exchanges that have happened in them and continue to evolve again based on engagement with forces. This means anything has links, connections, changing patterns and transformative actions. Those create _perceptions_ of existence or a kind of a feel/ memory/ awareness/ experience. Therefore there is a place for transformations, which can't be explained or justified or mapped or stated or represented. It is a mysterious action.

In all of the above things, perception can either create a visual form of existence or it can become visually non detectable (or beyond visual). That is, when we "see" a visual thing, we are engaged with a state of existence in a particular way - temporary, change, separations, control, limitations, compartments, maximization, productivity and so on. The visual is therefore not the truth and is a figment of completeness. 

The change, perception, memory and search happens because of certain tendencies of the mind - force. This is difficult for people to detect and understand what's happening. So they snap. 

Expanding the mind, making it subtle suggests a non visual perception or memory of Being. 

Visual and non visual are opposing characters of existence. To become non visual, one will need to give up everything that creates visual forms. 

Hari Om.

Thursday, July 17, 2025

श्री

श्री 


संबंधांचे स्वरूप _गूढ पद्धतीने निर्माण_ होत राहते. अस्तित्व तसे कार्य करणार. आपण कसे होतो आणि आपल्या वाट्याला कुठले संबंध कशा पद्धतीने सामोरे येतात, ह्याची चिंता करू नये. संबंधांचे मूळ भगवंताच्या इच्छे मध्ये आहे, होण्या मध्ये आहे, असण्या मध्ये आहे...त्यात काही क्रियेतून "मी" हा भाव होतो आणि त्यातून चिंता आणि गुंतून राहणे. माझे होणे आणि जाणीव खूप गूढ क्रियेतून आलेली आहे, म्हणून सर्व काही भगवंत ठरवतो. 

दररोजच्या जीवनात त्याचा अर्थ काय, ही शोध मोहीम झाली. त्याला आपण शांतीचा शोध (शांतीच्या अस्तित्वाची जाणीव), असे म्हणू शकतो. परिस्थिती कशीही जरी असली, तरी शांती असतेच. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत वावरून सुद्धा, शांती मनात संक्रांत होऊ शकते. आणि ते होणे म्हणजे संबंधांचे स्वरूप आपुलकीचे होणे. आकार महत्त्वाचा नाही, त्याच्याशी संबंध कसा होतो, ते महत्त्वाचं आहे. संबंध जसा शुद्ध होतो, निरहेतू होतो, तसा आकाराशी असलेलं नातं किंव्हा भाव शांत होतो, निरपेक्षित होतो, स्वस्थ चित्त होतो. मुळात आपल्या स्वतःशी असलेला संबंध शांत होतो. 

हरि ओम.

Wednesday, July 16, 2025

श्री

 श्री 


संबंध सर्वांशी, सर्व हालचालींशी, सर्व रुपांशी, सर्व आकारांशी, सर्व स्थितींशी, *सर्व शक्तींशी* येणारच. तो अस्तित्वाचा गुण धर्म आहे. 

आपण कृतीत आपले प्रयत्न करत राहायला हरकत नाही. त्यात सत्याचे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्यात प्रत्येक घटक कृती करण्याच्या मागे आहे आणि शोधाच्याही आणि संबंध जोडण्याच्याही. हे सर्व स्वतःच्या जाणिवेतून (शक्तीतून) प्रकट होते. एकंदरीत कृती, संबंध आणि शोध हे एकात एक संबंधित असते. म्हणून त्या पद्धतीने सर्व भावनांचा ऊहापोह अनुभवात येत राहतो. 

शुद्ध होणे ह्या वरील सर्व हालचालींचे उद्देश आहे, कारण कृती काय, संबंध काय किंव्हा शोध काय - सर्व गुढत्व दर्शवते - त्याला तात्पुरतेपणातून आलेला आपला स्वार्थी हेतू संबंधित आणू नये. स्वार्थीपणा, बहिर्मुकपणा, देहपण हे सर्व भाव शांत होऊ द्यावे लागतात. आपण प्रमाण (जाणिवेची स्थिती) कशाला मानतो, ह्यावर सर्व ठरतं. प्रमाण देह, प्राण, वासना किंव्हा आत्मा ह्यातील काहीही होऊ शकतं. अर्थात देह सर्वात स्थूल आणि तात्पुरता, तर आत्मा सर्वात विशाल, स्थिर आणि सूक्ष्म असतो. 

दृश्याचा निर्हेतु सूक्ष्म स्वभाव किंव्हा संबंध जाणवण्यासाठी आपण स्वतः शुद्ध होणे गरजेचे आहे. लोकांच्या व्यवहाराचे कारण किंव्हा त्या हालचालींचे अस्तित्व आणि उद्देश आपल्या पूर्ण कळत नाही, म्हणून त्याने कष्टी होण्याची गरज नसते. सर्व भगवंताची इच्छा आहे, असे स्वीकारून, योग्य कार्य करत राहावे आणि आनंदी रहावे.

देह ते आत्मा जाणवण्याचा प्रवास म्हणजे नामस्मरण करत राहण्याचा. 

हरि ओम

Thursday, July 10, 2025

श्री

 श्री 


विचार, ही क्रिया आणि कार्य,  कशी उद्भवते, हे गूढ प्रकरण आहे. जेवढं आपण स्वच्छ मनाने "विचारांचा" स्वीकार करू, तेवढं आपलं जगणं शांतीने होऊ शकत. 

विचार, त्याच्या बरोबर, खूप घटक घेऊन येतात...जसे की साखळी, संबंध, बदल, रूप, क्रिया, आकार, भाव, स्मरण, संवादाचे स्वरूप, संकल्पना कुठल्याही गोष्टीची, प्रतिक्रिया वगैरे. 

जसा सूर्य अस्तित्वात असतो आणि त्यातून अनेक गोष्टी घडतात, त्या प्रमाणे विचारांकडे बघावे. सूर्य का असतो, असा कुतूहल म्हणून प्रश्न विचारावा. तसंच विचारांच्या आस्तित्व, ह्या बद्दल कुतूहल बाळगावे. अस्तित्व ही विलक्षण क्रिया आहे, आणि ते निरहेतू पद्धतीने त्याकडे जाणून घ्यायला लागते. _असण्याला_ हेतू नाही. हेतू म्हणलं तर स्थळ आणि काळाची परिभाषा त्यावर उमटली केली गेली.  निरहेतू म्हणजे त्या पलीकडे...

हरि ओम

Shree

 Shree

Thought is seen as a measure of establishing proof based on all internal patterns of birth of a thought, its journey and its change. Doubt is a kind of a thought that questions its belief of determinism. So, it will go on to decode itself and see all the sequences and any gaps if exist and then the assumptions one makes in those gaps. It is annoying at times to entertain a doubt because it lays an inquiry into everything and doesn’t seem to trust anything at all! Trust is not an absence of doubt and doubt also, is not a complete absence of trust. No thought can exist in a vacuum, so its generation is dependent on many processes of becoming. These processes exist because of Divine Will or Divine Presence of becoming something. So, doubt would have its place just as trust has.

In philosophical terms, trust means to outgrow all notions of thought and realize what is beyond those notions, so one doesn’t get carried away by adhering to any notion. Trust is being steady in existence.

Therefore there is a Divine reason why things happen to me and why certain things get created or attracted and why certain things do not seem to take place in obvious forms. This situation doesn’t suggest anything about me or a thought. Thought happens, just as anything else happens in the world of phenomena. Any sort of thought should not be taken personally or should be reacted to or should not be defended or accused or should not be measured to judge a person.

Hari Om. 

Shree

 Shree 


Space or form is perceived differently by a designer. The principles of philosophy or transcendence, continuity, change, connections, relations, criticalness, resemblance, reuse are engaged in a different way by the architect. And this is very natural. 

This means realization of feelings, qualities of space would happen in a different way for the architect. He/she need not justify this realisation by intellect alone. Both players - academicians and designers need to understand this. 

Secondly creation does not always take the support of theory or a method or intellectual concept. The start point of design and exploration can take on any path. The word that should be used is _inspiration_. 

Thirdly all issues of existence that intellect can verbalise aren't required to be dealt with by Architecture. It is not the burden of architecture to solve problems of the world/ existence and state the solutions in an explicit manner. 

All above things simply mean that a form can turn out to be anything, as long as it is honest, sincere in its intent and can acknowledge connections with the context of life. This also means form may resemble any other previous form, but only as as a coincidence (and not as a deliberate attempt). Architectural historians, at times, judge a form by its appearance but it is quite a shallow understanding of the intent of discovering it. Also historians look at form generation as a linear process and any talk of 'style' again, is similar to only scratching the surface of the idea of space. 

Therefore, we may look at critical histories of architecture. But studio exercises, encounters, engagements, practice, writing are equal or profound contributors to experience the making of the form which becomes malleable, adaptable, interpretative, exploratory and so on.

Hari Om

Shree

 Shree

Virtual experience and real time experience. Nearness to virtual environment, so real time environment starts to loose meaning. Meaning then should be seen as a loaded word of pace, change, connections, learning, exploration, struggle and so on.

This means that if engagement with virtual space increases there is a different perception and definition of closeness, farness, etc that gets developed. Also the idea of commitment, work, stability, initiation, expectations and so on. Hence people involved in virtual environment think or feel in a different way if they engage with experiences formed in real space-time fabric. The two languages appear to be different. Even as an idea of imagination or being defined by imagination, things would change.

But this could also generate an inquiry of control, connections, change, memory and awareness. How does one use memory as a source of relating to the environment or as a function of existence? This is the core question. Memory or awareness is fundamental; its language of expression only seems to change. Also, regardless of whatever language, the awareness of feelings and connections for all is also fundamental to all modes of expressions – which is what should be aimed for.

More truthful fact is that regardless of anything, things come into some form, they get connected or related to and they would go one day – this sense of change or perception is the Existence Force, something one ought to accept sooner or later. Why should a thought appear in a particular way, need not led to botheration and need not be seen with a purpose to get fixed by anything else.

No matter how much intuitive and subtle one’s awareness becomes, one still will experience some form of change and for which, one has to keep on pardoning oneself and feel quite.

Hari Om

श्री

 श्री 


स्पष्टीकरण विचारांचे देवाला सांगायला लागते, दुसऱ्या वेगळ्या किंव्हा तात्पुरत्या आकारांसाठी नाही. म्हणजे देवाला सांगताना आपण हेतू ठेवत नाही, म्हणून त्याला सर्व अर्पण करावे, आपली बुद्धी सुद्धा. म्हणजे बुद्धी वापरण्यासाठी स्वार्थी हेतू असू नये. 

जसे सर्व शक्ती त्यांचे त्यांचे कार्य करतात, तसे आपल्या शक्तीने त्याचे कार्य करावे. कार्य भगवंताची शक्ती _प्रकट_ करते, जिच्यामुळे सर्व रूप आणि आकार येतात, त्याचे त्याचे व्यवहार करतात आणि विलीन किंवा अदृश्य होतात आणि परत हे चक्र चालू राहत. कार्य, ह्या भावाला, आपण अस्तित्व भावही म्हणू शकतो. म्हणजे अस्तित्व असल्यामुळे, कार्य, हे त्या शक्तीचे गुण असणारच. To become, then, is to be realised as a _property or a pattern or inherent action or tendency_ of Existence. It continues to take _any form_ without losing any of Its own fundamental quality of being. 

हरि ओम

Tuesday, July 08, 2025

श्री

 श्री 


सत्य स्मरण, शक्ती आणि मी, ह्या जाणिवे मध्ये फरक राहत नाही. 

सध्या स्मरण मनाशी निगडित आहे - म्हणजे ते एक क्रियेने निर्माण होत राहते, जी वासनेतून ते प्राण चक्र ते आकार चक्र ते परत आतील वासना, अशी सतत प्रज्वलित राहते. त्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे द्वैतमय जग आणि वेगळेपण, तात्पुरतेपण आणि त्यातून निर्माण होत राहणाऱ्या असंख्य भावना. हे सध्याचे स्पंदन आणि त्यातून होणारे संबंधांचे जाळ. 

वेगळेपण खूप सूक्ष्म स्थितून आकारास येते म्हणून सर्व काही विघटित, वेगळे, प्रतिक्रियात्मक उद्भवत राहते. शांत होणे म्हणजे ही क्रिया मंदावणे आणि सर्व काही एकच आहे, अशी प्रचिती होणे.  

अभ्यास जो आहे, तो ह्याचा आहे आपल्याला. दुसऱ्यांचा हेतू नेमकं काय असतो, ह्याचा विचार मनात असू नये. हेतू आपण मनोरचनाशी निगडित ठरवतो. म्हणून तो अस्थिर राहतो. भोग किंव्हा वस्तूवर किंव्हा प्रारब्धावर हेतू स्थित करणे, म्हणजे त्रासाला आमंत्रण देत राहणे. 

म्हणून आपण स्थिर कसे होऊ शकू हे ओळखावे. स्थिर होण्यामध्ये "मी" हा भाव राहत नाही, हे ही ध्यानात ठेवावे. म्हणजे परिस्थितीवर "मी" ही व्याख्या अवलंबून ठेवत नाही आपण. म्हणजे सत्य भाव आणि परिस्थिती मध्ये _अंतर_ असते. ते अंतर कमी करत रहाण्याचे रसायन आहे नामस्मरण. 

हरि ओम.

Sunday, July 06, 2025

श्री

 श्री 


आजकाल शांतीचे रसायन असे असू शकते की "मी" ची व्याख्या सामूहिक किंव्हा पर्यावरणीय विचारात अधिक मिसळावी, इतक की माझं असं काही वैयक्तिक किंव्हा देहाशी संबंधित विशेष काही राहत नाही. 

शैक्षणिक जागेत असे करणे योग्य ठरेल असे वाटते. मुल इतक्या बदलणाऱ्या माध्यमातून शिकत असतात, की नेमकं माझ्यातून ते काय घेतात, ह्या चिंतेत राहण्यापेक्षा, शिकण्याच्या प्रवाहात त्यांना माझे काहीतरी टिंब भर योगदान होत असावे, अशी श्रद्धा ठेवावी. 

Dnyan ही स्थळ किंव्हा काळाशी मर्यादित नसते, म्हणून कुठल्याही एका परिस्थितीतून, बिंदूतून, व्यक्तितून, क्रियेतून, रूपातून, संकल्पनेतून पूर्ण dnyan होणे अशक्य...त्याला प्रवाह मानावे. किंव्हा कुठल्याही घटकेला "निमित्त" मानावे, म्हणजे व्ययक्तिक संकल्पना जरा विलीन होण्यास मदत होते. 

ह्याच्या पुढे जाऊन असे म्हणायला हरकत नाही की कुठलाही एक बिंदू ओढून पूर्ण dnyanechya वाटे आपण जाऊ शकतो. म्हणजे संकल्पना, साखळी, शिकवण्याची पद्धत, काहीही निवडा शिकवण्यात. त्यातील मूळ गाभा, जे अस्तित्व आहे, त्याला अनुसरून शिकवा. सत्याचे स्मरण लागते फक्त. ते कसे शिकवण्यात आणावे, ह्याचे उत्तर सरळ, बौद्धिक नाही. स्मरण ही गूढ क्रिया आहे. ती गुढपणे साखळी निर्माण करून क्रिया आणते. म्हणून स्मरण, ह्याला सर्वोत्तम भर द्यायला हरकत नाही. स्मरण स्पष्टपणे दाखवायलाच हवे, *असे काहीही नाही आणि त्याची गरजही नाही*. स्मरण त्याचे त्याचे कार्य करते. ते कसे, ह्याचीही चिंता असू नये.  म्हणजे हे ओळखायला हवे की स्मरण व्यक्तिक कल्पना अजिबात नाही, म्हणजे तिला मर्यादा नाही. ती कायम असते आणि त्यातून प्रतिभा शक्ती आपण प्रकट करत राहतो.

हरि ओम.

श्री

 श्री 


कुठल्यातरी विषयाला धरून राहणे, हे गूढ प्रकरण आहे. त्याला कुणी काहीच करू शकत नाही. धरणे आणि प्रकट होणे, ह्याचे बीज अस्तित्व शक्तित आहे,  म्हणून ते असणार अनुभवात. म्हणजे दृश्याचा अनुभव त्या कारणामुळे प्रकट होत असावा. धरण्याला आपण क्रिया मानुया आणि त्यामुळे स्मरण होते. त्या क्रियेत खूप काही घटक, स्तर, साखळी, असायचे ज्यामुळे संबंधांचे भाव, रूप आणि आकारांचे दर्शन होऊ पाहते. 

दर्शन होण्यास हेतू नाही. तो प्रवाह ओळखावा आणि येत जाणे आणि निघून जाणे त्या *दर्शनाचा भाव मानावा.* म्हणजे आले तर आले, गेले तेव्हा गेले - ह्यावर व्ययक्तिक म्हणणे काही मांडू नये. एकंदरीत क्रियेचे स्थान व्ययक्तिक नसतंच, तर ते मनाला का लावून घ्यावे?

तरीही हा प्रश्न प्रज्वलित ठेवणे आले. भगवंत असतोच आणि त्याचे कार्य सदैव चालू असतेच. आपण वावरत रहावे आणि त्याचे स्मरण ठेवत रहावे. हे दोन्ही गोष्टी कसे जुळून येतील, ह्याची चिंता करू नये. 

काहीही जरी अनुभवात वाटले, तरी ते दर्शन आहे, हे ध्यानात रहावे, म्हणजे आपण कशालाही घट्ट धरून ठेवत नाही.

हरि ओम.

श्री

 श्री 


सिद्ध होणे, हा अट्टाहास सोडावा. हा प्रवास आहे. रुपात, विषयात संबंधित आल्यामुळे कुठेतरी, सूक्ष्म पातळीपासून सिद्ध होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मूळ इच्छा भगवंताची आहे. त्याला सिद्ध होण्यासाठी दृश्य भावाची निर्मिती त्यांनी योजिले आहे. सिद्ध होण्यास अनेक स्तर निर्माण होतात आणि एक, एक पायरी मध्ये तो अवतरून सूक्ष्म पासून ते स्थूल पर्यंत तो दर्शन देतो. 

त्या पायरींचे उल्लेख हरि पाठात dnyanoba माऊली ने केले आहेत. त्या सर्व पायऱ्यांना "७ लोकं" असे म्हणतात. त्यांच्या मनोरचने प्रमाणे आपला सबंध दृश्याशी प्रस्थापित होतो. 

म्हणजे आपला वावरण्याचा विस्तार ७ लोकात असतो. आणि जे दिसून येतं आत्ता, ह्या जगात, त्याच्या पेक्षा अनेक स्थितीत जगाचं अस्तित्व असते. अस्तित्वाला ७ स्तर आहेत, म्हणून आपली स्थूल स्थिती एक स्तर समजावी, ज्याचा एक स्वभाव आहे, परिणाम आहे, क्रिया आहे, संबंध आहे. 

कसे जाणून घ्यावे इतर सूक्ष्म स्तर? 

हरि ओम.



श्री 

परिवर्तन होताना तेच दृश्य वेगळ्या रूपात प्रत्ययास येते. म्हणजे दृश्य भाव कल्पना आहे, जी बदलू शकते स्वतःच्या मनोरचने प्रमाणे. म्हणजे सर्व दृश्य एका दर्शनाची स्थिती आहे, जी आपल्या मनात चालू आहे - जसे आपण स्वप्नात वावरतो, त्या प्रमाणे! 

त्या प्रकट होत राहण्याचे क्रियेचे _स्थान_ असतेच. त्याचे दर्शन सतत आपल्याला द्यावे लागते. गोष्टी येणार, वावरणार, निघून जाणार आणि हा प्रवाह आपल्या अनुभवात राहणार. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की हालचाली, गती, बदल, संबंध, ह्या कल्पनेत आपण राहणारच आहोत. ते कोड नाही, की जे सुटायला हवे, की त्यापेक्षाशी काहीतरी जागा असावी, की हा प्रकार तिथे घडणारच नाही! 

मूळ प्रकार आहे, तो म्हणजे _जाणीव शांत होणे._ त्यातून सर्व काही बदलून, रूप बदलून, दर्शन बदलून जे येते, ते म्हणजे एक स्थिर, कायम, शांत माध्यम - भगवंत.

हरि ओम.

श्री

 श्री 


आयुष्याचे गणित आपण मांडत असतो आणि सोडवत बसतो! सत्य होऊ पाहणे गणिताच्या पलीकडे आहे. 

आपले _गणिताची भाषा_ म्हणजे वासना, साखळी, चक्र, विचार, भावना, भाव, दृश्य, परिस्थिती असे आहे. थोडक्यात एकात एक संबंध जोडून एका जीवनाची परिभाषा निर्माण करायची. गणित जरी बौद्धिक देणगी असली, तरी समाधानासाठी गणिताच्या पलीकडे जायला लागते. आपण, अर्थ, संकल्पना, परिणाम हे सर्व घटक गणित म्हणून आपण बघण्याचा अट्टाहास करतो, म्हणून परिणाम भोगतो. The math of life affects us or we choose to let it affect us...

स्थिर होणे, जे संतांचे सांगणे आहे, ते ही गणित म्हणून बघता येत नाही.  त्यासाठी कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे का कदाचित, जो मार्ग सांगितला आहे, तो आहे श्रद्धा वाढवण्याचा. श्रद्धा वाढली की गणिताची जरूरी भासत नाही, त्यावर आपण निर्भर राहत नाही, त्यावर "मी" ही संकल्पना होत नाही. 

हरि ओम.

Friday, July 04, 2025

Shree

Shree 

A thought can say many things. But it doesn't or need not imply that the indication should be acted upon. Action _on a thought_ is by awareness. 

Awareness is larger than any formed/created/ erupted entity. Things get formed because of some state of awareness that implies to become so. And so the engagement begins. 

Whatever is thought or felt as a deliberation, is only a part of the truth. Only a part. We bother ourselves so much about this, that it is not the phenomenon that should cause disturbance within us, as much as how the phenomenon is viewed or related to. 

Relation comes from very deep recesses and from ancient times and other states of existence. This requires acceptance unconditionally. How i become, where I go, what I do, why I do is a subtle undertaking, not so obvious and not so limited or contained. So there are things, there is a Return, there is an Eruption, there is a Change, there is a Continuity and there is Eternity. This is it. Why should we take such a long time to accept?! 

Some questions remain or exist for eternity. Things remain unsettled and that is how they are meant to become. Even though that is the case, it isn't any indication of how things ought to become or that a change is 'expected' or how things need to get 'defined'. A thing is a thing. One should leave matters there and need not question its origin or its flow or its changing nature or its form. A thing is a thing. 

Hari Om

श्री

 श्री 


 _उगम आणि स्पष्टीकरण_ हे दोन्ही गोष्टी घातक आहेत समाधानासाठी. जेव्हा आपले विचार वरील दोन्ही गोष्टींच्या बंधनाच्या पलीकडे होतात, जेव्हा त्या विचारांना सूक्ष्म स्वरूप येतं, तेव्हा समाधानाचा भाव प्रकट होऊ शकतो. 

म्हणजे अस्तित्व, अनुभव, क्रिया, आकाश, विचार आणि भाव हे मिसळलेले प्रकरण आहे. विचार ही संकल्पना आहे जी जाणिवेतून येते आणि ती संकल्पना "मी" हा भाव निर्माण करत राहते. 

म्हणजे मूळ जे आहे अस्तित्व कळायला, ते आहे "जाणीव". जाणीव शक्ती असतेच स्वतः सिद्ध. म्हणून विचार जरी नाही प्रकट झाले, तरी जाणीव असणारच! म्हणजे अस्तीत्व असणारच! निर्विचार स्थिती काय असते, त्यासाठी खूप सूक्ष्म होणे आले. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम

Thursday, July 03, 2025

श्री

श्री 

दृश्य जगात स्वतःची जाणीव वावरत राहताना, त्याचा अभिप्रेत परिणाम म्हणजे "अनुभव" निर्माण होत राहणे. अनुभवाचे घटक अनेक, साखळी अनेक, स्तर अनेक, आणि त्यातून होणारा भाव, संबंध, क्रिया, स्मरण. ह्याला एक प्रकाराची _शक्ती_ म्हणू. 

अस्तित्व ही शक्ती आहे. ती _दृश्य निर्माण_ करत राहणारी शक्ती आहे. अस्तित्व प्रकार काय आहे, ती वस्तू आहे, का बिंदू, की स्मरण, की कार्य, की साखळी, की स्थिती - हे ओळखणे आपले ध्येय आहे,  कारण आपण त्याच शक्तीतून झालो आहोत. मुद्दामून कुणी ओळखत नसावे, त्याने अस्तित्व कळेलच असे काही नाही. प्रयत्न करत राहावे, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा त्या जाणिवेत अस्तित्व भाव प्रकट होईल. ह्याचा दुसरा अर्थ हा की स्थळ आणि काळाची मर्यादा (तर्क, संकल्पना) लावणे उचित नाही हा शुद्ध अनुभव आत्मसात करायला. सुरुवातीला नाही, मध्ये नाही, मार्गात नाही आणि शेवटीही नाही. म्हणजे पूर्ण शुद्ध भाव होण्यासाठी तसंच शुद्ध भावनेने सतत त्या शक्तीचे स्मरण ठेवावे. 

तसे व्हायला सवय करायला लागते. त्याचे तीन टप्पे नामस्मरणाचे संत द्नानोबा ने सुचविले आहेत हरिपाठात: गोडी - जोडी - आवडी.

हरि ओम.

श्री

 श्री 


भीती कुठल्या कुठल्या गोष्टींची असू शकते आणि ती समजून घेतली की काही शांतता लागते?...

सिद्ध होण्यात वेळ कमी पडला तर? वेळेत प्रश्न नाही कळले तर, वेळेत उत्तर नाही दिले तर, वेळ वाया गेला तर, हेतू नसला तर, साखळी नीट जमली नाही तर....ह्याचा मूळ कळला तर वरील क्रियांचे कार्य शांतीने होऊ शकेल...

वेळेत सर्व काही ठासून नाही सांगितलं तर आणि जरी सांगितलं तरी काही राहून गेल तर, आणि जरी काही राहून नाही गेल तर ते सर्व सगळं कळलं नाही तर, परत सांगायला नाही वेळ मिळाला तर....ह्याचा मूळ कळला तर वरील क्रियांचे कार्य शांतीने होऊ शकेल...

गोष्टींचे एकमेकांशी संबंध करायलाच हवे का? नाही कळले तर? कळले तर? हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे. संबंधांचे काहीही घेणे देणे नसले तर? संबंध असायलाच पाहिजे तर? संबंधांचे काही स्थान असते का? ते बौद्धिक असते का? ते जाणिवेतून येते का? संबंधातून मी होतो का? का मी वेगळा आहे?

मनात अनेक वृत्ती येत असतील तर? वृत्ती कधी येतील आणि जातील हे कळले नाही तर? त्यावर ताबा नसेल तर? ते कसे कार्य करते हे कळले नाही तर? सर्व बरोबरच असायला पाहिजे का? मला tevhnology चे काही नाही कळले तर? मी संपर्क करू शकलो नाही तर? 

वरील प्रश्नाचे उत्तर कधी मिळतात? कसे जाणवतात? ह्या जन्मात नाही कळले तर? समाधान होण्यासाठी वरील प्रश्नांचे उत्तर कळणे बंधनकारक आहेत का? 

इंद्रियांचे स्थान असते आणि त्यावरून आपला वावर ठरतो किंव्हा आपण ठरवतो. सूक्ष्म होणे म्हणजे इंद्रियांची गरज न होणे...

हरि ओम.


श्री 

विषयात दंग होण्याची, देहाची, आकुंचित स्मरणाची, इंद्रियांच्या भाषेची, शब्द कळून घेण्याची, काहीतरी खटपट करत राहण्याची, नेहमी योग्य काहीतरी क्रिया करण्याची, नेहमी तैय्यारीत राहण्याची, बिंदूत पूर्णतः अनुभवण्याची, सतत काहीतरी प्रयोजन करण्याची, अपेक्षा करण्याची, साखळी योग्य जोडण्याची, साखळी योग्य होण्याची, कोडी सोडवण्याची, बुद्धी वापरत राहण्याची, मतभेद करण्याची, संबंध जुळवाजुळव करण्याची, सांगण्याची, सर्व काही बोलून टाकण्याची, आतील सूक्ष्म गोष्टींची भाषा मांडण्याची..... *गरज नसते.*

घडामोडींना चालना मी देत नाही. किंबहुना मनाच्या रचनेमुळे दृश्याशी संबंध घडून येतात किंव्हा प्रकट होतात. प्रकट होणे, हे देखील गूढ कार्य आहे - कारण त्या होण्यामध्ये स्मरण होते, भाव होतो, वृत्ती होते त्यात भगवंताची शक्ती आणि माझी प्रक्रिया मिसळलेली जाते. ह्याला _परिस्थिती_ म्हणावे. त्यामुळे आपण धडपड करत राहतो, चक्र निर्माण करतो आणि तसे परिणाम अनुभवतो. चळवळ, हा त्याचा दुसरा शब्द. 

ह्यातून शांती कसे लाभेल ते बघावे. त्यासाठी काय करावे, कसे, कुठे, का, हे ओळखावे. म्हणजे सर्व व्यवहाराचा हेतू स्वतः मध्ये शांती प्रकट होणे आहे. 

माझ्याच वृत्तीचा प्रभाव ढिला व्हायला हवा. जसा तो ढिला होईल, तशी नवीन सूक्ष्म दृष्टी लाभेल आणि दर्शन घडू शकेल. हे सर्वात महत्वाच कार्य आहे.

हरि ओम.

श्री

श्री 

दृश्यात dhyan करणे म्हणजे वस्तू करणे, विषयात गुंतणे किंव्हा पकडण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे विघटन करणे. पण त्याने त्या वस्तूचा वेग वाढतो. वेग म्हणजे बदल आणि परिवर्तन किंव्हा तात्पुरते होण्याची क्रिया. म्हणजे दृश्यात कुठल्याच बिंदूला धरून ठेवता येत नाही, किंव्हा ठेवण्याचा प्रयत्न कष्टाला कारणीभूत करतो. 

म्हणजे अहं वृत्तीचा प्रभाव हे करण्यात दंग असतो, मग त्रास होणार...

ह्याच्या उलट _सैल होणे_ अभिप्रेत आहे. म्हणजे कशावरही धरून राहण्याची गरज नाही. अर्थात हे होणे सोप्पे नसावे. ते होण्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.

Shree

Shree 

Picking and choosing is an illusionary recipe for attaining peace. Situations will always be a mix of things, complimentary, interconnected and "all seeds" present at the same time. Which means that a single moment having some particular qualities is only temporarily appearing so - it may _convert_ itself into any other quality and it may also _lead_ to any other quality.

Therefore a moment has two aspects to it - conversion and change. So what is really being looked at and perceived?! जे दिसते ते अस्थिर त्यामुळे असते आणि आपले मन तसे असल्यामुळे ते गुण भासून येतात. गुण... _property of becoming._ 

हा गुण कुठून उदयास येतो? शक्ती. हालचाली होणे गुणांमुळे, घडामोडी भासणे, येणे, वावरणे, परिवर्तन होणे, जाणे - हे शक्तीचे *कार्य* म्हणायचे. ते होणार. 

त्यात आपला ध्येय हा राहतो, की शक्तीचे कार्य शुद्ध भावनातून ओळखावे आणि त्या जाणिवेत स्थिरता प्राप्त करावी. 

हरि ओम.

श्री

श्री 

जसे वेताळ टेकडीवर "वेताळ बाबा" एक _दगड_ किंव्हा _शिळा_ म्हणून स्थित आहे, तसेच माझे होईल का, असे मनात येते! 

ह्या युगात इतक्या झपाट्याने गोष्टी बदलत असतात की साधा संवाद करायला जर कुणाला फुरसत नसेल किंवा इच्छा, तर मग मूग गिळून गप्प बसल्या शिवाय काही खरे नाही! वेगात काहीतरी माकड चाळे करणे आणि उड्या मारणे आणि जीभ टाळूला लाऊन काहीतरी बडबड करत बसणे, ह्याने कोवळ्या भावना कसे सामोरे येतील आणि ते कसे जाणवतील कुणाला? कसे गूढ रहस्य किंव्हा सूक्ष्म गोष्टींचे आकलन होईल? ते कसे इतर वेगवान विचारांना पटवता येतील? With speed, the nature of awareness changes too. हे लोकांना ध्यानात येत नसावे कदाचित. की हळुवार विचारांचे महत्व काय, हे कळण्यासाठी अगोदर हळुवार होणे गरजेचे आहे!

ह्याचा स्पष्ट अर्थ हा, की एका मर्यादेच्या पलीकडे आपण काही सांगू शकत नाही आणि प्रत्येकाचे प्रश्न स्वतः सोडवायचे असतात! त्यात काही वावग नाही, असे मला वाटते. जर कुणाची श्रद्धा हळू होण्यात असेल, तर तसे होऊ द्यावे. 

वेगाने कुणी हुशार किंव्हा अडाणी ठरत नाही. उलट आणखीन वेगात विचार करण्याची गरज वाटली तर समजून घ्यावे की आपलेच विचार कुठेतरी घोळ घालत आहेत! कारण, आनंदासाठी विचार लागत नाही! ती स्वतः सिद्ध भावना असायला हवी/ जाणवायला हवी...

हरि ओम.